शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डोईवर हंडे... पायाला चटके!

By admin | Updated: May 26, 2015 00:52 IST

पाण्यासाठी डोंगर पालथा : पठारावरील गावांतील महिला, मुलं उन्हाचे चटके सोसत भरतायत झऱ्यातलं पाणी

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या डोंगरपठारावरील गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ लागले आहे. कुसुंबीमुरा, ता. जावळी येथील आखाडे वस्तीतील ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत कित्येक मैलांची पायपीट करत डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.डोंगर भागात पावसाचे प्रमाण जास्त असते; परंतु डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे परिसरातील कित्येक गावांमध्ये सध्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. कुसुंबीमुरा येथील दहा ते पंधरा कुटुंबे असणाऱ्या आखाडे वस्तीतील ग्रामस्थांना आतापर्यंत टाकीतून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होत होता. परंतु त्यातील पाणी कमी चालल्याने डोंगरातील झऱ्यावर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी होताना दिसत आहे. डोंगरदऱ्यातून पाणी भरावे लागत असल्याने छोट्या भांड्यांचा वापर केला जात आहे. झाडाझुडपातून मार्ग काढत लहान मुले, महिला पाणी मिळविण्यासाठी धडपड करत असताना पाहावयास मिळत आहेत. पावसाळा सुरू व्हायला अजून दहा दिवसांचा कालावधी आहे. तोही वेळेत पडला तर ठिक नाहीतर पठारावरील अनके गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाण्याची निकड भागविण्यासाठी लोक शेतीची कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करत आहेत. दिवसभर पाणी भरण्याचे एकच काम त्यांना करावे लागते. मुलांना उन्हाळी सुटी असल्यामुळे त्यांना पाणी भरण्याच्या कामासाठी जुंपले जात आहे. दिवसभर लहान मुले भांडी घेऊन झऱ्यावर तळ ठोकून बसत आहेत. हा झरा लोकवस्तीपासून काही मैल अंतरावर असल्यामुळे आपल्या कुटुंबाची तहान भागविण्यासाठी महिलांना डोंगरातून कडक उन्हाचा सामना करत डोक्यावरून पाणी भरावे लागत आहे. डोंगर पठारावर पावसाचे पाणी अडविण्यासाठी चरी काढल्यास पाणीटंचाई जाणवणार नाही. सध्या डोंगर पठारावरील नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (वार्ताहर)उन्हाने झरेही लागले आटूउन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गरज भागविणारे डोंगरकपारीतील झरेही आता आटू लागले आहेत. डोंगरावर मैलोन्मैल पायपीट करून झऱ्याचे पाणी डोक्यावरून आणले जात आहे. लहान मुले, महिला यांना पाण्याच्या शोधासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरातील शेती व पशुपालन हा मुख्य व्यवसाय आहे. सध्या उन्हामुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाऊस वेळेत पडला नाही तर तीव्र टंचाईचा सामना करावा लागणार आहे.- ज्ञानेश्वर आखाडे, ग्रामस्थ, आखाडे वस्ती...सुटीत मुलांना पाणी भरण्याचे कामशाळांना सुटी लागली असली तरी डोंगर पठारावरील अनेक गावांमधील मुलांना सुटीचा आनंद घेता येत नाही. कुटुंबाची तहान भागविण्यासाठी त्यांनाही पाणी भरण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.जनावरांचेही हालडोंगरी भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अद्याप भेडसावत नसला तरी पाण्यासाठी गुराख्यांना डोंगरावर झऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.