शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

विघ्नसंतोषींकडून वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2016 22:17 IST

धुमसता अजिंक्यतारा : वन्यजीवांचे खाद्य नष्ट; सापही होरपळले

सातारा : गौरवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा आणि समृद्ध वन्यजीवनाचे पुरावे अंगाखांद्यावर घेऊन उभ्या असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर बुधवारी दुपारी विघ्नसंतोषी मंडळींनी वणवा पेटविला. आगीत नुकतीच लागवड केलेली रोपे, वन्यजीवांचे खाद्य नष्ट झाले तसेच सरपटणारे प्राणी होरपळले. वणवे लावण्याचे प्रकार शहर आणि जिल्ह्यात वाढत असून, वनविभागाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे. डिसेंबर-जानेवारीदरम्यान डोंगरांवरील गवत वाळते. हे गवत छोट्याशा ठिणगीनेही पेट घेत असल्याने कधी गंमत म्हणून, तर कधी चुकीने विडी-काडी टाकणाऱ्यांमुळे शहराच्या आसपासच्या डोंगरांवर वणवे पेटलेले दिसू लागतात. अजिंक्यतारा आणि यवतेश्वर ही शहराजवळील ‘टार्गेट’ विघ्नसंतोषी मंडळी नेहमीच निवडतात. महादरे गावातील युवकांच्या प्रयत्नांमुळे यवतेश्वर डोंगरावरील वणव्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत कमी आले आहे. या युवकांनी प्रसंगी धोका पत्करून वणवे विझविले आहेत. याच डोंगराला लागून असलेल्या भैरोबा डोंगरावरील वणव्यात तीन परप्रांतीय गेल्या वर्षी अडकले होते. त्यातील एकाचा भाजून मृत्यू झाला होता. नंतर काही दिवस वणव्यांचा विषय गंभीरपणे चर्चिला गेला आणि पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ या उक्तीनुसार वणवे दुर्लक्षित केले जाऊ लागले. अजिंक्यतारा किल्ल्यावरही पर्यावरणप्रेमींनी नेहमीच जाऊन वणवे विझविले आहेत; परंतु वणवा पेटताच लोक त्यांच्या क्रमांकावर फोन करून कळवू लागले. जणू दर वेळी वणवा विझविण्याची जबाबदारी त्यांचीच असल्याप्रमाणे असे फोन येतात; तथापि दरवेळी ही मंडळी उपलब्ध असतातच असे नाही. त्यामुळे वणवा लागल्यास तो विझविण्याची; तसेच वणवे लावणाऱ्यांना पकडून कारवाई करण्याची जबाबदारी कुणाची, हे निश्चित होणे गरजेचे आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावरील स्मृतिउद्यानात पालिकेने वृक्षलागवड केली आहे. तथापि, किल्ल्याचा परिसर सामाजिक वनीकरण विभाग आणि वनविभागाच्या अखत्यारीत येतो. या हद्दी वनस्पती आणि पशुपक्ष्यांना मात्र माहीत नसतात. आगही हद्दी मानत नाही. वणव्यात अजिंक्यताऱ्यावरील सरपटणारे जीव मृत्युमुखी पडत आहेत. तसेच मोठ्या संख्येने असणाऱ्या मोरांनाही झळ पोहोचत आहे. साळिंदर, तरस असे वन्यजीव किल्ल्याच्या परिसरात नेहमी आढळतात. काही हिंस्रपशूंचीही ये-जा असते. आगीची झळ लागलेला एखादा हिंस्र वन्यजीव शहरात शिरल्यास काय घडेल, याचाही विचार संबंधित यंत्रणांनी केलेला बरा! त्यामुळे वणवे लागू नयेत म्हणून साध्या वेशात सतत टेहळणी आणि वणवे लावताना सापडल्यास कडक कारवाई या गोष्टी तातडीने होणे आवश्यक आहे. ही टेहळणी केवळ कोरडे गवत असण्याच्या कालावधीतच करावयाची असल्याने हंगामी स्वरूपात संमिश्र पथक तयार करण्याचा पर्यायही चोखाळून पाहायला हवा. पालिका, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)

अंधश्रद्धा, गैरसमज कारणीभूत आपोआप किंवा चुकीने लागणाऱ्या वणव्यांची संख्या नगण्य असते. वणवे एक तर अंधश्रद्धेतून आणि गैरसमजुतींमधून लावले जातात किंवा विघ्नसंतोषीपणे मजा म्हणून. डोंगरावरील गवत जाळून टाकले की पुढील वर्षी भरघोस गवत उगवते या अंधश्रद्धेतून काही ठिकाणी वणवे लावले जातात. परंतु यात काहीही तथ्य नाही. चरणाऱ्या जनावरांनी अर्धवट खाल्लेल्या गवताचे बुडखे काही वेळा पुन्हा त्या ठिकाणी चरताना जनावरांच्या हिरड्यांना इजा करतात. हा धोका टाळण्यासाठीही आगी लावल्या जातात. तथापि, बेजबाबदार पर्यटक आणि हुल्लडबाजांकडून वणवे लावण्याचे प्रकार सातारा परिसरात सर्वाधिक घडत असल्याचे पाहायला मिळते.