शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

निमसोड ग्रामस्थांचे पाणीटंचाईमुळे हाल

By admin | Updated: April 10, 2017 21:45 IST

विहिरींची पातळी घटली : गाळ मिश्रित पाणी पिण्याची ग्रामस्थांवर वेळ

वडूज : निमसोड, ता. खटाव येथे गत तीन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत असून, ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठीचा एकमेव आधार असलेल्या विहिरींमध्ये अत्यंत दूषित पाणी असून, त्याच पाण्यावर अनेकांना आपली तहान भागवण्यासाठी धडपडावे लागते. पाण्याविना सुरू असलेली ससेहोलपट थांबत नसल्याने ग्रामस्थांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीने टँकरचा प्रस्ताव देऊनही प्रशासन मात्र सुस्तच आहे. खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून निमसोडची जिल्ह्यात ओळख आहे. मातब्बर नेते येथे आहेत. गावची लोकसंख्या साडेदहा हजारांपर्यंत आहे. गावासाठी आजवर जलस्वराज्य योजना, प्रादेशिक योजना तसेच स्थानिक पाणी योजनेचा नळपाणी पुरवठ्याचा प्रयत्न झाला. मात्र, कोणतीच योजना ग्रामस्थांची तहान भागवू शकली नाही. डिसेंबरनंतर पाणीटंचाई सततच जाणवते. यावर्षी प्रचंड उन्हाळ्यामुळे पाणीपातळी कमालीची घटली आहे. विहिरींनी तळ गाठलाय, विंधन विहिरी ओस पडल्यात. तर ओढे, नाले, तलाव भेघाळलेत, त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता अधिकच जाणवू लागलीय. निमसोडमध्ये मराठी शाळा, मठ व विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या बोअरचा ग्रामस्थांना आधार असतो. विठ्ठल मंदिराजवळची बोअर नादुरुस्त आहे. तर शाळा व मठाजवळील बोअरचे पाणी कमी झाले आहे. गावातील बहुतांश लोकांना गावच्या दक्षिण-पश्चिमेस असलेल्या बारवचा आधार असतो. मात्र, सध्या या बारवात डबक्याएवढेच पाणी आहे. तेच पाणी मिळविण्यासाठी रात्री एक वाजेपर्यंत बारवावर गर्दी असते. ४० ते ५० फूट खोलीवरून हे पाणी उपसावे लागते. निवडणुकीत पाणी देण्याच्या वल्गना सर्वच नेत्यांनी केल्या. मात्र, त्या वल्गना हवेतच विरल्या.हिंगणगाव योजना गतिमान करण्याचा ग्रामपंचायतीने प्रयत्न केला खरा परंतु या उन्हाळ्यापर्यंत ही योजना पूर्णत्वास जाणे अशक्य असल्याने निमसोडकरांची पाण्यासाठीची होरपळ यावर्षी कायम राहणार, हे निश्चित. मागणी केल्याप्रमाणे निमसोडसाठी टँकर सुरू करावेत, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी) मे महिन्यात तहान भागणारगत पंचवीस वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी निमसोडकरांना भटकंती करावी लागत होती. मात्र, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हिंगणगाव (ता. कडेगाव, जि. सांगली) या तलावाच्या परिसरात विहीर खोदून कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्यात यश मिळाले आहे. १ कोटी ९९ लाख रुपये या योजनेला मंजूर झाले असून, ५५ लाखांचा पहिला हप्ता ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा आहे. या योजनेचे पाणी मे महिनाअखेर निमसोड गावाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच निमसोडकरांची तहान भागणार आहे.निमसोड, ता. खटाव येथील विहिरींची पाणीपातळी घटली आहे.