शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; नवजाला १४० मिलिमीटरची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST

सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम भागातील नवजा येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, ...

सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम भागातील नवजा येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर पूर्व दुष्काळी भागात अनेक ठिकाणी पाऊस दमदार कोसळला. पश्चिम भागातील पावसामुळे धरणांत पाण्याची आवक वाढत आहे. कोयनेत ९५.१५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यात पाच दिवसांपासून पाऊस होत आहे. मात्र, मागील एक महिना पाऊस अत्यल्प पडला. जिल्ह्यात जुलै महिन्याच्या मध्यावर जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी पश्चिम भागात तर धुवाँधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्ते वाहून गेले होते. तसेच जमिनी खचल्या होत्या. हा पाऊस लोकांवर काळ बनून आला होता, तर अवघ्या तीन दिवसांत कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला विक्रमी पाऊस झाला होता. त्याचबरोबर कोयना धरणात इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. २४ तासांत १६ टीएमसीने पाणीसाठा वाढला होता. तसेच इतर धरणांतही पाणी वेगाने वाढले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात एकदम कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे धरणे पूर्णपणे भरली नाहीत, तर पूर्वेकडील खरीप हंगामातील पिके पावसाअभावी वाळू लागली होती. त्यामुळे धरणे भरणार का ? अशी चिंता लागली होती. तसेच खरीप हंगाम वाया तर जाणार नाही ना ? अशी भीतीही व्यक्त होत होती. पण, गेल्या पाच दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. अनेक ठिकाणी दमदार पाऊस होत आहे.

जिल्ह्यातील पश्चिम तसेच पूर्व भागातही दमदार पाऊस होत आहे. एक महिन्यानंतर प्रथमच चांगला पाऊस होत असल्याने पिकांना फायदा होणार आहे. पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला. माण तालुक्यातील अनेक गावांच्या ओढ्यांना पाणी येऊ लागले आहे. तसेच बंधाऱ्यात पाणीसाठा होत आहे. तरीही अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे.

चौकट :

कोयनेला ६७ मिलिमीटर पाऊस...

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे ६७ मिलिमीटर पाऊस पडला, तर जूनपासून आतापर्यंत ३,७१४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच नवजा येथे १४० आणि आतापर्यंत ४,९९४ व महाबळेश्वरला ११, तर यावर्षी आतापर्यंत ४,९७९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात सकाळच्या सुमारास ९५.१५ टीएमसी पाणीसाठा झाला होता, तर २४ तासांत ७,४७४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे.

............................................................