शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

ना सुनेचं, ना राणीचं.. सातारकर

By admin | Updated: November 9, 2016 01:09 IST

नव्या चेहऱ्यांचे आक्रमक विचार !

सातारा : ‘नगराध्यक्षपदासाठी माझ्याविरोधात साताऱ्याच्या सुना उभ्या आहेत. मात्र, सातारकरांची लेक म्हणून मी नगराध्यक्षपदासाठी उभी आहे. ना सुनेचं... ना राणीचं...सातारकर ऐकतील आपल्या लेकीचं! असं माझं ठाम मत आहे. एकमेकांवर टीका करून माझ्या विरोधातील उमेदवारांनी आपली जागा दाखवून दिली आहे, यामुळे जनतेचे चांगलेच मनोरंजनही झाले,’ अशी बोचरी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रिया बाबर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केली. प्रिया बाबर म्हणाल्या, ‘मी साताऱ्यात जन्माला आले आणि साताऱ्यातच वाढले आहे. त्यामुळे सातारकरांच्या समस्या मी जवळून अनुभवल्या आहेत. शहरात वीज, पाणी, आरोग्य या मूळ समस्या कायम आहेत. शहरात कास तलाव, शहापूर पाणी योजना व कृष्णा नदीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो; तरीही साताऱ्यात मुबलक पाणीपुरवठा होत नाही. शहापूर योजना ही मोठी खर्चिक असली तरी ती सातारकरांच्या माथी मारण्यात आलेली आहे. कास तलावाच्या माध्यमातून सायफन पद्धतीने कमी खर्चात शहराला पाणी मिळते, परंतु या योजनेच्या विकासाकडे सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे.’ ‘माझ्या वडिलांची विकासाची भूमिका पुढे घेऊन जाताना मला मनसे हाच पक्ष योग्य वाटला. इतर पक्ष वारंवार भूमिका बदलत आहेत. मनोमिलनाच्या सत्तेत असणारा भाजप आता दूर असला तरी काही दिवसांनी ते पुन्हा मनोमिलनासोबतच जातील, अशी शक्यता आहे. त्यामुळे साताऱ्याला विकासाच्या मार्गावर न नेता आणखी मागे ठेवण्यात हे पक्ष भूमिका बजावत आले आहेत, हा विचार करूनच निर्णय घेतला.’ भूमिका बदलणाऱ्यांपेक्षा निष्ठेने आपलं काम करत राहणाऱ्यांचा माझ्या मनात आदरभाव आहे. माझे वडील अ‍ॅड. बाळासाहेब बाबर यांनी निष्ठेने शहरात नगरसेवक म्हणून सेवा बजावली आहे. माझे मार्गदर्शक संदीप मोझर हे सल्ला देतात. इतरांप्रमाणे ते आदेश देत नाहीत. साताऱ्यात अपेक्षित रोजगार उपलब्ध नसल्याने बाहेरगावी तरुणींना नोकरीला पाठवणे अनेक कुटुंबीयांना असुरक्षित वाटते. अशा अनेक मुली याचमुळे शिक्षण घेऊन घरी बसलेल्या आहेत.’ निवडणुकीआधीच मनोमिलन होणार की नाही, याच चर्चेभोवती सातारकरांना घोंगावत ठेवण्यात आलं, असंही प्रिया बाबर म्हणाल्या, मनोमिलन हा त्यांचा घरगुती विषय आहे. तो साताऱ्यातील संपूर्ण जनतेचा विषय नाही. महिनाभर सातारकरांचे नको तिकडे लक्ष वेधले गेले. शहर अगतिक राजेशाहीकडेच झुकले आहे, हेच यातून स्पष्ट होते. ‘मी शिस्त लावण्यासाठी पालिकेत येत आहे,’ असं म्हणून वेदांतिकाराजे भोसले यांनी समस्त सातारकरांवर बेशिस्त हा ठपका ठेवला आहे, अशी टीकाही प्रिया बाबर यांनी केली. मनोमिलनाच्या सत्तेला नगराध्यक्षपदाचाही आदर नव्हता. केवळ नावापुढे नगराध्यक्षपद लागावे, यासाठी शहरात मनोमिलनातील सत्तेत असणाऱ्या नगरसेवकांची स्पर्धाच सुरू होती. अनेक गुणवंतांना सत्तेपासून डावललं गेलं. ४० दिवसांचा नगराध्यक्ष, असा हास्यास्पद प्रकार केवळ साताऱ्यात पाहायला मिळाला, अशी खरमरीत टीकाही बाबर यांनी केली.