शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक मूर्ती हिताची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:39 IST

मंगलकार्य किंवा कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच श्री गणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षांपासून सुरू ...

मंगलकार्य किंवा कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच श्री गणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षांपासून सुरू आहे. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला घरोघरी पार्थिव गणपतीचे पूजन केले जाते. आपापल्या कुळाचाराप्रमाणे घरोघरी गणपतीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपती, सात दिवस गणपती पूजन केले जाते. अनेक घरांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश पूजन करण्यात येते. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करताना तो १० दिवस असावा, असे निश्चित केल्याचे सांगितले जाते. त्यानुसार, गणेश चतुर्थीला स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते. पार्थिव गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो. तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी पार्थिव गणपती मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते. या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने पुण्य प्राप्ती होते. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, अशी भावना आहे.

देवी-देवतांच्या मूर्तींचे जलात विसर्जन करण्याची प्राचीन परंपरा आहे. शास्त्रांमध्ये देवी-देवतांच्या मूर्तींचे पवित्र जलाशयात विसर्जन करावे, असे सांगितले जाते. यासाठी समुद्र, नदी, तलाव, कुंड यांना प्राथमिकता देण्यात आली आहे. समुद्राला पाण्याचा राजा मानले जाते. यात अनेक नद्यांचे प्रवाह समाविष्ट झालेले असतात. म्हणूनच गणपती वा देवी-देवतांच्या मूर्तींचे समुद्रात विसर्जन करावे, असा सल्ला दिला जातो. यानंतर नद्यांना प्राथमिकता देण्यात आली आहे. देशावर असलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता बघता, गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे सर्वांची सुरक्षितता लक्षात घेऊन शक्य असल्यास घरच्या घरी गणपती मूर्तीचे विसर्जन सर्वोत्तम ठरतेय.

चौकट :

शाडू किंवा मातीच्या मूर्तीचे विसर्जन घरातच बादलीत करण्यात येते. अवघ्या काही तासांत ही मूर्ती विरघळून जाते. त्याचे पाणी आणि अवशेष घरातील बागेसाठी उपयोगाला येतात. काहींनी तर घरात कायमस्वरूपी अशी धातूची मूर्ती ठेवली आहे. एकदाच चार-पाच हजार खर्च केले की, पुढे वर्षभर सुपारीचे विसर्जन आणि धातूच्या मूर्तीचे पूजन असे करण्याचा पायंडाही सातारकरांनी अवलंबला आहे.

कोट :

कला शाखेत शिकताना साधारण चार दशकांपूर्वी मी स्वत: तयार केलेल्या गणपतीची आम्ही अजूनही प्राणप्रतिष्ठापना करतो. वर्षभर मात्र ती सुरक्षित ठिकाणी ठेवतो. दर दोन-तीन वर्षांनी मूर्तीला रंग दिला की, त्यात नावीन्य येते. गणपती विकत आणणं ही पद्धतच आम्ही हद्दपार केलीय. विद्यार्थ्यांनाही मी हेच सांगतो.

- शेखर हसबनीस, कलाशिक्षक, सातारा

फोटो आहे