शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

घरटं सोडायचं नाही... काळजी घ्यायची..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:39 IST

मसूर : कोरोना संसर्ग वाढत असतानाही लोक विनाकारण बाहेर पडत आहेत. रस्त्यावर गर्दी करत आहेत. हे चित्र पाहिल्यानंतर आपण ...

मसूर : कोरोना संसर्ग वाढत असतानाही लोक विनाकारण बाहेर पडत आहेत. रस्त्यावर गर्दी करत आहेत. हे चित्र पाहिल्यानंतर आपण वाहक की देशाचा सहाय्यक बनणार?

असा प्रश्न निर्माण होता. लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी ‘घरटं सोडायचं नाही, काळजी घ्या', असा

सामाजिक संदेश चित्राद्वारे दिला आहे.

राज्यात कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. कोरोना साखळी तोडण्यासाठी एक प्रकारे हा कडक लाॅकडाऊन असणार आहे. शासन व प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांकडून तशाच प्रकारचा प्रतिसाद अपेक्षित आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना ‘कोरोना संसर्गाचा वाहक की देशाचा सहाय्यक बनणार? असा प्रश्न विचारत ‘घरटं सोडायचं नाही, काळजी घ्या’. असा संदेश छायाचित्रातून राज्याचे प्राथमिक तथा प्रौढ व अल्पसंख्याक शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे.

कोरोनाबाबत जनजागृतीची अनेक पोस्टर्स त्यांनी सोशल मीडियावर प्रकाशित केली आहेत, त्यापैकी 'कोरोना संसर्गाचा वाहक की, देशाचा सहाय्यक बनणार?' आणि 'घरटं सोडायचं नाय...!' ही त्यांनी पोस्ट केलेली छायाचित्रे खूपच व्हायरल झाली आहेत.

कोरोना विषाणू

तुमच्या घरी येणार नाही,

जोपर्यंत तुम्ही त्याला

आणायला बाहेर जात नाही. डाॅक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे

माणसांतील देवांना सलाम, कोरोनाची

साखळी तोडायचीय... कुटुंबाला आणि देशाला

कोरोनापासून वाचवायचंय...,

लक्षात ठेवा, ही लढाई जिंकायची आहे, हरायची नाहीय...,

बहिरे व्हा

अफवांना थारा देऊ नका

अफवा

कोरोनापेक्षा

भयंकर

असू शकतात,

अशा शब्द व चित्ररुपी संदेशांचा त्यात समावेश आहे.

यापूर्वी क्षीरसागर यांनी सातारा येथे जिल्हास्तरावर काम करत असताना शैक्षणिक उपक्रमाबरोबरच कोरोना जागृतीचे अनेक उपक्रम राबविले, त्याचे राज्यभर कौतुक झाले.

फोटो जगन्नाथ कुंभार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी 'घरटं सोडायचं नाही, काळजी घ्या' असा संदेश चित्रातून दिला आहे.