शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाध्यक्ष बदलायचाय; होणार कोण?

By admin | Updated: February 27, 2017 23:34 IST

कऱ्हाडात घडतंय बिघडतंय : ‘हमको भी गमने मारा, तुमको भी गमने मारा, इस गमको मार डालो..’

प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाडजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची पुरती वाताहत झाली. दोन अंकी आकडाही गाठू न शकलेल्या काँगे्रस नेत्यांवर आत्मचिंतनाची वेळ आलीय; पण या निकालानंतर कार्यकर्त्यांच्यात अन् सोशल मीडियावर अनेक चर्चांबरोबरच काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांच्या बदलाची चर्चा जोरदारपणे सुरू आहे; पण जिल्हाध्यक्ष बदलायचाच म्हटलं तर ज्यांचा याबाबतचा छुपा आग्रह होता त्यांच्या मतदार संघातही काँगे्रसची वाटच लागलीय. ‘हमको भी गमने मारा, तुमको भी गमने मारा, इस गमको मार डालो...’ असंच प्रत्येक काँगे्रस कार्यकर्त्यांना वाटतंय खरं; पण काँगे्रसचं हे दु:ख नेमकं कोण दूर करणार, हा खरा प्रश्न आहे.एकेकाळी सातारा जिल्हा हा काँगे्रसचा बालेकिल्ला होता म्हणे. पण राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून येथे घड्याळाचा गजर वाढला. काँगे्रसच्या ‘हाता’ला एक-दोन विधानसभा मतदारसंघ लागले आहेत; पण तेथेही सध्या पक्षाची परिस्थिती चांगली दिसत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. सातारा जिल्हा हा दिवंगत यशवंतराव चव्हाणांचा, दिवंगत किसन वीर आबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आता अलीकडे तो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातोय. खरंतर यशवंतराव अन् किसन वीर आबांचा वारसा सांगूनच पृथ्वीबाबा मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले; पण धर्मनिरपेक्ष धोरणाचा त्यांच्याच जिल्ह्यात आज पुरता बोजवारा उडालेला दिसतोय. राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर तर वाढतच चाललाय; पण भाजपचं ‘कमळ’ही काँगे्रसच्या बरोबरीत येऊन बसलंय.वास्तविक, यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात त्यांच्या कर्मभूमीत भाजपचा नगराध्यक्ष होतो त्याचवेळी जिल्ह्यातील काँगे्रसच्या नेत्यांनी काळाची पावले ओळखायला हवी होती. चिंतन मेळावे घेऊन भाजपला रोखण्यासाठी व्यूहरचना करायला हवी होती. मात्र, मुंबई अन् दिल्लीच्या राजकारणात अडकलेल्या बाबांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. देशाच्या परमाणु धोरणावर चर्चा करणारे बाबा, देशाचे परराष्ट्र धोरण युनोत मांडणारे बाबा सध्या गल्लीतल्या राजकारणात अडकलेले दिसतात; पण त्यांना योग्य मार्ग सध्या सापडताना दिसेना. देश, विदेशातील प्रश्नांवर बोलून स्थानिक कार्यकर्त्यांना बळ मिळत नाही, हे आता त्यांच्या लक्षात आले असावे.स्वातंत्र्यानंतर अगदी कालपरवापर्यंत सातारा जिल्ह्यात भाजपचं चिन्ह कधी रुजलेलं पाहायला मिळालं नाही; पण आज काँगे्रसमधीलच सुंदोपसुंदीमुळे काँगे्रस कार्यकर्तेच काँगे्रस विचारापासून दूर गेल्याचे दिसले.आता चिंतन मेळावे, पराभवाचे परिमार्जन, विश्लेषण चालू होईल. त्यातून जिल्हाध्यक्ष बदलासारखा विषयही समोर येईल; पण जिल्ह्यात काँगे्रसची पूर्ण वाताहत झाली असताना ही नौका नेमकी कोणाच्या खांद्यावर पेलणार? कारण या निवडणुकांत एकाही काँग्रेस नेत्याचा खांदा मजबूत राहिल्याचे दिसत नाही. म्हणूनच तर ‘कोणी म्हटले म्हणून मी राजीनामा देणार नाही. माझा निर्णय बाबा घेतील’ असे आनंदराव पाटील सांगताना दिसतात.जयाभाऊंचा ‘भाव’ उतरलाकाँगे्रसचा एक आक्रमक नेता म्हणून जिल्ह्यात माणचे आमदार जयकुमार गोरे यांचे नाव घेतले जायचे; पण मध्यंतरी त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचा प्रकार झाला. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही त्यांना त्यांच्या विधानसभा मतदार संघात झटका बसल्याने जयाभाऊंचा भाव सध्या उतरला आहे. जिल्ह्याचे नेते होऊ पाहणारे जयाभाऊ फक्त एका जिल्हा परिषद गटापुरतेच उरलेले दिसतात.मदनदादाही वरमलेवाईचे माजी आमदार आणि किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले हे देखील जिल्ह्यातील राष्ट्रीय काँगे्रसचे ज्येष्ठ नेते; पण आमदार मकरंद आबांनी त्यांना जेरीस आणले आहे. आमदारकी तर दूरच पण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही आबांनी दादांना घाईला आणलेय. त्यामुळे ते तरी जिल्ह्याची जबाबदारी कसे पेलणार असा प्रश्न आहे.