शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

घरी नका येऊ... बघा, शक्य असेल तर मुक्काम वाढवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविड रुग्णांमध्ये रोज हजारांची भर पडत असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर त्याचा भलताच ताण आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविड रुग्णांमध्ये रोज हजारांची भर पडत असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर त्याचा भलताच ताण आहे. उपलब्ध संसाधनांमध्येही अधिकाधिक रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्र प्रयत्नशील आहे. मात्र, बरे झालेल्या रुग्णांना न्यायला यायला नातेवाइकांनी पाठ दाखविल्याने अत्यवस्थ रुग्णांचे जीव धोक्यात येऊ लागले आहेत. रुग्णवाहिकेत रुग्ण वेटिंगवर असताना सरकारी रुग्णालयात बरे झालेल्या रुग्णांना घरी घेऊन जाण्यासाठी विनंती करावी लागत आहे.

मुंबई आणि पुण्याप्रमाणेच साताऱ्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत जाणाऱ्या रुग्णांना सुविधा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर मर्यादा येत आहेत. वर्षभर सलग कामाचा ताण जाणवणाऱ्या आरोग्य क्षेत्रावर आता नातेवाइकांच्या या भूमिकेमुळे हतबल व्हायची वेळ आली आहे. कोणाची काहीही अडचण असली तरीही जागतिक महामारीच्या या काळात सर्वांनीच सहकार्य करणे अपेक्षित आहे. घरी रुग्णाला ठेवायची सोय नाही, घर लहान आहे, त्यांची काळजी घ्यायला कोणी नाही, अशी कारणं सांगून खरोखर गरज असणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय सेवा न मिळू देणे ही या व्यवस्थेशी केलेली प्रतारणा आहे.

शासकीय रुग्णालयांत मोफत सोय असल्याने केवळ तिथंच रुग्णांना ठेवण्याचा आग्रह नातेवाईक करीत आहेत. याउलट खाजगीत वाढत्या बिलाच्या भीतीने अगदी चार दिवसांतही रुग्णाला सोडा म्हणणारे नातेवाईक आहेत. घेता घेता देणाऱ्याचे हात काढून घेण्याची वृत्ती वेळीच बदलली नाही तर त्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात येऊ शकतात.

सुनेचं बाळंतपण तर कधी घर लहान असल्याचं दिलं जातंय कारण

साताऱ्यातील जम्बो कोविड सेंटर किंवा जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या काही दिवसांत बेडच शिल्लक नाहीत, अशी अवस्था आहे. अशातच रुग्णालयातील उपचार संपवून ज्यांना घरी जाणं शक्य आहे, त्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून रुग्णांना रुग्णालयात ठेवण्याचा आग्रह करण्यात येत आहे. कोणाकडे विलगीकरणाची सोय नाही तर कोणाला कुटुंबात हा संसर्ग होईल याची भीती वाटते. कोणाला गर्भवती लेकी-सुनांच्या जिवाला घोर नको म्हणून रुग्णालयातच राहायचं असल्याचं कारण दिलं जात आहे.

हा अट्टाहास अनेकांच्या जिवावर

गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येचा विस्फोट झाला आहे. शासकीय रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांच्या आवारात रुग्णवाहिकेत रुग्ण वेटिंगवर असल्याचं सर्रास पाहायला मिळतंय. ऑक्सिजन बेड न मिळाल्याने मृत्यू होण्याचे प्रकारही घडलेत. जम्बो सेंटरमध्ये तर अत्यावस्थ रुग्ण आल्यानंतर दाखल झालेल्यांपैकी ज्यांना बरे वाटतेय त्यांना डिस्चार्ज दिला जातोय. पण, उपचार पूर्ण झाल्यानंतरही काही रुग्णांना न्यायला त्यांचे नातेवार्ईक येत नसल्याने प्रशासनापुढे वेगळेच संकट उभे राहिले आहे. रुग्ण आणि नातेवाइकांच्या या अट्टाहासामुळे गरजू रुग्णांना प्राणास मुकावे लागण्याची शक्यता आहे.

कोट :

दवाखान्याबाहेर रुग्णवाहिकेत रुग्ण वेटिंगला असल्याने ज्यांना रुग्णालयात उपचारांची गरज नाही, त्यांना घरी सोडण्याचा निर्णय आम्ही घेतोय. बाहेरची परिस्थिती सर्वांना ज्ञात आहे, अशावेळी रुग्णांना रुग्णालयात न्यायला न येणे, आमची अडचण आहे, आज नाही यायला जमायचं अशी कारणे दिली जातात. बरे झालेल्या रुग्णांमुळे बेड अडकून राहतो यावर आम्ही नातेवाइकांना समजावून सांगून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय.

- डॉ. भाऊसाहेब पवार, जम्बो कोविड हॉस्पिटल, सातारा