शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सुंदर शहरासाठी जिल्हा सरसावला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 01:01 IST

राज्यात खेडी स्वच्छ आणि सुंदर झाल्यानंतर नगरपालिकांच्या स्वच्छतेची मोहीम उघडण्यात आली. काही नगरपालिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला. तर काहींनी केवळ सहभाग म्हणून नाव नोंदविण्याऐवजी प्रत्यक्षात काम करण्याचे नियोजन केले. प्रथम, द्वितीय असे क्रमांक मिळविले. आता त्याच्याही पुढे जाऊन स्टार मानांकन मिळविण्याचा नगरपालिकांचा प्रयत्न आहे.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण अभियान : सातारा, क-हाड, मलकापूर, महाबळेश्वर, पाचगणी पालिका सज्ज; स्पर्धेत अव्वल येण्याचा निर्धार

दीपक शिंदे ।सातारा : ‘स्वच्छ सुंंदर शहर’ अभियानासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नगरपंचायत सरसावली असून, शहर अधिकाधिक स्वच्छ ठेवण्यासाठी धडपडत आहे. काही नगरपालिकांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवायचाच, या उद्देशाने स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. तर काहींनी आपले पहिले स्थान कायम राखून पुढील टप्प्यावर झेप घेण्याचे नियोजन केले आहे. कºहाड, मलकापूर, पाचगणी, महाबळेश्वर, सातारा या नगरपालिकांनी सध्या आघाडी घेतली आहे.केवळ रस्त्याची स्वच्छता एवढेच अपेक्षित नाही तर शहरातील व्यवहार सुरळीत होऊन जनजीवन सुधारण्याच्या दृष्टीने नगरपालिकांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत.

राज्यात खेडी स्वच्छ आणि सुंदर झाल्यानंतर नगरपालिकांच्या स्वच्छतेची मोहीम उघडण्यात आली. काही नगरपालिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला. तर काहींनी केवळ सहभाग म्हणून नाव नोंदविण्याऐवजी प्रत्यक्षात काम करण्याचे नियोजन केले. प्रथम, द्वितीय असे क्रमांक मिळविले. आता त्याच्याही पुढे जाऊन स्टार मानांकन मिळविण्याचा नगरपालिकांचा प्रयत्न आहे. बकाल आणि भकास वाटणारी शहरेही आता टवटवित आणि उत्साहाने फुललेली पाहायला मिळत आहेत. लोकांना सुविधा देण्याबरोबरच वाया जाणारे पाणी असो किंवा कचरा. याचा पुनर्वापर कसा केला जातो, यालाही महत्त्व आहे.

शहराला चोवीस तास पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशी या स्वच्छ सर्र्वेक्षण मोहिमेतील अट आहे. पण सांडपाण्याची काय विल्हेवाट लावली जाते. यावर गुणांकन ठरविले जात आहे. त्यामुळे केवळ चोवीस तास पाणी दिले म्हणजे झाले, असे अजिबात होत नाही. अत्यंत काटेकोरपणे सर्व निकष पाळणाऱ्या नगरपालिकांचाच पुढील टप्प्यासाठी विचार केला जातो. विशेष म्हणजे जिल्ह्यातील कºहाड, मलकापूर, पाचगणी, महाबळेश्वर, सातारा या नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी होऊन काहीतरी वेगळे करू इच्छित आहेत. त्यांना वेगवेगळ्या टप्प्यावर यशही मिळत आहे. प्रत्येक नगरपालिकेने आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वेगळेपणाच्या आधारावर सर्वांसोबत राहून आपले वैशिष्ट्य त्यांना विजयापर्यंत पोहोचविते.

