शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

डोईवर हंडे... पायाला चटके!

By admin | Updated: May 26, 2015 00:52 IST

पाण्यासाठी डोंगर पालथा : पठारावरील गावांतील महिला, मुलं उन्हाचे चटके सोसत भरतायत झऱ्यातलं पाणी

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या डोंगरपठारावरील गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ लागले आहे. कुसुंबीमुरा, ता. जावळी येथील आखाडे वस्तीतील ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत कित्येक मैलांची पायपीट करत डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.डोंगर भागात पावसाचे प्रमाण जास्त असते; परंतु डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे परिसरातील कित्येक गावांमध्ये सध्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. कुसुंबीमुरा येथील दहा ते पंधरा कुटुंबे असणाऱ्या आखाडे वस्तीतील ग्रामस्थांना आतापर्यंत टाकीतून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होत होता. परंतु त्यातील पाणी कमी चालल्याने डोंगरातील झऱ्यावर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी होताना दिसत आहे. डोंगरदऱ्यातून पाणी भरावे लागत असल्याने छोट्या भांड्यांचा वापर केला जात आहे. झाडाझुडपातून मार्ग काढत लहान मुले, महिला पाणी मिळविण्यासाठी धडपड करत असताना पाहावयास मिळत आहेत. पावसाळा सुरू व्हायला अजून दहा दिवसांचा कालावधी आहे. तोही वेळेत पडला तर ठिक नाहीतर पठारावरील अनके गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाण्याची निकड भागविण्यासाठी लोक शेतीची कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करत आहेत. दिवसभर पाणी भरण्याचे एकच काम त्यांना करावे लागते. मुलांना उन्हाळी सुटी असल्यामुळे त्यांना पाणी भरण्याच्या कामासाठी जुंपले जात आहे. दिवसभर लहान मुले भांडी घेऊन झऱ्यावर तळ ठोकून बसत आहेत. हा झरा लोकवस्तीपासून काही मैल अंतरावर असल्यामुळे आपल्या कुटुंबाची तहान भागविण्यासाठी महिलांना डोंगरातून कडक उन्हाचा सामना करत डोक्यावरून पाणी भरावे लागत आहे. डोंगर पठारावर पावसाचे पाणी अडविण्यासाठी चरी काढल्यास पाणीटंचाई जाणवणार नाही. सध्या डोंगर पठारावरील नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (वार्ताहर)उन्हाने झरेही लागले आटूउन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गरज भागविणारे डोंगरकपारीतील झरेही आता आटू लागले आहेत. डोंगरावर मैलोन्मैल पायपीट करून झऱ्याचे पाणी डोक्यावरून आणले जात आहे. लहान मुले, महिला यांना पाण्याच्या शोधासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरातील शेती व पशुपालन हा मुख्य व्यवसाय आहे. सध्या उन्हामुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाऊस वेळेत पडला नाही तर तीव्र टंचाईचा सामना करावा लागणार आहे.- ज्ञानेश्वर आखाडे, ग्रामस्थ, आखाडे वस्ती...सुटीत मुलांना पाणी भरण्याचे कामशाळांना सुटी लागली असली तरी डोंगर पठारावरील अनेक गावांमधील मुलांना सुटीचा आनंद घेता येत नाही. कुटुंबाची तहान भागविण्यासाठी त्यांनाही पाणी भरण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.जनावरांचेही हालडोंगरी भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अद्याप भेडसावत नसला तरी पाण्यासाठी गुराख्यांना डोंगरावर झऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.