शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

देसार्इंच्या दडपशाहीमुळे कॅनॉलची कामे अर्धवट

By admin | Updated: September 20, 2015 23:44 IST

विक्रमसिंह पाटणकर : जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बगल देऊन केवळ पेपरबाजी करत असल्याचा आरोप

पाटण : ‘आमदार झाल्यानंतर शंभूराज देसार्इंनी दोन विधानसभा अधिवेशन केली. यामध्ये त्यांनी पाटण तालुक्यातील अर्धवट राहिलेली सहा धरणांची कामे पूर्ण करण्यासाठी मागणी केली नाही, पुनर्वसनाचे प्रश्न मांडले नाहीत. कॅनालची कामे यांच्याच दडपशाहीमुळे अर्धवट राहिली आहेत. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला महत्त्व न देता विद्यमान आमदार विधानसभेत बारीकसारीक भाषणे करुन फक्त पेपरबाजी करत आहेत. असा टोला माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी लगावला आहे.पाटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाटणकर म्हणाले, आमदार झाल्यानंतर शंभूराज देसार्इंनी अवघ्या ११ महिन्यांतच जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे १२ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर होऊन त्या पाटणकर गटाच्या विचारांच्या झाल्या. लगेचच पाटण बाजार समितीत आमदार देसाई पॅनेलचा १९-० असा दारुण पराभव झाला. त्यामुळे आमदार शंभूराज देसार्इंनी पाटणकर पिता-पुत्राचा धसका घेतला आहे. आ. देसाई कधी ९५ कोटी रुपयांचा तर कधी २०० कोटींचा निधी आणल्याचे जाहीर करत आहेत. मात्र, हे करताना तो निधी कोणत्या गावासाठी आणला याचा उल्लेख मात्र दिसत नाही. आम्ही मंजूर केलेल्या कामाचे भूमिपूजन करण्यात आमदार देसाई धन्यता मानतात. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या सभोवतालच्या गावांना अद्याप निधी मिळू शकला नाही. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत. हा प्रश्न त्यांना महत्त्वाचा वाटत नाही. तर उत्तरमांड धरणातील दोन ट्रॉली खडीसाठी विधानसभेचा लाखमोलाचा वेळ वाया घालविण्यात शंभूराज देसार्इंनी धन्यता मानली.घाटेवाडी आणि चेवलेवाडी पूनर्वसन शंभूराज देसाई २००४ मध्ये आमदार असताना झाले. त्या घाटेवाडीच्या पूनर्वसनाच्या भिंती पडू लागल्या आहेत. तर चेवलेवाडी ग्रामस्थांना किती लांबी रुंदीच्या खोल्या बांधून दिल्या. हे आता तेथील जनताच सांगत आहे. (प्रतिनिधी)... तरी आत्ताच धसकाशंभूराज देसाई आमदार होऊन एक वर्षे झाले. आजपर्यंत तरी त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे. आता पुढे ४ वर्षे आहेत. तरीसुद्धा पाटणकर पिता-पुत्राची घोडदौड पाहून त्यांचे धाबे दणाणले आहेत. आमचे प्रतिबिंब त्यांना दिसू लागले आहे. झोप येईना अशी गत आमदारांची झाली की काय? असा सवाल माजी आमदार पाटणकर यांनी व्यक्त केला.