शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘पेनकिलर’मुळं ‘पेनफुल’ अंत नकोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : वैश्विक पातळीवरील बदलती मानवी जीवनशैली व त्यामध्ये आलेले बदल यामुळे कळत-नकळत आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या गिधाडांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : वैश्विक पातळीवरील बदलती मानवी जीवनशैली व त्यामध्ये आलेले बदल यामुळे कळत-नकळत आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या गिधाडांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पाळीव पशुधनामध्ये वेदनाशामक म्हणून वापरले जाणारे ‘डायक्लोफिनॅक’ या पेनकिलर औषधाच्या वापरामुळे व अशा औषधाचा वापर केलेल्या मृत जनावरांचे या गिधाडांनी मांसभक्षण केल्यामुळे ही समस्या प्रामुख्याने निर्माण झालेली आहे.

भारत सरकारमार्फत त्याकरिता २०२० ते २०२५ या कालखंडात त्यांच्या संवर्धनाकरिता कृती आराखडा तयार करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक येथे गिधाड संवर्धन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. १९९० च्या दरम्यानपासून यांची संख्या कमालीची घटली असून, किंबहुना महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांमधून यांचे अस्तित्व नष्ट झाल्याचे दिसून येते.

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीचा भाग वगळता आणि मध्य मराठवाडा तसेच विदर्भातील काही ठिकाणे वगळता त्यांचे अस्तित्व जवळपास नाहीसे झालेले आहे. पूर्वीच्या काळी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्र क्षेत्रामध्ये त्यांची चांगली संख्या दिसून येत होती. थोरा-मोठ्यांनी तर त्यांच्या गावकुसाबाहेर गावातील मृत जनावरांच्या शरीरावर गिधाडांचे थवेच्या थवे पाहिल्याचे अनेक दाखले आहेत.

निसर्गामध्ये कोणताही जीव जन्मास आला तर त्याला जगण्याचा पूर्ण अधिकार निसर्गत: असतोच आणि त्याची जैव शृंखलेमध्ये ठराविक अशी भूमिका ठरलेली असते. यानुसारच गिधाड हा मृतभक्षी व स्वच्छतारक्षक म्हणून निसर्गामध्ये काम करीत असून, त्याद्वारे त्यामधून पसरणाऱ्या रोगराईस अटकाव करण्याचे कामदेखील तो करीत असतो. पूर्वीच्या काळी गावा-नगरांमध्ये पाळीव मृत जनावरे उघड्यावर टाकण्याची पद्धती होती. सध्या या पद्धतीमध्ये एक चांगला बदल जरूर झालेला आहे की जो म्हणजे अशी जनावरे आता उघड्यावर न टाकता त्यास पुरणे अथवा दहन केले जाते. साहजिकच नैसर्गिक अन्न दुर्भिक्षासह गिधाडांना मानवी अशा जैव कचऱ्यामधून मिळणारे अन्नदेखील मिळेनासे झाले आणि जे मिळत होते ते डायक्लोफिनॅकयुक्त.

चौकट :

भारतात अस्तित्वात असणारी गिधाडे

भारतामध्ये प्रामुख्याने गिधाडांच्या प्रामुख्याने ९ प्रजाती आढळून येतात. त्यामध्ये व्हाईट रंप्ड, लॉन्ग बिल्ड, स्लेंडर बिल्ड, रेड हेडेड, सिनेरस, हिमालयीन, इजिप्शियन, बर्डेड व युरेशियन या प्रजातींचा समावेश होतो. यापैकी युरेशियन हे इतर देशांमधून स्थलांतर करून येणारे गिधाड वगळता बाकी सर्व प्रजाती या भारताच्या स्थानिक प्रजाती आहेत. यामधील व्हाईट रंप्ड व लाँग बिल्ड ही महाराष्ट्रात सर्वदूर आढळणारी गिधाडे सध्या कशीबशी तग धरून आहेत. ‘आययूसीएन’च्या स्थिती निर्देशक मानकांनुसार ही भारतीय गिधाडे सध्या अति संकटग्रस्त व नामशेष होण्याच्या धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलेली आहेत.

उबवण्याच्या अंड्याचे कवचही पातळ

गिधाडांच्या जीवनचक्रामध्ये वयाच्या ७ व्यावर्षी ती प्रजननक्षम होतात व त्यावेळी मादी १ अंडे देते. डायक्लोफिनॅकमुळे या अंड्यांची कवचदेखील पातळ होऊन मादी त्यावर बसल्यावर ती फुटत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. यासह या औषधामुळे गिधाडांच्या मूत्रपिंडांवर देखील विपरित परिणाम होऊन ती मृत्युमुखी पडली. जनावरांमधील डायक्लोफिनॅक औषधाचा वापर थांबवून आणि उघड्यावर जनावरांचे मिळणारे अन्न या दोन्हींचा पर्याय देण्याबरोबरच जंगल अधिवासातील मानवी हस्तक्षेप कमी करून हा निसर्ग शृंखलेतील स्वच्छतेचा वारसा पुढच्या पिढ्यांसाठी टिकवून ठेवणे महत्त्वाचे ठरेल.

कोट

२००० मध्ये पाकिस्तानमध्ये केलेल्या गिधाडांच्या शवविच्छेदन अहवालामध्ये प्रथमत: ही गोष्ट सुस्पष्ट झालेली आहे. एकंदरच घटते वनक्षेत्र अधिवास नष्ट होणे यामुळे नैसर्गिकरित्या अन्न दुर्भिक्षामुळे गिधाडांच्या संख्येत कमालीची घट झालेली होती. त्यातच डायक्लोफिनॅकची भर पडल्याने गिधाडांची हाडे ठिसूळ होऊन अगदी हवेत उडतानाच पंख तुटून जमिनीवर पडून मेल्याचे दाखले दिले जातात.

- सुनील भोईटे, मानद वन्यजीवरक्षक, सातारा