शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

भाविकांना उत्सुकता प्रशासनाच्या नियोजनाची

By admin | Updated: February 2, 2015 00:07 IST

दासनवमी उत्सव : नियोजन बैठकीकडे सर्वांचे लक्ष

परळी : सज्जनगडाचा दासनवमी उत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्र राज्याबरोबरच देशातील मॉरेशिस, सिंगापूरच्या भाविकांची ओढ सज्जनगडाकडे लागली आहे. अशातच प्रशासन भाविकांच्या अडीअडचणी दूर करून अजून कोणत्या प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविणार आहे, याची उत्सुकता भाविकांना लागून राहिली आहे.सज्जनगडावर दि. ४ फेब्रुवारी पासून १४ फेब्रुवारीपर्यंत येथे दासनवमी उत्सव सुरू होत आहे. या उत्सवात लाखो भाविक सज्जनगडावर येतात. समर्थ रामदास स्वामी संस्थान व समर्थ सेवा मंडळ महाप्रसाद व मुक्कामी येणाऱ्या भाविकांची उत्तम प्रकारे सोय करतात. मात्र, याठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सज्जनगड फाटा ते भातखळे या रस्त्यावर वीस वर्षांपूर्वी डांबर पडावे, रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, याबाबत चर्चा होते. मात्र, त्यांची अंमलबजावणी अद्यापही होत नाही. गेल्या दोन वर्षांपूर्वी रस्त्याची दुरुस्ती, वाहनतळ, तटबंदीसाठी निधीही मंजूर झाला. मात्र, प्रत्यक्ष कामास अद्यापही सुरुवात नाही. बसस्थानक परिसरात प्लास्टिक कचऱ्याचे साम्राज्य, बसस्थानकावर महिलांना स्वच्छतागृह नाही. पिण्याची पाणी नाही, बसण्यासाठी कठडे नसल्याने गैरसोय होते. सज्जनगडावरील पाण्याची तळीही अस्वच्छ आहेत. (वार्ताहर)सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्याची मागणीयात्रा कालावधीत हजारो संख्येने समर्थभक्त सज्जनगडावर येतात. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा घडल्यास तो कोणी केला, यासाठी समर्थ रामदास स्वामी संस्थानच्या वतीने क्लोज सर्किट टी. व्ही. (सी. सी. टी. व्ही.) कॅमेरे बसविले आहेत. ही कौतुकाची बाब आहे; परंतु फक्त मंदिर परिसरात आहेत ते इतर ठिकाणी याची मागणी होत आहे.सज्जनगड यात्रा नियोजनाची बैठक येत्या दोन दिवसांत होणार आहे. यासंबंधी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याशी चर्चा झाली असून, यात्रा कालावधीत भाविकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत. वाहतूक, स्वच्छता, गर्दीवर नियंत्रणासाठी विविध योजना करण्यात येणार आहेत.- संजय बैलकर, मंडलाधिकारी, परळी