शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

खाद्यतेलाचा भाव स्थिर; मात्र,पालेभाज्यांच्या दरात चढउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:35 IST

सातारा : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने मंडईतील पालेभाज्यांच्या दरात चढ-उतार सुरू आहे. तर सातारा बाजार समितीत आवक चांगली होत ...

सातारा : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने मंडईतील पालेभाज्यांच्या दरात चढ-उतार सुरू आहे. तर सातारा बाजार समितीत आवक चांगली होत असली तरी दर मात्र वाढलेले नाहीत. त्याचबरोबर बहुतांश खाद्यतेलाचे दर स्थिर आहेत.

सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक असतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यातून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही काही माल येत असतो. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असला तरी बाजार समिती सुरू आहे. त्यामुळे शेतमालाची आवक अजूनही चांगलीच होत आहे.

सातारा बाजार समितीत रविवारी १ हजार २२ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांदा २८६, बटाटा ३४२, लसूण २० आणि आल्याची १२ क्विंटल आवक राहिली. तसेच डाळिंब, आंबा, खरबूज, कलिंगड, द्राक्षे यांची काही प्रमाणात आवक झाली. मात्र, दरात तेजी नसल्याचे दिसून आले.

सोयाबीन तेलाला मागणी

खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. पण, मागील आठवड्यात दर स्थिर राहिला. त्यातच सूर्यफूल तेलाचा दर तेजीत असल्याने ग्राहक सोयाबीन तेलाकडे वळला आहे. त्यामुळे सोयाबीन तेल डब्यामागे ५० रुपये वाढ होऊन २३०० पर्यंत पोहोचला आहे. तर सूर्यफूल तेल डबा २५०० ते २५५०, शेंगतेलचा २५५० पर्यंत मिळत आहे.

सफरचंद आवक नाही

सातारा बाजार समितीत सफरचंदची आवक होत नाही. मात्र, कलिंगड, टरबूजची होत आहे. आता आंब्याचीही आवक वाढू लागली आहे. मात्र, ग्राहक कमी आहे.

वाटाण्याला दर

सातारा बाजार समितीत वांग्याला १० किलोला ८० ते १०० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला ३० ते ६०, फ्लॉवर २०० ते २५०, दोडका २५० ते ३००, मिरचीला १०० ते २०० रुपये दर १० किलोला मिळाला. तर कांद्याला क्विंटलला १२००, लसूण ५ हजार, तर वाटण्याला ८ हजारांपर्यंत दर मिळाला.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे घराबाहेर पडता येत नाही. त्यातच जवळच्या ठिकाणी भाजी खरेदी केली. मात्र, किरकोळ विक्रेते दर वाढवत आहेत.

- शामराव पाटील, ग्राहक

गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. मात्र, मागील आठवड्यात भाव स्थिर राहिला. असे असले तरी खाद्यतेलाचे भाव कमी होतील, अशी स्थिती सध्यातरी नाही.

- संजय भोईटे, दुकानदार

लॉकडाऊनमुळे भाज्यांचे दर कमी होण्याची भीती आहे. कारण, व्यापारी कमी दरानेच मागत आहेत. कडक लॉकडाऊन झाला तर भाजीपाला काढून टाकण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

- तानाजी सावंत, शेतकरी

.......................................................................................................................