शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

‘रेमडेसिविर’बाबत राजकारण करू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:36 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाडात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेत विविध ठिकाणांना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेटी दिल्या. त्यावेळी पत्रकारांशी ते ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाडात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेत विविध ठिकाणांना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेटी दिल्या. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, मुख्याधिकारी रमाकांत डाके, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, रेमडेसिविर इंजेक्शनचा राज्यात जेवढा साठा आहे आणि त्याची ज्याठिकाणी गरज आहे, त्याठिकाणी ते पोहोच करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गरज असणाऱ्यांनाच इंजेक्शन द्यावे, असे शासनाचे आदेश आहेत. इंजेक्शनचा राज्यात तुटवडा आहे. मात्र, तरीही शासन ते उपलब्ध करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे. काही राज्यांमध्ये मुबलक साठा असला तरी त्यांनी ते बाहेर न देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातही काहीजणांकडे इंजेक्शनचा साठा आहे. काही साठेबाजांवर सरकारने कारवाई केली असून, इतर साठेबाजांची माहिती संकलित केली जात आहे.

शासनाने घातलेल्या निर्बंधातून अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळली आहेत. मात्र, अत्यावश्यक कारणाच्या नावाखाली कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. कोरोनाची लाट गंभीर असून, प्रत्येकाने काळजी घ्यावी. नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

- चौकट

औद्योगिक ऑक्सिजन रुग्णांना द्या !

राज्य शासनाने औद्योगिक कारणासाठी दिला जाणारा ऑक्सिजन पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. तो ऑक्सिजन रुग्णांसाठी देण्याचे आदेश दिले आहेत. सातारा जिल्ह्यातही ज्याठिकाणी ऑक्सिजन निर्मिती होत आहे त्या सर्वांना ऑक्सिजन रुग्णांसाठी देण्याचे आदेश दिले असून, त्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचेही मंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

- चौकट

केंद्राकडून राज्याला मदत अपेक्षित !

केंद्र सरकार रेमडेसिविर इंजेक्शनबाबत राज्याला सहकार्य करीत नाही. केंद्राकडे इंजेक्शनचा साठा आहे. मात्र, ज्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, त्या प्रमाणात केंद्राकडून राज्याला इंजेक्शन दिले जात नाही. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील स्थिती लक्षात घेऊन केंद्राने मदत करणे अपेक्षित आहे, असेही मंत्री पाटील म्हणाले.

फोटो : १८केआरडी०३

कॅप्शन : कऱ्हाडातील भाजी मंडईसह विविध ठिकाणांची सहकार व पणनमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी रविवारी पाहणी केली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.