शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

बाधितांना ताटकळत ठेवणे मुख्यमंत्र्यांना शोभते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:38 IST

कऱ्हाड : राज्याचे मुख्यमंत्री अद्याप हवेतच आहेत आणि मनसे जमिनीवर आहे. मनसे आजही तळागाळात पोहोचते. मुख्यमंत्र्यांना जनतेसाठी वेळ नाही. ...

कऱ्हाड : राज्याचे मुख्यमंत्री अद्याप हवेतच आहेत आणि मनसे जमिनीवर आहे. मनसे आजही तळागाळात पोहोचते. मुख्यमंत्र्यांना जनतेसाठी वेळ नाही. खराब हवामान आणि पावसाची कारणे देऊन वेळकाढूपणा करणे आणि बाधितांना ताटकळत ठेवणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभते का, असा प्रश्न मनसेचे प्रवक्ता संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.

कोयना नगर विभागात भुस्खलनातील बाधित भागाची पाहणी, तसेच स्थलांतरित ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संतोष धुरी, रवींद्र शेलार, गोरख नारकर, दयानंद नलवडे, आदी उपस्थित होते.

संदीप देशपांडे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना या बाधित कुटुंबीयांना भेटायला यायचे असते तर ते कसेही आले असते आणि त्यांच्या व्यथा जाणल्या असत्या. येथील परिस्थिती त्यांना समजली असती. राज्याच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्री, नेते, सामाजिक कार्यकर्ते शक्य होईल त्यामार्गाने पाटण तालुक्यात धाव घेत आहेत; मात्र मुख्यमंत्र्यांना ते जमत नाही, हे दुर्दैव आहे. बाधितांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे कटिबद्ध असून, त्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही संदीप देशपांडे यांनी यावेळी दिली.

फोटो : २६ केआरडी ०३

कॅप्शन : कोयना नगर विभागातील बाधित ग्रामस्थांशी मनसेचे प्रवक्ता संदीप देशपांडे यांनी चर्चा केली.