शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाला बगल का? - जावळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST

सातारा : येथील शासकीय मेडिकल कॉलेजसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव चर्चेत असताना, बरोबर याच नावाला बगल देऊन यशवंतराव ...

सातारा : येथील शासकीय मेडिकल कॉलेजसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव चर्चेत असताना, बरोबर याच नावाला बगल देऊन यशवंतराव चव्हाण यांचे नाव चमत्कारिकरीत्या आणि अचानकपणे पुढे आणले गेले आहे. यामध्ये राजकारण असून हे राजकारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध आहे, अशी भावना साहित्यिक अरुण जावळे यांनी व्यक्त केली आहे. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची प्रशासनाला ॲलर्जी आहे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

अरुण जावळे यांनी पुढे म्हटले आहे की, आंबेडकरांचे नाव मेडिकल कॉलेजला देण्यासाठीचा आंबेडकरवाद्यांचा आग्रह हा भावनिक नाही, तर त्याला मजबूत संदर्भाचे अधिष्ठान आहे. साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण गेले आहे. इथेच त्यांचे शालेय शिक्षणही झाले. याच मातीतून त्यांनी ज्ञानाच्या, प्रज्ञेच्या नभांगणात उंच भरारी घेऊन जगाचे लक्ष वेधून घेतले. अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांमधील विद्यापीठांत डॉ. आंबेडकराचे पुतळे गौरवाने उभे राहताना पाहायला मिळताहेत. आज जगामध्ये 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' अशी जी ओळख आहे, ती याच एकमेव महामानवाची !

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा विचार संविधानाच्या माध्यमातून या भारतभूमीत रुजवला. डॉ. आंबेडकर जेव्हा एखादे पत्र लिहीत असत तेव्हा ते 'जय शिवराय' या उद‌्घोषणेने पत्राची सुरुवात करीत. छत्रपती शिवरायांच्या बरोबरच, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज यांचे विचारकार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे आणले. मुळात विद्वत्तेचे, शिक्षणाच्या क्षेत्रातील उत्तुंग प्रतिभेचे आणि बॅरिस्टर असणारे तसेच ज्यावर देश चालतो, त्या भारताच्या संविधानाचा शिल्पकार असणारे व्यक्तिमत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे शिक्षणाशी संबंधित असणाऱ्या या मेडिकल कॉलेजसारख्या एखाद्या आस्थापनेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव असणे अधिक रास्त व औचित्यपूर्ण ठरणार आहे.

वास्तविक, मागील दीड-दोन वर्षांपासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आग्रही आहेत. त्यांनी निवेदने देण्याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रवेशद्वारात आंदोलनेही केली आहेत. अर्थात ही बाब प्रशासनासह संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहे. असे असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला बगल देणे योग्य नाही. यशवंतराव चव्हाण यांचे योगदान निश्चितच मोठे आहे. त्यांच्या एकूण कार्याचा आंबेडकरवाद्यांना अभिमान आहेच. तथापि, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव चर्चेत असताना, तशा पद्धतीची जिल्हाधिकारी यांच्यापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदने पोहोचली असताना, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने राजकारण व्हायला नको होते.