शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

पेरणीयोग्य पावसाअभावी माणमध्ये पेरण्या खोळंबल्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:25 IST

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यात आजपर्यंत सरासरी अवघा ५८ टक्के इतका पाऊस झाल्याने माण पूर्व भागासह तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांच्या ...

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यात आजपर्यंत सरासरी अवघा ५८ टक्के इतका पाऊस झाल्याने माण पूर्व भागासह तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आत्तापर्यंत अवघ्या ३४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे, तर काही पेरलेल्या ठिकाणी दुबारा पेरणीचेही संकट ओढवले आहे.

तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४६५ मिलिमीटर आहे. दोन वर्षांत सातशे मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने उन्हाळ्यातही फारशी टंचाई जाणवली नाही. मात्र, यंदा जुलै महिना तोंडावर आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. जास्त म्हसवड मंडलामध्ये १०६ मिलिमीटर पाऊस झाला तर त्याखालोखाल दहिवडी ८३, मलवडी ७२, गोंदवले ६०, कुकूडवाड ३३, मार्डी ३२ तर शिंगणापूर सर्वात कमी २५ मिलिमीटर म्हणजे सरासरी ५८ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे.

तालुक्यातील पेरणीयोग्य क्षेत्र ३८,०९१ हेक्टर आहे. त्यापैकी १३,२६१ हेक्टर क्षेत्रात बाजरी, मका, मूग, चवळी, मटकी, घेवडा, भुईमूग, कांदा यांची पेरणी झाली आहे. सरासरी ३४ टक्के पेरणी झाली आहे. पाऊस पडेल या आशेवर धूळवाफेवर पेरणी झाली असून, पाऊस न पडल्यास दुबारा पेरणीचे संकटही ओढावू शकते. खरीप हंगामातील पेरणी येत्या १५ दिवसांत पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, अद्यापही पावसाने हुलकावणी दिली आहे.

म्हसवड, मलवडी, गोंदवले परिसरात पेरणी झाली आहे. मात्र, कुकडवाड, वरकुटे-मलवडी, शिंगणापूर मार्डी परिसरात अद्याप बळीराजाने चाड्यावर मूठ धरलीच नाही. तालुक्यात १० तलाव आहेत. त्यापैकी लोधवडे, गंगोती, मासाळवाडी हे तीन तलाव कोरडे पडले आहेत तर इतर तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे.

कोट :

माण तालुका खरीप हंगामासाठी सज्ज असून, बी-बियाणे, खते यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तालुक्यात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस पडला नाही. किमान ८० ते १०० मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये.

- प्रकाश पवार,

तालुका कृषी अधिकारी, माण