शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

अतिवृष्टीमुळे दहा मीटरचे ओढ्याचे पात्रे विस्तारले शंभर मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST

वाई : वाईच्या पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते, ओढे, घरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. बलकवडी धरणाच्या ...

वाई : वाईच्या पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते, ओढे, घरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. बलकवडी धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील डोंगराळ भागात असलेले गोळेगाव आणि गोळेवाडी गावातील कुटुंबांचे महाबळेश्वरच्या डोंगरावर तसेच परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे व दरड कोसळल्यामुळे होत्याचे नव्हते झाले. परिसरातील दहा फुटी रुंद ओढ्याचे पात्र शंभर फूट रुंद झाले.

या परिसरातील शेती, घरे व रस्ते पुलांचे मोठे नुकसान झाले. जागोजागी झालेल्या भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता असल्याची गरज ओळखून गोळेगाव आणि गोळेवाडीचे उपसरपंच जितेंद्र गोळे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गोळे यांनी प्रशासन, दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्था यांना मदतीचे आवाहन केले होते. त्याला सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी प्रतिसाद दिला. गोळेवाडी आणि गोळेगावामध्ये बाविचावाडा, जननी ओढा, रांजण ओढा, कृष्णाबाई नदी हे चार महत्त्वाचे पूल वाहून गेले होते.

आमदार मकरंद पाटील, उपसभापती विक्रम डोंगरे, धोम-बलकवडी प्रकल्प विभागाचे अभियंते अमर काशीद, येरेकर यांच्या सहकार्याने तीन पुलावर तात्पुरत्या स्वरूपाचे वाहन ये-जा करण्यासाठी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. रस्त्यामधील दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरड कोसळून शेतात आल्यामुळे अनेक एकर भात शेतीचे नुकसान झाल्याने जमीन नापीक झाली आहे. डोंगरामधील ग्रॅव्हिटीच्या पिण्याच्या पाण्याचे लाईन तुटून गेल्या आहेत. गोळेवाडीमध्ये घराची एक भिंत पडल्यामुळे शेळीचा मृत्यू झाला आहे.

चौकट

पाणी योजना सुरू करण्याबाबत सूचना

आमदार मकरंद पाटील, उपसभापती विक्रांत डोंगरे, धोम-बलकवडी प्रकल्प विभाग वाई यांच्या सहकार्यामुळे गोळेगावपर्यंत जाण्यासाठी चार ते पाच दिवसांमध्ये रस्ता तयार करून पूर्व पदावर आणण्याचे काम सुरू आहे. आमदार मकरंद पाटील यांनी वाई तालुक्याची आढावा बैठक घेतली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाणीपुरवठा योजना कशा सुरू करता येतील. पर्यायी व्यवस्था काय करता येईल याचा आढावा घेण्यात आला. पश्चिम भागातील पावसाच्या अतिवृष्टीमुळे ज्या गावांची ग्रॅव्हिटी जलवाहिनी नुकसानग्रस्त झाली त्या गोळेवाडी, गोळेगाव यांचे तातडीने पाणी कसे चालू करता येईल याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

प्रतिक्रिया

आरसीसी पूल केल्यास कायमस्वरूपी उपाय

अलीकडच्या वर्षांमध्ये अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. भूस्खलनच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. अशावेळी नदीचे पूल तग धरू शकत नाहीत. पश्चिम भागातील अतिवृष्टीमुळे पडलेले पूल आरसीसी कमानीचे केल्यास कायमस्वरूपीची उपाययोजना होईल, तसेच संभाव्य नुकसान टाळू शकते, अशी माहिती गोळेगाव येथील उपसरपंच जितेंद्र गोळे यांनी दिली.

१३वाई-रेन

वाई तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.