शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

स्फूरद, जस्ताचे प्रमाण कमी झाल्याने उत्पादकता घटली

By admin | Updated: December 5, 2015 00:24 IST

शेतीला शाप : सूक्ष्म मूलद्रव्ययुक्त खते वापरावी लागणार--जागतिक मृदा दिन

मेहरुन नाकाडे -- रत्नागिरी---शेतजमिनीमध्ये लोह, स्फूरद, जस्त आदी घटक असणे आवश्यक आहे. मात्र, जस्त व स्फूरद हे दोन्ही घटक कमी असल्याने जिल्ह्यातील पिकांची उत्पादकता घटत आहे. मातीतील स्फूरद व जस्त आदी घटकांचे प्रमाण वाढविण्यासाठी सूक्ष्म मूलद्रव्ययुक्त खते वापरावी लागणार आहेत. त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांना त्यासाठी आर्थिक भुर्दंड पडणार आहे.पिकांच्या वाढीसाठी १६ अन्नद्रव्ये आवश्यक असून, ही सर्व अन्नद्रव्ये हवा, पाणी आणि मातीमधून मिळतात. या अन्नद्रव्यांपैकी लोह, स्फूरद आणि जस्त आवश्यक आहेत. लोहाचे प्रमाण योग्य आहे. जस्त ७२.३९ टक्के व स्फूरद ७९ टक्के इतके कमी आहे. जस्त वाढवण्यासाठी हेक्टरी २५ किलो सूक्ष्म मूलद्रव्य वापरणे आवश्यक आहे, तर स्फूरदचे प्रमाण नत्र, स्फूरद व पालाशसारख्या मिश्र खताच्या वापरातून वाढेल. सेंद्रिय कर्ब ७१.७८ टक्के व पालाश ८४ टक्क्यांनी अधिक आहे.पावसामुळे दरवर्षी एक हेक्टर जमिनीतील १० ते ११ टन माती वाहून जाते. एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे लागतात. कोकणातील मातीची झीज होत आहे, शिवाय मातीतील घटकदेखील कमी आहेत. पिकाच्या मुळांच्या वाढीसाठी प्रामुख्याने सूक्ष्म मूलद्रव्याचे प्रमाण ५ पर मिलीयम इतके असणे आवश्यक आहे. परंतु हेच प्रमाण कमी असल्याने यामुळे मुळांची वाढ होत नाही. त्यामुळे पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. जस्ताचे प्रमाण कमी असल्याने पिकाला पक्वता येत नाही, याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होत आहे शासनाकडून मृद आरोग्य तपासणी अभियानांतर्गत जमिनीच्या सर्वसाधारण तपासणीमध्ये सामू, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फूरद, पालाश तपासणी करण्यात आली. विशेष मृद नमुन्यांतर्गत सामू, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फूरद, पालाश, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशिअम, मुक्त ुचुना, जलधारणा, मातीची घनता, पोत तर सूक्ष्म मूलद्रव्ये मृद नमुन्यांतर्गत तांबे, जस्त, लोह, मंगल याचीही स्वतंत्र तपासणी करण्यात येत आहे. शेतकरी परीक्षण अहवाल प्रयोगशाळेतून स्वतंत्ररित्या मिळवण्याचा प्रयत्न आजपर्यंत करीत होते. परंतु आता हे परीक्षण शासनाकडून विनामूल्य होत असल्याने शेतकरीवर्गाला आपल्या जमिनीचा पोत, सुपिकता, उत्पादनक्षमता याची माहिती मिळणार आहे. मातीतील घटकांचे प्रमाण कमी आढळल्यास त्याप्रमाणे कमी अधिक प्रमाणात खताचा डोस वाढवण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येणार आहे.लोहाचे प्रमाण ४.५ पीपीएमपेक्षा कमी आल्यास फेरस सल्फेट २५ ते ३० किलो वापरावे. तांब्याचे प्रमाण ०.२ पीपीएमपेक्षा कमी असेल तर १० ते १२ किलो कॉपर सल्फेट, मंगलचे प्रमाण २.० पीपीएमपेक्षा कमी आल्यास मॅग्नेशियम सल्फेट १० ते २५ किलो वापरावे. जस्तचे प्रमाण ०.६ पीपीएमपेक्षा कमी आल्यास २५ ते ३० किलो झिंक सल्फेट वापरण्याचा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे. त्यानुसार कृषी अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.जिल्ह्यातील १५२५ गावांतील साडेचार लाख शेतकऱ्यांच्या मातीच्या तपासणीचे काम सुरू आहे. १० हेक्टरला एक गट नमुन्याप्रमाणे ७५ हजार नमुन्यांची तपासणी तीन वर्षात पूर्ण केली जाणार आहे.मृददिनाचे औचित्य साधून ३१ हजार ४७९ शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे.तालुका तयार आरोग्य पत्रिकासंगमेश्वर ११, १३४चिपळूण११२३गुहागर१६८रत्नागिरी१२५लांजा६२२दापोली१७,५००मंडणगड १५९खेड४६८एकूण३१,४७९लोह, स्फूरद, जस्त यांच्या प्रमाणावर पिकांची उत्पादकता अवलंबून असते. मात्र, जस्त व स्फूरदचे प्रमाण कमी असल्याने या घटकांचा योग्य प्रमाणात पुरवठा होण्यासाठी शेतकऱ्यांनी गांडुळ खत, शेणखताचा वापर करावा. जस्तवाढीसाठी झिंक सल्फेट व स्फूरद वाढीसाठी मिश्र किंवा सरळ खते वापरावीत. त्याचबरोबर पिकाच्या वाढीसाठी स्फुरदयुक्त खतांचा वापर करावा. वर्षानुवर्षे शेतात एकाच पिकाचे उत्पादन घेण्याऐवजी त्यामध्ये सातत्य ठेवावे. माती परीक्षण करून त्याप्रमाणे आवश्यक त्या सूक्ष्म मूलद्रव्ययुक्त खतांचा कमी अधिक वापर करावा.- एस. सी. धाडवे, अधिकारी, रत्नागिरी जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी.