शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

ढगाळ हवामानामुळे कांद्यावर ‘होपा’चा प्रादुर्भाव

By admin | Updated: November 19, 2014 23:18 IST

आर्थिक संकट : शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

पळशी : माण तालुक्यात पळशी येथे ज्वारी, मका, कडधान्ये या पिकांबरोबरच कांद्याचे पीक घेणारे असंख्य शेतकरी आहेत. उशिरा का होईना दमदार पाऊस झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी कमी काळात जास्त पैसा मिळवून देणाऱ्या कांदा पिकाची लागवड केली आहे. पंधरा दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर ‘होपा’चा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कांद्याची पाती चिकटून बसल्या आहेत. यामुळे कांद्याची वाढ मंदावत आहे. त्याचा फटका कांद्याच्या एकूण उत्पादनावर होत आहे. अर्धवट वाढलेल्या कांद्याला बाजारात कवडीमोलाची किंमत मिळत आहे. त्यामुळे शेतकरी रोगास बळी पडलेल्या कांद्यावर औषध फवारणी करण्यात मग्न आहेत. औषधांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. ढगाळ वातावरणामुळे कांद्यावरील रोगाचे प्रमाण वाढतच असल्याने शेतकरी चिंतातूर आहे. त्यातच कांद्याचे दर दिवसेंदिवस घसरत असल्याने लागवड, खते, बियाणे, मशागत हा खर्चही निघेल का? अशी धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. (वार्ताहर)