शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

खाद्यतेल पुन्हा महागले; डब्यामागे १०० रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:36 IST

सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती बंद असल्याने सोमवारी भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे दर कमी ...

सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती बंद असल्याने सोमवारी भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे दर कमी निघण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे खाद्यतेलात पुन्हा वाढ झाली आहे. १५ किलोच्या डब्यामागे सरासरी १०० रुपयांची वाढ आहे. दरम्यान, डाळींचे दरही टिकून आहेत.

सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक असतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यातून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही काही माल येत असतो. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने शनिवार आणि रविवारी सातारा बाजार समिती बंद होती. त्यामुळे शेतमाल आलाच नाही. सोमवारी बाजार समिती सुरू राहणार आहे. त्यामुळे मालाची आवक अधिक होईल, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, बाजार समितीत कांद्याचा दर कमी झाला असून वाटाणा अधिक भाव खात असल्याचे दिसून येत आहे.

तेल डब्यामागे वाढ

खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. मागील आठवड्यात दर स्थिर राहिले होते. मात्र, तेल दरात पुन्हा वाढ झाली आहे. डब्यामागे १०० रुपयांची वाढ आहे. सूर्यफूल आणि शेंगदाणा तेल डबा २,५०० ते २,५५० रुपयांना मिळत आहे. तर सोयाबीन तेल डबा २,१५० ते २२५०, पामतेलचा १,९०० ते २ हजार रुपयांना मिळत आहे.

फळांची आवक कमी

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने फळांची आवक कमी झाली. लॉकडाऊन असतानाही काही ठिकाणी केळी, कलिंगडे विक्री सुरू असल्याचे दिसून आले.

लसणाला दर

बाजार समितीत भाज्यांना कमी दर आहे. गवारला १० किलोला ३०० ते ४०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. शेवगा शेंगला १०० ते १५०, पावटा ४०० ते ४५० आणि भेंडीला ३०० ते ३५० रुपये दर मिळत आहे. लसणाला ६ हजार तर बटाट्याला १,६०० रुपये क्विंटलपर्यंत दर आहे.

दोन दिवसांपासून भाजी मंडई बंद आहे. पण, शुक्रवारीच घरासाठी दोन दिवस पुरेल एवढा भाजीपाला खरेदी केला होता. सध्या काही भाज्यांचे दर वाढले आहेत. कांदा मात्र आवाक्यात आहे.

- रामचंद्र पवार, ग्राहक

खाद्यतेलाचे दर मागील आठवड्यात कमी झाले होते. मात्र, या आठवड्यात पुन्हा वाढ झाली आहे. कारण, लॉकडाऊनमुळे उत्पादन कमी होत आहे. यापुढेही खाद्यतेलाचे दर वाढतील असा अंदाज आहे.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने दोन दिवस बाजार समिती बंद आहे. सोमवारी भाजीपाला घेऊन जावा लागणार आहे. नाहीतर नासच होईल. कांद्याला दर कमी मिळत आहे.

- रामा काळे, शेतकरी