शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

वादळी वाऱ्यामुळे आंबा पुन्हा दुरावला!

By admin | Updated: May 11, 2015 23:26 IST

किंमत वाढणार : कच्च्या कैऱ्यांचा झाडाखालीच सडा; शेतकऱ्यांचे नुकसान

कोपर्डे हवेली : बाजारात सध्या आंबा दाखल झाला आहे. मात्र, या आंब्याची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही. सध्या शिवारामध्ये आंब्यांची झाडे बहरली आहेत. त्यामुळे सामान्यांना त्याची चव चाखता येईल, अशी परिस्थिती असतानाच दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. या वादळात आंबे झडून मोठे नुकसान झाले. आता आंबा सामान्यांपासून आणखी दुरावणार असल्याची चिन्हे आहेत.कऱ्हाड तालुक्यात सर्वात जास्त आंब्याची आवक पाटण तालुक्यातील गावांमधून होते. मुळात पाटण तालुका कोकण पट्ट्यात असला तरी यावर्षी आंब्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाटण तालुका डोंगरांनी वेढला असून, कोकण पट्ट्यात येणाऱ्या या तालुक्यात आंब्यांसाठी अनुकूल वातावरण आहे. तालुक्यातील अगदी खेडोपाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर आंब्याची झाडे असून, आंबा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना वेगळे कष्ट घेण्याची गरज पडत नाही. अनेक वर्षे जुन्या असणाऱ्या झाडांना आंब्याची फळे लागून त्याची चव आंब्यांच्या मोसमात चाखायला हमखास मिळते. गेल्या काही वर्षांत शेतकरी आंबा फळाकडे केवळ पिकल्यावर विक्री करून पैसे मिळविणे या पारंपरिक पद्धतीला छेद देत लोणच्यासाठी कच्ची कैरी विकून त्याद्वारे आर्थिक नफा मिळवू लागला आहे. त्यामुळे पाटणच्या शेती उत्पन्न बाजार समिती आवारात गेल्या काही वर्षांपासून कच्च्या कैरीचे सौदे सुरू आहेत. आंब्याचे उत्पन्न चांगले मिळण्यासाठी व झाडाला मोहोर येऊन त्याची फळे बनण्यापासून ते ती चांगल्या अवस्थेत टिकून राहण्यासाठी वातावरणाचा मोठा वाटा असतो. ढगाळ वातावरण व पावसाने आंब्याला मोठा फटका बसतो.ढगाळ वातावरणामुळे मोहोर गळून गेल्यास झाडाला फळे लागत नाहीत. यावर्षी तर वातावरणातील बदल आंबा पिकासाठी खूपच प्रतिकूल ठरला असून, अपवाद वगळता हिवाळ्याच्या प्रत्येक महिन्यात वळवाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आंब्याच्या झाडाला फळांचे प्रमाण फारच कमी होते. त्यातूनही जी फळे वाचली होती, ती दोन दिवसांपूर्वीच्या पावसाने गळून पडली आहेत. परिणामी, पाटण तालुक्यातून होणारी आंब्याची आवक घटणार आहे. हीच परिस्थिती कऱ्हाड तालुक्यातही आहे. दोन दिवसांपूर्वीच्या वादळाने ठिकठिकाणी आंब्याचा सडा पडला. परिणामी, आंबा दुर्मिळ होणार असल्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी) कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे हानीकारकझाडाला फळेच राहिली नसल्याने आंबा पिकून त्याची चव चाखण्याची संधी मिळणे आता दुरापास्त झाले आहे. त्यामुळे यावर्षी सर्वसामान्यांना आंबा विकत घेऊन खाणे खिशाला न परवडणारे ठरणार आहे. बाजारात कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे दाखल होतात. काही नागरिक असे आंबे खरेदी करून चव भागवतात. मात्र, या अशा पद्धतीने पिकविलेले आंबे शरीरास अपायकारक ठरू शकतात.