शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; नवजाला १४० मिलिमीटरची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST

सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम भागातील नवजा येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, ...

सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम भागातील नवजा येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर पूर्व दुष्काळी भागात अनेक ठिकाणी पाऊस दमदार कोसळला. पश्चिम भागातील पावसामुळे धरणांत पाण्याची आवक वाढत आहे. कोयनेत ९५.१५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यात पाच दिवसांपासून पाऊस होत आहे. मात्र, मागील एक महिना पाऊस अत्यल्प पडला. जिल्ह्यात जुलै महिन्याच्या मध्यावर जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी पश्चिम भागात तर धुवाँधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्ते वाहून गेले होते. तसेच जमिनी खचल्या होत्या. हा पाऊस लोकांवर काळ बनून आला होता, तर अवघ्या तीन दिवसांत कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला विक्रमी पाऊस झाला होता. त्याचबरोबर कोयना धरणात इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. २४ तासांत १६ टीएमसीने पाणीसाठा वाढला होता. तसेच इतर धरणांतही पाणी वेगाने वाढले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात एकदम कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे धरणे पूर्णपणे भरली नाहीत, तर पूर्वेकडील खरीप हंगामातील पिके पावसाअभावी वाळू लागली होती. त्यामुळे धरणे भरणार का ? अशी चिंता लागली होती. तसेच खरीप हंगाम वाया तर जाणार नाही ना ? अशी भीतीही व्यक्त होत होती. पण, गेल्या पाच दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. अनेक ठिकाणी दमदार पाऊस होत आहे.

जिल्ह्यातील पश्चिम तसेच पूर्व भागातही दमदार पाऊस होत आहे. एक महिन्यानंतर प्रथमच चांगला पाऊस होत असल्याने पिकांना फायदा होणार आहे. पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला. माण तालुक्यातील अनेक गावांच्या ओढ्यांना पाणी येऊ लागले आहे. तसेच बंधाऱ्यात पाणीसाठा होत आहे. तरीही अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे.

चौकट :

कोयनेला ६७ मिलिमीटर पाऊस...

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे ६७ मिलिमीटर पाऊस पडला, तर जूनपासून आतापर्यंत ३,७१४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच नवजा येथे १४० आणि आतापर्यंत ४,९९४ व महाबळेश्वरला ११, तर यावर्षी आतापर्यंत ४,९७९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात सकाळच्या सुमारास ९५.१५ टीएमसी पाणीसाठा झाला होता, तर २४ तासांत ७,४७४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे.

............................................................