शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

खाद्यतेलाचा भाव स्थिर; मात्र,पालेभाज्यांच्या दरात चढउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:35 IST

सातारा : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने मंडईतील पालेभाज्यांच्या दरात चढ-उतार सुरू आहे. तर सातारा बाजार समितीत आवक चांगली होत ...

सातारा : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने मंडईतील पालेभाज्यांच्या दरात चढ-उतार सुरू आहे. तर सातारा बाजार समितीत आवक चांगली होत असली तरी दर मात्र वाढलेले नाहीत. त्याचबरोबर बहुतांश खाद्यतेलाचे दर स्थिर आहेत.

सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक असतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यातून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही काही माल येत असतो. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असला तरी बाजार समिती सुरू आहे. त्यामुळे शेतमालाची आवक अजूनही चांगलीच होत आहे.

सातारा बाजार समितीत रविवारी १ हजार २२ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांदा २८६, बटाटा ३४२, लसूण २० आणि आल्याची १२ क्विंटल आवक राहिली. तसेच डाळिंब, आंबा, खरबूज, कलिंगड, द्राक्षे यांची काही प्रमाणात आवक झाली. मात्र, दरात तेजी नसल्याचे दिसून आले.

सोयाबीन तेलाला मागणी

खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. पण, मागील आठवड्यात दर स्थिर राहिला. त्यातच सूर्यफूल तेलाचा दर तेजीत असल्याने ग्राहक सोयाबीन तेलाकडे वळला आहे. त्यामुळे सोयाबीन तेल डब्यामागे ५० रुपये वाढ होऊन २३०० पर्यंत पोहोचला आहे. तर सूर्यफूल तेल डबा २५०० ते २५५०, शेंगतेलचा २५५० पर्यंत मिळत आहे.

सफरचंद आवक नाही

सातारा बाजार समितीत सफरचंदची आवक होत नाही. मात्र, कलिंगड, टरबूजची होत आहे. आता आंब्याचीही आवक वाढू लागली आहे. मात्र, ग्राहक कमी आहे.

वाटाण्याला दर

सातारा बाजार समितीत वांग्याला १० किलोला ८० ते १०० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला ३० ते ६०, फ्लॉवर २०० ते २५०, दोडका २५० ते ३००, मिरचीला १०० ते २०० रुपये दर १० किलोला मिळाला. तर कांद्याला क्विंटलला १२००, लसूण ५ हजार, तर वाटण्याला ८ हजारांपर्यंत दर मिळाला.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे घराबाहेर पडता येत नाही. त्यातच जवळच्या ठिकाणी भाजी खरेदी केली. मात्र, किरकोळ विक्रेते दर वाढवत आहेत.

- शामराव पाटील, ग्राहक

गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. मात्र, मागील आठवड्यात भाव स्थिर राहिला. असे असले तरी खाद्यतेलाचे भाव कमी होतील, अशी स्थिती सध्यातरी नाही.

- संजय भोईटे, दुकानदार

लॉकडाऊनमुळे भाज्यांचे दर कमी होण्याची भीती आहे. कारण, व्यापारी कमी दरानेच मागत आहेत. कडक लॉकडाऊन झाला तर भाजीपाला काढून टाकण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

- तानाजी सावंत, शेतकरी

.......................................................................................................................