शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

घरी नका येऊ... बघा, शक्य असेल तर मुक्काम वाढवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविड रुग्णांमध्ये रोज हजारांची भर पडत असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर त्याचा भलताच ताण आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविड रुग्णांमध्ये रोज हजारांची भर पडत असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर त्याचा भलताच ताण आहे. उपलब्ध संसाधनांमध्येही अधिकाधिक रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्र प्रयत्नशील आहे. मात्र, बरे झालेल्या रुग्णांना न्यायला यायला नातेवाइकांनी पाठ दाखविल्याने अत्यवस्थ रुग्णांचे जीव धोक्यात येऊ लागले आहेत. रुग्णवाहिकेत रुग्ण वेटिंगवर असताना सरकारी रुग्णालयात बरे झालेल्या रुग्णांना घरी घेऊन जाण्यासाठी विनंती करावी लागत आहे.

मुंबई आणि पुण्याप्रमाणेच साताऱ्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत जाणाऱ्या रुग्णांना सुविधा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर मर्यादा येत आहेत. वर्षभर सलग कामाचा ताण जाणवणाऱ्या आरोग्य क्षेत्रावर आता नातेवाइकांच्या या भूमिकेमुळे हतबल व्हायची वेळ आली आहे. कोणाची काहीही अडचण असली तरीही जागतिक महामारीच्या या काळात सर्वांनीच सहकार्य करणे अपेक्षित आहे. घरी रुग्णाला ठेवायची सोय नाही, घर लहान आहे, त्यांची काळजी घ्यायला कोणी नाही, अशी कारणं सांगून खरोखर गरज असणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय सेवा न मिळू देणे ही या व्यवस्थेशी केलेली प्रतारणा आहे.

शासकीय रुग्णालयांत मोफत सोय असल्याने केवळ तिथंच रुग्णांना ठेवण्याचा आग्रह नातेवाईक करीत आहेत. याउलट खाजगीत वाढत्या बिलाच्या भीतीने अगदी चार दिवसांतही रुग्णाला सोडा म्हणणारे नातेवाईक आहेत. घेता घेता देणाऱ्याचे हात काढून घेण्याची वृत्ती वेळीच बदलली नाही तर त्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात येऊ शकतात.

सुनेचं बाळंतपण तर कधी घर लहान असल्याचं दिलं जातंय कारण

साताऱ्यातील जम्बो कोविड सेंटर किंवा जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या काही दिवसांत बेडच शिल्लक नाहीत, अशी अवस्था आहे. अशातच रुग्णालयातील उपचार संपवून ज्यांना घरी जाणं शक्य आहे, त्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून रुग्णांना रुग्णालयात ठेवण्याचा आग्रह करण्यात येत आहे. कोणाकडे विलगीकरणाची सोय नाही तर कोणाला कुटुंबात हा संसर्ग होईल याची भीती वाटते. कोणाला गर्भवती लेकी-सुनांच्या जिवाला घोर नको म्हणून रुग्णालयातच राहायचं असल्याचं कारण दिलं जात आहे.

हा अट्टाहास अनेकांच्या जिवावर

गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येचा विस्फोट झाला आहे. शासकीय रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांच्या आवारात रुग्णवाहिकेत रुग्ण वेटिंगवर असल्याचं सर्रास पाहायला मिळतंय. ऑक्सिजन बेड न मिळाल्याने मृत्यू होण्याचे प्रकारही घडलेत. जम्बो सेंटरमध्ये तर अत्यावस्थ रुग्ण आल्यानंतर दाखल झालेल्यांपैकी ज्यांना बरे वाटतेय त्यांना डिस्चार्ज दिला जातोय. पण, उपचार पूर्ण झाल्यानंतरही काही रुग्णांना न्यायला त्यांचे नातेवार्ईक येत नसल्याने प्रशासनापुढे वेगळेच संकट उभे राहिले आहे. रुग्ण आणि नातेवाइकांच्या या अट्टाहासामुळे गरजू रुग्णांना प्राणास मुकावे लागण्याची शक्यता आहे.

कोट :

दवाखान्याबाहेर रुग्णवाहिकेत रुग्ण वेटिंगला असल्याने ज्यांना रुग्णालयात उपचारांची गरज नाही, त्यांना घरी सोडण्याचा निर्णय आम्ही घेतोय. बाहेरची परिस्थिती सर्वांना ज्ञात आहे, अशावेळी रुग्णांना रुग्णालयात न्यायला न येणे, आमची अडचण आहे, आज नाही यायला जमायचं अशी कारणे दिली जातात. बरे झालेल्या रुग्णांमुळे बेड अडकून राहतो यावर आम्ही नातेवाइकांना समजावून सांगून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय.

- डॉ. भाऊसाहेब पवार, जम्बो कोविड हॉस्पिटल, सातारा