शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

खाद्यतेल पुन्हा महागले; डब्यामागे १०० रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:36 IST

सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती बंद असल्याने सोमवारी भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे दर कमी ...

सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती बंद असल्याने सोमवारी भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे दर कमी निघण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे खाद्यतेलात पुन्हा वाढ झाली आहे. १५ किलोच्या डब्यामागे सरासरी १०० रुपयांची वाढ आहे. दरम्यान, डाळींचे दरही टिकून आहेत.

सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक असतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यातून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही काही माल येत असतो. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने शनिवार आणि रविवारी सातारा बाजार समिती बंद होती. त्यामुळे शेतमाल आलाच नाही. सोमवारी बाजार समिती सुरू राहणार आहे. त्यामुळे मालाची आवक अधिक होईल, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, बाजार समितीत कांद्याचा दर कमी झाला असून वाटाणा अधिक भाव खात असल्याचे दिसून येत आहे.

तेल डब्यामागे वाढ

खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. मागील आठवड्यात दर स्थिर राहिले होते. मात्र, तेल दरात पुन्हा वाढ झाली आहे. डब्यामागे १०० रुपयांची वाढ आहे. सूर्यफूल आणि शेंगदाणा तेल डबा २,५०० ते २,५५० रुपयांना मिळत आहे. तर सोयाबीन तेल डबा २,१५० ते २२५०, पामतेलचा १,९०० ते २ हजार रुपयांना मिळत आहे.

फळांची आवक कमी

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने फळांची आवक कमी झाली. लॉकडाऊन असतानाही काही ठिकाणी केळी, कलिंगडे विक्री सुरू असल्याचे दिसून आले.

लसणाला दर

बाजार समितीत भाज्यांना कमी दर आहे. गवारला १० किलोला ३०० ते ४०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. शेवगा शेंगला १०० ते १५०, पावटा ४०० ते ४५० आणि भेंडीला ३०० ते ३५० रुपये दर मिळत आहे. लसणाला ६ हजार तर बटाट्याला १,६०० रुपये क्विंटलपर्यंत दर आहे.

दोन दिवसांपासून भाजी मंडई बंद आहे. पण, शुक्रवारीच घरासाठी दोन दिवस पुरेल एवढा भाजीपाला खरेदी केला होता. सध्या काही भाज्यांचे दर वाढले आहेत. कांदा मात्र आवाक्यात आहे.

- रामचंद्र पवार, ग्राहक

खाद्यतेलाचे दर मागील आठवड्यात कमी झाले होते. मात्र, या आठवड्यात पुन्हा वाढ झाली आहे. कारण, लॉकडाऊनमुळे उत्पादन कमी होत आहे. यापुढेही खाद्यतेलाचे दर वाढतील असा अंदाज आहे.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने दोन दिवस बाजार समिती बंद आहे. सोमवारी भाजीपाला घेऊन जावा लागणार आहे. नाहीतर नासच होईल. कांद्याला दर कमी मिळत आहे.

- रामा काळे, शेतकरी