शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कट्ट्यांची सोडत; ‘मंडईतला गोंधळ बरा होता!’

By admin | Updated: October 29, 2014 00:09 IST

प्रचंड गदारोळ : प्रतापसिंह महाराज भाजी व फ्रूट मार्केटमध्ये ‘बिनभाजीची मंडई’

सातारा : राजवाडा येथील प्रतापसिंह महाराज भाजी मंडई व फ्रूट मार्केटमधील भाजी विक्रेत्यांना कट्टे वाटपाची सोडत प्रचंड हलकल्लोळात पार पडली. कट्टे मिळण्याची साशंकता विक्रेत्यांना सतावत होती. याच साशंकतेमुळे त्यांचा गोंधळ अखेरपर्यंत सुरु होता. अनेकवेळा शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ८३ विक्रेत्यांना गाळे वाटप करण्यात आले.नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्षा दिनाज शेख, मुख्याधिकारी अभिजीत बापट, माजी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, शिवाजीराव पवार, मंडई विभागाचे अधिकारी प्रशांत निकम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी विक्रेते सुमारे १२ वाजल्यापासूनच उपस्थित होते. विक्रेत्यांनी सुरुवातीपासूनच गोंधळ घातल्याने या सोडतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मुख्याधिकाऱ्यांनी सोडतीच्या सुरुवातीलाच ३३ ते ३७ व ८0 ते ८४ क्रमांकाच्या कट्ट्यांचा लिलाव होणार नसल्याचे स्पष्ट केले. हे कट्टे शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. उर्वरित १२३ कट्ट्यांमध्ये सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आला. पालिकेकडे नोंदविलेल्या ८३ विक्रेत्यांची नावे एका बॉक्समध्ये आणि दुसऱ्या बॉक्समध्ये कट्ट्यांचे नंबर होते. उपस्थितांमधील वयस्कर महिलांनी दोन्ही बॉक्समधील एक-एक चिठ्ठी उचलून सोडत पार पडली. (प्रतिनिधी)मेढा८.०५पारगाव-खंडाळा५.३५वडूज७.६१विभागाचे एकुण१,०९,५९,०००पदाधिकारी-अधिकाऱ्यांसमोर गोंधळराजवाडा मंडईतील कट्टे वाटपाचा कार्यक्रम अनेक दिवस रखडला होता. ८३ विक्रेत्यांची नावे पालिकेकडे नोंद होती. त्यांचाच कट्टे वाटपाच्या सोडतीमध्ये सहभाग घेण्यात येणार होता. मात्र, सोडतीवेळी अनेक भाजी विक्रेते गोळा झाले. मुख्याधिकाऱ्यांनी सूचना करुन देखील विक्रेत्यांचा दंगा सुरुच होता. मंडईमध्ये माल विकताना जसा आवाज काढला जातो. तसाच आवाज याठिकाणीही सुरु होता. सोडतीवेळी पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमोर ही बिन भाजीची मंडईची भरल्याचे चित्र पाहायला मिळत होते. अनेकवेळा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना सूचना करुन शांत राहण्याचे आवाहन करायला लागले.राजवाडा येथील भाजी मंडई व फ्रूट मार्केटमधील कट्टे वाटपाची सोडत अत्यंत पारदर्शीपणे राबविली आहे. पहिल्यापासून जे याठिकाणी बसतात. त्यांनाच कट्टे वाटप झाले आहे. आणखी कट्टे उरले आहेत, त्याची सोडतही काही दिवसांनी काढण्यात येणार आहेत. रोजची पावती सोबत जोडून पालिकेकडे रीतसर अर्ज करणाऱ्यांना कट्टे वाटप केले जाईल.जाईबाई कोकरेंच्या डोळ्यांत आश्रूमंडईतील कट्ट्यांची सोडत काढली जात असताना प्रचंड गोंधळ सुरु होता. अनेक वर्षांपासून या मंडईत बसून विक्री करणाऱ्या बाया-बापड्या यावेळी जमल्या होत्या. यापैकी बहुतांश महिला वयस्कर असल्याने त्यांच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यांवर आणि पाणीदार डोळ्यांमध्ये साशंकता आणि उत्सुकतेचे भाव पाहायला मिळाले. अनेक वर्षे इथे भाजी विक्री केली, आता नवीन मार्केट बांधल्यानंतर येथील जागा आपल्याला मिळेल का?, अशी भीतीही त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होती. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सर्वप्रथम जाईबाई कोकरे यांचे नाव पुकारले. १0१ नंबरचा कट्टा त्यांना मिळाला तेव्हा जाईबाईंच्या मुखावर हासू तरळले.- अभिजीत बापट, मुख्याधिकारीपालिकेने सोडतीद्वारे ८३ भाजी विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी लावला. मात्र, आणखी बरेचसे विक्रेते आपल्याला कट्टा मिळाला नसल्याने नाराज होते. त्यांनी सोडतीनंतर गोंधळ घातला. पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमोर त्यांनी आपली नाराजी तीव्र शब्दांत व्यक्त केली. मुख्याधिकारी, नगराध्यक्ष सोडतीनंतर वाहनात बसल्यानंतर विक्रेत्यांनी त्यांना घेराव घातला. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करुन आमचे काय करणार? याबाबत जाब विचारला.काहींना ज्यादा गाळा मिळाले, आम्हाला एकही नाही, अशी तक्रारही त्यांनी मांडली. माजी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक यांच्यापुढेही त्यांनी नाराजी व्यक्त केली.