स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गंत सांडपाण्याची व्यवस्था, त्यावर प्रक्रिया करण्याची पद्धत कशी आहे. पाण्याचा पुनर्वापर कसा केला जातो, कचरा डेपोची व्यवस्था काय आहे, प्लास्टिक निर्मूलनाबाबत कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, कचरा कसा गोळा केला जातो, कचºयाचे वर्गीकरण कसे होते, ओला आणि सुका कचरा कशाला म्हणायचे, हॉटेल्स, कार्यालये आणि घरातील कचरा कसा गोळा केला जातो, स्वच्छता कर्मचाऱ्यांना काय सुविधा दिल्या जातात, शहरातून उचललेला कचरा कुठे टाकला जातो. त्या कचºयापासून पुनर्निमिती होते का... कचरा डेपोची व्यवस्था, दुर्गंधी, डेपोने पेट घेणे याबाबत केलेली उपाययोजना पाहिली जाते. स्वच्छतागृहे कशी आहेत. तिथे काय-काय सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच शहरांमधील बागा, स्वच्छता, सीसीटीव्ही हे निकषही पाहिले जातात.

 

  • सातारा पालिकेकडून प्लास्टिक कचऱ्याचे निर्मूलन

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झालेल्या सातारा पालिकेकडून शहरात स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. शहर स्वच्छतेला प्राधान्य देण्याबरोबरच नागरिकांमध्ये प्रबोधनही केले जात आहे. शहरातील ऐतिहासिक तळी, हौदांची प्राधान्याचे स्वच्छता केली जात आहे. तसेच शासनाची ‘बेस्ट टॉयलेट’ ही संकल्पना साकारण्यासाठी ७१ पैकी १८ सार्वजनिक स्वच्छतागृहांचे नूतनीकरणही केले जाणार आहे. सोनगाव डेपोतील घनकचरा व्यवस्थापण प्रकल्पात कचºयापासून खतनिर्मिती केली जात असून, याच ठिकाणी प्लास्टिक कचºयाचीही विल्हेवाट लावली जात आहे. शहरातून दररोज संकलित होणाºया ४०० ते ५०० किलो प्लास्टिक कचºयाची बेलिंग मशीनच्या माध्यमातून गठ्ठे तयार केले जात आहे. हे प्लास्टिक पुढे सिमेंट फॅक्टरी व इंधन निर्मितीसाठी उपयोगात आणले जाणार आहे.

क-हाड नगरपालिकेचे वेगळेपणकचरा डेपोच्या सभोवती बाग...दुर्गंधी नाहीहॉटेल, कार्यालये आणि घरचा कचरा स्वतंत्रपणे गोळा करणेशहरातील चौकांचे सुशोभीकरण,सांडपाणी व्यवस्थापनातून खर्च वाचविलाकृष्णा नदी स्वच्छता अभियान राबविले.शहर स्वच्छतेबरोबरच नदी स्वच्छतेवर भर दिला.काही भागांत २४ तास पाणी, सध्या तपासणी सुरूलोकांमध्ये जनजागृती करण्याचे काममलकापूर पालिकेचे वेगळेपणचौकांचे सुशोभीकरणघरातील पाण्याचे एकत्रीकरण करून सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प केला.गेली दहा वर्षे चोवीस तास पाणीपुरवठा करणार नगरपालिकासर्वांना उंचावरून पाणी आणून देण्यात आल्याने वीज खर्च वाचला

खतप्रकल्प राबविलाओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती महा ई कंपोस्ट म्हणून खताची विक्रीवृक्षलागवड आणि जपणूकमुलींच्या नावावर ठेवपावतीगरोदर माता दत्तक योजनापाचगणी नगरपालिकेचे वेगळेपणघरोघरी कचरा विलगीकरणासाठी कचरा डबेपर्यटन स्थळ असल्यामुळे शहरात विविध ठिकाणी स्वच्छता डबेकच-यापासून खतनिर्मिती प्रकल्प आणि सेंद्रिय शेतीसाठी खतांचा वापर

 

  • पालिकांचे यश
  • क-हाड : नगरपालिका राज्यात दोनवेळा प्रथम
  • मलकापूर : नावीण्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात यश
  • पाचगणी : पश्चिम विभागात प्रथम क्रमांक

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMuncipal Corporationनगर पालिका