शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

रस्त्यावर शुकशुकाट; बाजारपेठ ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:40 IST

संचारबंदीनंतरही आवश्यक कारणाच्या नावाखाली अनेकजण रस्त्यावर येत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या जुन्या आदेशानुसार किराणा, भाजीपाला विक्रीसह शेतीशी निगडित दुकाने सायंकाळपर्यंत सुरू ...

संचारबंदीनंतरही आवश्यक कारणाच्या नावाखाली अनेकजण रस्त्यावर येत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या जुन्या आदेशानुसार किराणा, भाजीपाला विक्रीसह शेतीशी निगडित दुकाने सायंकाळपर्यंत सुरू राहत होती. परिणामी, या-ना-त्या कारणाने रस्त्यावर वर्दळ सुरूच असायची. कऱ्हाड शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. मात्र, रस्त्यावरून फिरणाऱ्यांकडे चौकशी केली तरी अत्यावश्यक सेवेतील कारण सांगून नागरिक निघून जात होते. त्यामुळे गर्दी नियंत्रित करताना पोलीसही हतबल झाल्याचे चित्र होते. बॅरिकेड्स असूनही त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. मुख्य बाजारपेठेसह शहरातील इतर रस्त्यांवर गर्दी असायची. मात्र, मंगळवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी नवा आदेश काढून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू राहतील, असे सांगितल्यामुळे गर्दीवर त्याचा परिणाम झाला आहे. सकाळी अकरानंतर घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाली असून, रस्त्यावर तुरळक रहदारी दिसून येत आहे. दुपारच्या सुमारास रस्ते पूर्णपणे ओस पडत आहेत.

शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांचे शटर डाऊन असल्यामुळे दत्त चौकापासून आझाद चौक, चावडी चौक तसेच कन्या शाळा मार्गावर पूर्णपणे शुकशुकाट जाणवत आहे. तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही स्थानिक वगळता इतर कोणाचीही वर्दळ दिसून येत नाही.

- चौकट

पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

संचारबंदी लागू केल्यापासून ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्त्यावरील वाहने अडवनू पोलीस संबंधितांकडे घराबाहेर पडण्यामागचे कारण विचारीत होते. मात्र, बहुतांश कारणे अत्यावश्यक सेवेची असल्यामुळे पोलिसांनी वाहने अडवूनही उपयोग होत नव्हता. मात्र, आता दुकानेच बंद झाल्यामुळे रहदारीही रोडावली असून, पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

फोटो : २१केआरडी०१

कॅप्शन : कऱ्हाडात बुधवारी दिवसभर रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता.