शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळानं ठोठावलं जिल्ह्याचं पूर्वद्वार!

By admin | Updated: August 30, 2015 21:57 IST

पाणीटंचाईच्या तीव्र झळा : विहिरींनी गाठला तळ; तलावही पडले कोरडे, टँकर सुरू करण्याची मागणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर --धरणांच्या जिल्ह्यात पाण्याचा दुष्काळ

सातारा : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पावसानं पाठ फिरविल्यानं जिल्ह्याच्या पूर्व भागात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. विहिरींनी तळ गाठलाय, तर ठिकठिकाणचे तलाव कोरडे पडू लागलेत. उन्हाच्या तडाख्यानं पिकं करपू लागली आहेत, काही ठिकाणी शेतजमीन भेगाळू लागलीय. भरपावसाळ्यातच दुष्काळानं असा खेळ मांडल्यानं बळीराजा पुरता हतबल झालाय. प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आतापासून उपाययोजना आखायला हव्यात.आठ दिवसातून एक वेळ पाणी---सद्य:स्थितीत या भागातील देऊर, वाठार स्टेशन, विखळे, तडवळे, तळिये या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. या गावांना आठवड्यातून एकवेळ पाणीपुरवठा होत असून ऐन पावसाळ्यातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात या गावांचा पाणीप्रश्न कसा सुटणार, हाच या भागाचा प्रश्न आहे.प्रस्ताव देऊन अपुरी टँकर व्यवस्थाकोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावांनी पाणीटंचाईबाबत ग्रामसभा घेऊन प्रशासनाकडे पाण्याचे टँकर सुरू करण्यासंदर्भात मागणी केली आहे. पाठपुरावा करूनही प्रशासनाने याकडे कानाडोळा करत दोन गावांत आठवड्यातून एक टँकर असे नियोजन केले आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी टँकरकडून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.मूर्ती विसर्जनाचा प्रश्नकाही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या भागातील मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. मोठ्या मूर्ती येथील आकर्षण असतात. यंदा तलाव कोरडे पडू लागल्याने मोठ्या गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा मोठा प्रश्न मंडळांपुढे आहे.