शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
9
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
10
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
11
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
12
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
13
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
14
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
15
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
16
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
17
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
18
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
19
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
20
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?

अतिवृष्टीमुळे दानवलीतील भातशेती गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:35 IST

पाचगणी : दानवली (ता. महाबळेश्वर) येथे अतिवृष्टीमुळे डोंगर काठावरील भातशेती पुराच्या पाण्याने वाहून गेली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे ...

पाचगणी : दानवली (ता. महाबळेश्वर) येथे अतिवृष्टीमुळे डोंगर काठावरील भातशेती पुराच्या पाण्याने वाहून गेली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. या नुकसानाचा पंचनामा कृषी विभागाने केला आहे.

डोंगरकुशीत वसलेल्या दानवली गावात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. डोंगराच्या काठावर असणाऱ्या या भागात शेतीला यावेळी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला. डोंगरउतारावरून मोठ्या प्रमाणात आलेल्या पाण्यामुळे ही सर्व शेती वाहून गेली आहे. तसेच पाण्याबरोबर आलेल्या दगड-धोंड्यामुळे शेती करण्यालायक जमीन राहिलेली नाही. त्यामुळे येथील शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

दानवलीतील शेतकरी भाऊसाहेब दानवले, किसन दानवले आणि अन्य शेतकऱ्यांची शेती पावसाच्या पाण्याने वाहून गेली असून, शेत दगड-गोटे आणि माती यांनी पूर्णपणे भरून गेले आहे. या नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा पंचायत समितीचे कृषी अधिकारी आप्पा जाधव व कृषी अधिकारी संतोष जगताप यांनी केला आहे.

(कोट)

आमच्या वडिलांनी कष्ट करून तयार केलेली ही शेती नैसर्गिक आपत्तीने वाहून नेल्याने आमचे कधीही भरून न येणारे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनस्तरावरून आम्हाला मदतीचा हात मिळावा, हीच अपेक्षा.

- भाऊसाहेब दानवले, शेतकरी

फोटो आहे...

३१ पाचगणी

दानवली (ता. महाबळेश्वर) येथे अतिवृष्टीमुळे डोंगर काठावरील भातशेती पुराच्या पाण्याने वाहून गेली.