शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाद मिटला पाहिजे, सर्व ठिकठाक होईल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:55 IST

प्रमोद सुकरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : एकेकाळी सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता म्हणे. अंतर्गत संघर्षाचे ग्रहण असूनही त्याला फारसा फरक पडला नाही. मात्र, राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष नंबर एक बनला. सेनेनेही उचललेलं शिवधनुष्य थोडसं पेललं.आता तर भाजपही कमळ फुलवू पाहतंय. अशा सर्व परिस्थितीत काँग्रेसला जिल्ह्यात गतवैभव ...

प्रमोद सुकरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : एकेकाळी सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता म्हणे. अंतर्गत संघर्षाचे ग्रहण असूनही त्याला फारसा फरक पडला नाही. मात्र, राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष नंबर एक बनला. सेनेनेही उचललेलं शिवधनुष्य थोडसं पेललं.आता तर भाजपही कमळ फुलवू पाहतंय. अशा सर्व परिस्थितीत काँग्रेसला जिल्ह्यात गतवैभव आणायचे असेल तर अंतर्गत वाद मिटला पाहिजे. मग सर्वकाही ठिकठाक होईल, असा साक्षात्कार नेत्यांना झालेला दिसतोय. या संदर्भातील पृथ्वीराज चव्हाण व विलासराव पाटील-उंडाळकर यांची ताजी वक्तव्ये बरंच काहीसांगून जातात. त्याच्यावर सध्या जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरूआहे.सातारा जिल्ह्याच्या राजकारणात पृथ्वीराज चव्हाण बाबा गट व काका गट हा तसा खूप जुना वाद आहे. त्याला अनेक कारणांची फोडणी मिळाल्याने हा वाद वाढतच गेला आणि परिणामी त्याचा फटका जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाला बसला, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. आज तर जिल्ह्यात काँगे्रसचे फक्त दोनच आमदार दिसतात. ती संख्या वाढवायची असेल तर जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत वाद मिटणे गरजेचे आहे.त्या अनुषंगाने पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना कºहाड दक्षिणमधून माझी उमेदवारी हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय होता. तो समजून घ्यायला हवा होता, असे सांगत जिल्ह्यात काँग्रेस बळकट करण्यासाठी आधी कºहाड दक्षिणेतील बाबा-काका गट हा वाद मिटला पाहिजे, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. तर पोतले येथील कार्यक्रमात माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी मी आगामी विधानसभेची निवडणूक लढणार नाही; पण काळजी करू नका.सगळे काही ठिकठाक होईल, असा जाहीर सभेत विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे बाबा-काका गटांतील वाद मिटून नजीकच्या काळात जिल्ह्यात काँगे्रस ठिकठाक होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.काकींनीच दिली काकांना उमेदवारीप्रेमिलाताई चव्हाण १९८४ मध्ये इंदिरा काँगे्रसच्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनीच पहिल्यांदा विलासराव पाटील-उंडाळकर यांना कºहाड दक्षिणमधून विधानसभेची उमेदवारी दिली, असे सांगितले जाते. त्यानंतर अनेक वर्षे प्रेमिलाताई काकी व विलासराव काका यांच्यात सलोख्याचे संबंध होते.... तर अटीतटीचा सामना झाला असतावास्तविक, १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विलासराव पाटील-उंडाळकर हे एस काँग्रेसमधून आमदार म्हणून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात इंदिरा काँग्रेसचे उमेदवार उभे होते बाळासाहेब शेरेकर. वास्तविक, त्यावेळी जयवंतराव भोसले यांनीही उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना उमेदवारी का नाकारली याबाबत आजही उलट-सुलट मते मांडली जातात. उंडाळकरांच्या विरोधात रेठरेकर उमेदवार असते तर ती निवडणूक अटीतटीची झाली असती.यापूर्वीही झाला होता वाद मिटविण्याचा प्रयत्नपृथ्वीराज चव्हाण यांची राज्याच्या मुख्यमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर ही बाब उंडाळकरांना साहजिकच पचनी पडणारी नव्हती. त्यानंतर होणारी विधानसभा निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार असल्याने तेच कºहाड दक्षिणमधून लढणार, हे स्पष्ट झाले होते. त्यावेळी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या माध्यमातून हा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्न झाला होता. मात्र, त्याला यश आले नाही.पुन्हा एकदा प्रयत्न सुरूराज्यात व देशात जातीवादी पक्षाला रोखण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्रित यावे, असा राग आळवला जात आहे. त्यामुळे समविचारी पक्षांची मोट बांधत असताना काँगे्रसअंतर्गत मतभेदही मिटले पाहिजेत, अशा सूचना दिल्या गेल्याने पृथ्वीराज चव्हाण यांना होमपीचवरील वादही मिटविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. शिवाय उंडाळकरही काँग्रेस विचारधारेपासून दूर गेलेले नाहीत. हे त्यांनी गत सहा महिन्यांत सुशीलकुमार शिंदे व शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या घेतलेल्या कार्यक्रमांवरून स्पष्ट होते. साहजिकच या साऱ्या बाबी बाबा व काका यांच्यातील वाद मिटविण्याचीच प्रक्रिया मानली जात आहे.