शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

खाद्यतेलाचा भाव स्थिर; मात्र,पालेभाज्यांच्या दरात चढउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:35 IST

सातारा : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने मंडईतील पालेभाज्यांच्या दरात चढ-उतार सुरू आहे. तर सातारा बाजार समितीत आवक चांगली होत ...

सातारा : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने मंडईतील पालेभाज्यांच्या दरात चढ-उतार सुरू आहे. तर सातारा बाजार समितीत आवक चांगली होत असली तरी दर मात्र वाढलेले नाहीत. त्याचबरोबर बहुतांश खाद्यतेलाचे दर स्थिर आहेत.

सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक असतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यातून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही काही माल येत असतो. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असला तरी बाजार समिती सुरू आहे. त्यामुळे शेतमालाची आवक अजूनही चांगलीच होत आहे.

सातारा बाजार समितीत रविवारी १ हजार २२ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांदा २८६, बटाटा ३४२, लसूण २० आणि आल्याची १२ क्विंटल आवक राहिली. तसेच डाळिंब, आंबा, खरबूज, कलिंगड, द्राक्षे यांची काही प्रमाणात आवक झाली. मात्र, दरात तेजी नसल्याचे दिसून आले.

सोयाबीन तेलाला मागणी

खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. पण, मागील आठवड्यात दर स्थिर राहिला. त्यातच सूर्यफूल तेलाचा दर तेजीत असल्याने ग्राहक सोयाबीन तेलाकडे वळला आहे. त्यामुळे सोयाबीन तेल डब्यामागे ५० रुपये वाढ होऊन २३०० पर्यंत पोहोचला आहे. तर सूर्यफूल तेल डबा २५०० ते २५५०, शेंगतेलचा २५५० पर्यंत मिळत आहे.

सफरचंद आवक नाही

सातारा बाजार समितीत सफरचंदची आवक होत नाही. मात्र, कलिंगड, टरबूजची होत आहे. आता आंब्याचीही आवक वाढू लागली आहे. मात्र, ग्राहक कमी आहे.

वाटाण्याला दर

सातारा बाजार समितीत वांग्याला १० किलोला ८० ते १०० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला ३० ते ६०, फ्लॉवर २०० ते २५०, दोडका २५० ते ३००, मिरचीला १०० ते २०० रुपये दर १० किलोला मिळाला. तर कांद्याला क्विंटलला १२००, लसूण ५ हजार, तर वाटण्याला ८ हजारांपर्यंत दर मिळाला.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे घराबाहेर पडता येत नाही. त्यातच जवळच्या ठिकाणी भाजी खरेदी केली. मात्र, किरकोळ विक्रेते दर वाढवत आहेत.

- शामराव पाटील, ग्राहक

गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. मात्र, मागील आठवड्यात भाव स्थिर राहिला. असे असले तरी खाद्यतेलाचे भाव कमी होतील, अशी स्थिती सध्यातरी नाही.

- संजय भोईटे, दुकानदार

लॉकडाऊनमुळे भाज्यांचे दर कमी होण्याची भीती आहे. कारण, व्यापारी कमी दरानेच मागत आहेत. कडक लॉकडाऊन झाला तर भाजीपाला काढून टाकण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

- तानाजी सावंत, शेतकरी

.......................................................................................................................