शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; नवजाला १४० मिलिमीटरची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST

सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम भागातील नवजा येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, ...

सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम भागातील नवजा येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर पूर्व दुष्काळी भागात अनेक ठिकाणी पाऊस दमदार कोसळला. पश्चिम भागातील पावसामुळे धरणांत पाण्याची आवक वाढत आहे. कोयनेत ९५.१५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यात पाच दिवसांपासून पाऊस होत आहे. मात्र, मागील एक महिना पाऊस अत्यल्प पडला. जिल्ह्यात जुलै महिन्याच्या मध्यावर जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी पश्चिम भागात तर धुवाँधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्ते वाहून गेले होते. तसेच जमिनी खचल्या होत्या. हा पाऊस लोकांवर काळ बनून आला होता, तर अवघ्या तीन दिवसांत कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला विक्रमी पाऊस झाला होता. त्याचबरोबर कोयना धरणात इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. २४ तासांत १६ टीएमसीने पाणीसाठा वाढला होता. तसेच इतर धरणांतही पाणी वेगाने वाढले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात एकदम कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे धरणे पूर्णपणे भरली नाहीत, तर पूर्वेकडील खरीप हंगामातील पिके पावसाअभावी वाळू लागली होती. त्यामुळे धरणे भरणार का ? अशी चिंता लागली होती. तसेच खरीप हंगाम वाया तर जाणार नाही ना ? अशी भीतीही व्यक्त होत होती. पण, गेल्या पाच दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. अनेक ठिकाणी दमदार पाऊस होत आहे.

जिल्ह्यातील पश्चिम तसेच पूर्व भागातही दमदार पाऊस होत आहे. एक महिन्यानंतर प्रथमच चांगला पाऊस होत असल्याने पिकांना फायदा होणार आहे. पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला. माण तालुक्यातील अनेक गावांच्या ओढ्यांना पाणी येऊ लागले आहे. तसेच बंधाऱ्यात पाणीसाठा होत आहे. तरीही अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे.

चौकट :

कोयनेला ६७ मिलिमीटर पाऊस...

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे ६७ मिलिमीटर पाऊस पडला, तर जूनपासून आतापर्यंत ३,७१४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच नवजा येथे १४० आणि आतापर्यंत ४,९९४ व महाबळेश्वरला ११, तर यावर्षी आतापर्यंत ४,९७९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात सकाळच्या सुमारास ९५.१५ टीएमसी पाणीसाठा झाला होता, तर २४ तासांत ७,४७४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे.

............................................................