शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

खाद्यतेलाचा भाव स्थिर; मात्र,पालेभाज्यांच्या दरात चढउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:35 IST

सातारा : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने मंडईतील पालेभाज्यांच्या दरात चढ-उतार सुरू आहे. तर सातारा बाजार समितीत आवक चांगली होत ...

सातारा : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने मंडईतील पालेभाज्यांच्या दरात चढ-उतार सुरू आहे. तर सातारा बाजार समितीत आवक चांगली होत असली तरी दर मात्र वाढलेले नाहीत. त्याचबरोबर बहुतांश खाद्यतेलाचे दर स्थिर आहेत.

सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक असतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यातून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही काही माल येत असतो. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असला तरी बाजार समिती सुरू आहे. त्यामुळे शेतमालाची आवक अजूनही चांगलीच होत आहे.

सातारा बाजार समितीत रविवारी १ हजार २२ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांदा २८६, बटाटा ३४२, लसूण २० आणि आल्याची १२ क्विंटल आवक राहिली. तसेच डाळिंब, आंबा, खरबूज, कलिंगड, द्राक्षे यांची काही प्रमाणात आवक झाली. मात्र, दरात तेजी नसल्याचे दिसून आले.

सोयाबीन तेलाला मागणी

खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. पण, मागील आठवड्यात दर स्थिर राहिला. त्यातच सूर्यफूल तेलाचा दर तेजीत असल्याने ग्राहक सोयाबीन तेलाकडे वळला आहे. त्यामुळे सोयाबीन तेल डब्यामागे ५० रुपये वाढ होऊन २३०० पर्यंत पोहोचला आहे. तर सूर्यफूल तेल डबा २५०० ते २५५०, शेंगतेलचा २५५० पर्यंत मिळत आहे.

सफरचंद आवक नाही

सातारा बाजार समितीत सफरचंदची आवक होत नाही. मात्र, कलिंगड, टरबूजची होत आहे. आता आंब्याचीही आवक वाढू लागली आहे. मात्र, ग्राहक कमी आहे.

वाटाण्याला दर

सातारा बाजार समितीत वांग्याला १० किलोला ८० ते १०० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला ३० ते ६०, फ्लॉवर २०० ते २५०, दोडका २५० ते ३००, मिरचीला १०० ते २०० रुपये दर १० किलोला मिळाला. तर कांद्याला क्विंटलला १२००, लसूण ५ हजार, तर वाटण्याला ८ हजारांपर्यंत दर मिळाला.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे घराबाहेर पडता येत नाही. त्यातच जवळच्या ठिकाणी भाजी खरेदी केली. मात्र, किरकोळ विक्रेते दर वाढवत आहेत.

- शामराव पाटील, ग्राहक

गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. मात्र, मागील आठवड्यात भाव स्थिर राहिला. असे असले तरी खाद्यतेलाचे भाव कमी होतील, अशी स्थिती सध्यातरी नाही.

- संजय भोईटे, दुकानदार

लॉकडाऊनमुळे भाज्यांचे दर कमी होण्याची भीती आहे. कारण, व्यापारी कमी दरानेच मागत आहेत. कडक लॉकडाऊन झाला तर भाजीपाला काढून टाकण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

- तानाजी सावंत, शेतकरी

.......................................................................................................................