शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

काळा पैसा रोखण्यासाठी जनतेला वेठीस धरू नका

By admin | Updated: November 11, 2016 23:00 IST

पृथ्वीराज चव्हाण : ... मग दोन हजारांच्या नोटांची गरज काय?

कऱ्हाड : काळ्या पैशाच्या लढाईविरोधात घेतलेला कोणताही निर्णय हा स्वागतार्ह आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेने काढलेल्या पत्रकात त्यांनी जे खुलासे दिले आहेत, ते संशयास्पद आहेत. कोणतीही गोष्ट पाकिस्तानशी जोडायची आणि राष्ट्रपे्रम असल्याचा कांगावा करायचा, हे बरोबर नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये जो खुलासा केला त्याचे मी जाहीर कौतुक करतो. एकीकडे हजार, पाचशेच्या नोटा बंद करायच्या आणि दुसरीकडे दोन हजारांची नोट काढायची. ही लढाई काळा पैसा रोखण्यासाठी आहे की काळा पैसा सहजरीत्या गोळा करता यावा यासाठी आहे,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. कऱ्हाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘७० हजार कोटींच्या बनावट नोटा चलनात असल्याचे ‘आरबीआय’ने पत्रकात म्हटले आहे. मात्र, या ७० हजार कोटींच्या बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी १६ हजार कोटी खर्च करून काय साध्य होणार आहे. त्यापेक्षा रिझर्व्ह बँकेने देशवासीयांना आपल्या पाचशे, हजारांच्या नोटा मुदत देऊन बँकेत येऊन तपासून घ्या, असे सांगितले असते तर काय बिघडले असते? देशात ०.००७ टक्के कागदी नोटा चलनात वापरल्या जातात. असे असताना सर्वसामान्य जनतेला पाचशेच्या नोटा बँकेत भरा आणि दोन-चार हजारांनी काढा, असे म्हणून वेठीस धरण्याचा प्रकार घडला आहे. सर्वसामान्य नागरिकाला या नोटा जमा करून मिळणारे पैसे म्हणजे त्यांची फसवणूक आहे. जे करायचे ते शुद्ध हेतूने करा. पाचशे, हजारांच्या नोटा रद्द केल्या आणि दोन हजारांची नोट चलनात आणली. त्यापाठोपाठच हजाराची नोटही चलनात येणार आहे. मग दोन हजारांची नोट कशासाठी? ही चलनात आणून काळे धन गोळा करणाऱ्यांना सोयीस्करच होणार नाही का? त्यापेक्षा १००, २०० आणि ५०० च्याच नोटा चलनात असाव्यात. देशात ३० टक्के लोक निरक्षर आहेत. त्याचबरोबर हमाल, माथाडी, शेतकरी वर्गाकडून चलने भरून बँकेत घेणे हे शक्य नाही. बँकेत खाती असली तरी बँकेचे व्यवहार करणे त्यांना समजत नाही, अशा नागरिकांना वेठीस धरून काय उपयोग? असा सवालही माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी