शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

अतिवृष्टीमुळे दहा मीटरचे ओढ्याचे पात्रे विस्तारले शंभर मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST

वाई : वाईच्या पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते, ओढे, घरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. बलकवडी धरणाच्या ...

वाई : वाईच्या पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते, ओढे, घरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. बलकवडी धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील डोंगराळ भागात असलेले गोळेगाव आणि गोळेवाडी गावातील कुटुंबांचे महाबळेश्वरच्या डोंगरावर तसेच परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे व दरड कोसळल्यामुळे होत्याचे नव्हते झाले. परिसरातील दहा फुटी रुंद ओढ्याचे पात्र शंभर फूट रुंद झाले.

या परिसरातील शेती, घरे व रस्ते पुलांचे मोठे नुकसान झाले. जागोजागी झालेल्या भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता असल्याची गरज ओळखून गोळेगाव आणि गोळेवाडीचे उपसरपंच जितेंद्र गोळे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गोळे यांनी प्रशासन, दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्था यांना मदतीचे आवाहन केले होते. त्याला सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी प्रतिसाद दिला. गोळेवाडी आणि गोळेगावामध्ये बाविचावाडा, जननी ओढा, रांजण ओढा, कृष्णाबाई नदी हे चार महत्त्वाचे पूल वाहून गेले होते.

आमदार मकरंद पाटील, उपसभापती विक्रम डोंगरे, धोम-बलकवडी प्रकल्प विभागाचे अभियंते अमर काशीद, येरेकर यांच्या सहकार्याने तीन पुलावर तात्पुरत्या स्वरूपाचे वाहन ये-जा करण्यासाठी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. रस्त्यामधील दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरड कोसळून शेतात आल्यामुळे अनेक एकर भात शेतीचे नुकसान झाल्याने जमीन नापीक झाली आहे. डोंगरामधील ग्रॅव्हिटीच्या पिण्याच्या पाण्याचे लाईन तुटून गेल्या आहेत. गोळेवाडीमध्ये घराची एक भिंत पडल्यामुळे शेळीचा मृत्यू झाला आहे.

चौकट

पाणी योजना सुरू करण्याबाबत सूचना

आमदार मकरंद पाटील, उपसभापती विक्रांत डोंगरे, धोम-बलकवडी प्रकल्प विभाग वाई यांच्या सहकार्यामुळे गोळेगावपर्यंत जाण्यासाठी चार ते पाच दिवसांमध्ये रस्ता तयार करून पूर्व पदावर आणण्याचे काम सुरू आहे. आमदार मकरंद पाटील यांनी वाई तालुक्याची आढावा बैठक घेतली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाणीपुरवठा योजना कशा सुरू करता येतील. पर्यायी व्यवस्था काय करता येईल याचा आढावा घेण्यात आला. पश्चिम भागातील पावसाच्या अतिवृष्टीमुळे ज्या गावांची ग्रॅव्हिटी जलवाहिनी नुकसानग्रस्त झाली त्या गोळेवाडी, गोळेगाव यांचे तातडीने पाणी कसे चालू करता येईल याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

प्रतिक्रिया

आरसीसी पूल केल्यास कायमस्वरूपी उपाय

अलीकडच्या वर्षांमध्ये अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. भूस्खलनच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. अशावेळी नदीचे पूल तग धरू शकत नाहीत. पश्चिम भागातील अतिवृष्टीमुळे पडलेले पूल आरसीसी कमानीचे केल्यास कायमस्वरूपीची उपाययोजना होईल, तसेच संभाव्य नुकसान टाळू शकते, अशी माहिती गोळेगाव येथील उपसरपंच जितेंद्र गोळे यांनी दिली.

१३वाई-रेन

वाई तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.