शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

विकासकामे पूर्ण करण्यावर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:46 IST

सातारा : ‘कोरोना संकटामुळे कामांवर परिणाम झाला आहे. पण, आता आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे ...

सातारा : ‘कोरोना संकटामुळे कामांवर परिणाम झाला आहे. पण, आता आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विकासकामे मार्गी लावून ती पूर्ण करण्यावर भर द्यावा,’ अशी स्पष्ट सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जलव्यवस्थापन आणि स्थायी समितीची सभा अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कबुले यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन सूचना केली. या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, ग्रामपंचायत विभागाच्या अर्चना वाघमळे, पाणी व स्वच्छता विभागाचे किरण सायमोते, महिला व बालकल्याणच्या रोहिणी ढवळे, अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी समितीचे सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण समिती सभापती कल्पना खाडे, समितींचे सदस्य भीमराव पाटील, दीपक पवार, शिवाजी सर्वगोड, जयवंत भोसले, सागर शिवदास, सुवर्णा देसाई आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच काही ठरावही करण्यात आले.

सुरुवातीला जलव्यवस्थापन समितीची सभा झाली. या सभेत जिल्ह्यातील तलाव, बंधाऱ्यांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर स्थायी समितीची सभा झाली. या सभेत प्रथम मागील सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला. तसेच मागील ठरावावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.

या सभेत माण पंचायत समितीने तेथील सभागृहाला दिवंगत आमदार सदाशिवराव पोळ यांचे नाव देण्याचा ठराव केल्याचा विषय चर्चेला आला. यावर जिल्हा परिषदेने माण पंचायत समिती सभागृहाला पोळ यांचे नाव देण्याचा ठराव घेऊन तो राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या सभेत विविध विभागांचाही आढावा घेण्यात आला.

.................................................