शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
5
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
6
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
7
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
8
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
9
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
10
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
11
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
12
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
13
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
14
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
15
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
16
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
17
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
18
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
19
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
20
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 

जिल्हाध्यक्ष बदलायचाय; होणार कोण?

By admin | Updated: February 27, 2017 23:34 IST

कऱ्हाडात घडतंय बिघडतंय : ‘हमको भी गमने मारा, तुमको भी गमने मारा, इस गमको मार डालो..’

प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाडजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची पुरती वाताहत झाली. दोन अंकी आकडाही गाठू न शकलेल्या काँगे्रस नेत्यांवर आत्मचिंतनाची वेळ आलीय; पण या निकालानंतर कार्यकर्त्यांच्यात अन् सोशल मीडियावर अनेक चर्चांबरोबरच काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांच्या बदलाची चर्चा जोरदारपणे सुरू आहे; पण जिल्हाध्यक्ष बदलायचाच म्हटलं तर ज्यांचा याबाबतचा छुपा आग्रह होता त्यांच्या मतदार संघातही काँगे्रसची वाटच लागलीय. ‘हमको भी गमने मारा, तुमको भी गमने मारा, इस गमको मार डालो...’ असंच प्रत्येक काँगे्रस कार्यकर्त्यांना वाटतंय खरं; पण काँगे्रसचं हे दु:ख नेमकं कोण दूर करणार, हा खरा प्रश्न आहे.एकेकाळी सातारा जिल्हा हा काँगे्रसचा बालेकिल्ला होता म्हणे. पण राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून येथे घड्याळाचा गजर वाढला. काँगे्रसच्या ‘हाता’ला एक-दोन विधानसभा मतदारसंघ लागले आहेत; पण तेथेही सध्या पक्षाची परिस्थिती चांगली दिसत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. सातारा जिल्हा हा दिवंगत यशवंतराव चव्हाणांचा, दिवंगत किसन वीर आबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आता अलीकडे तो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातोय. खरंतर यशवंतराव अन् किसन वीर आबांचा वारसा सांगूनच पृथ्वीबाबा मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले; पण धर्मनिरपेक्ष धोरणाचा त्यांच्याच जिल्ह्यात आज पुरता बोजवारा उडालेला दिसतोय. राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर तर वाढतच चाललाय; पण भाजपचं ‘कमळ’ही काँगे्रसच्या बरोबरीत येऊन बसलंय.वास्तविक, यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात त्यांच्या कर्मभूमीत भाजपचा नगराध्यक्ष होतो त्याचवेळी जिल्ह्यातील काँगे्रसच्या नेत्यांनी काळाची पावले ओळखायला हवी होती. चिंतन मेळावे घेऊन भाजपला रोखण्यासाठी व्यूहरचना करायला हवी होती. मात्र, मुंबई अन् दिल्लीच्या राजकारणात अडकलेल्या बाबांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. देशाच्या परमाणु धोरणावर चर्चा करणारे बाबा, देशाचे परराष्ट्र धोरण युनोत मांडणारे बाबा सध्या गल्लीतल्या राजकारणात अडकलेले दिसतात; पण त्यांना योग्य मार्ग सध्या सापडताना दिसेना. देश, विदेशातील प्रश्नांवर बोलून स्थानिक कार्यकर्त्यांना बळ मिळत नाही, हे आता त्यांच्या लक्षात आले असावे.स्वातंत्र्यानंतर अगदी कालपरवापर्यंत सातारा जिल्ह्यात भाजपचं चिन्ह कधी रुजलेलं पाहायला मिळालं नाही; पण आज काँगे्रसमधीलच सुंदोपसुंदीमुळे काँगे्रस कार्यकर्तेच काँगे्रस विचारापासून दूर गेल्याचे दिसले.आता चिंतन मेळावे, पराभवाचे परिमार्जन, विश्लेषण चालू होईल. त्यातून जिल्हाध्यक्ष बदलासारखा विषयही समोर येईल; पण जिल्ह्यात काँगे्रसची पूर्ण वाताहत झाली असताना ही नौका नेमकी कोणाच्या खांद्यावर पेलणार? कारण या निवडणुकांत एकाही काँग्रेस नेत्याचा खांदा मजबूत राहिल्याचे दिसत नाही. म्हणूनच तर ‘कोणी म्हटले म्हणून मी राजीनामा देणार नाही. माझा निर्णय बाबा घेतील’ असे आनंदराव पाटील सांगताना दिसतात.जयाभाऊंचा ‘भाव’ उतरलाकाँगे्रसचा एक आक्रमक नेता म्हणून जिल्ह्यात माणचे आमदार जयकुमार गोरे यांचे नाव घेतले जायचे; पण मध्यंतरी त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचा प्रकार झाला. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही त्यांना त्यांच्या विधानसभा मतदार संघात झटका बसल्याने जयाभाऊंचा भाव सध्या उतरला आहे. जिल्ह्याचे नेते होऊ पाहणारे जयाभाऊ फक्त एका जिल्हा परिषद गटापुरतेच उरलेले दिसतात.मदनदादाही वरमलेवाईचे माजी आमदार आणि किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले हे देखील जिल्ह्यातील राष्ट्रीय काँगे्रसचे ज्येष्ठ नेते; पण आमदार मकरंद आबांनी त्यांना जेरीस आणले आहे. आमदारकी तर दूरच पण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही आबांनी दादांना घाईला आणलेय. त्यामुळे ते तरी जिल्ह्याची जबाबदारी कसे पेलणार असा प्रश्न आहे.