शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

पारगावमध्ये दोन गटांत वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:44 IST

औंध : औंध परिसरातील २५ गावांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडले. यावेळी सरासरी ८३ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी दुरंगी ...

औंध : औंध परिसरातील २५ गावांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडले. यावेळी सरासरी ८३ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती झाल्याने सोमवारी लागणाऱ्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पारगाव येथे मतदानावरून दोन गटांत वादावादी झाली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत औंध पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.

औंध पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील पुसेसावळी, वडगाव जयराम स्वामी, चौराडे, रहाटणी, रेवली, कळंबी, वडी, नांदोशी, खबालवाडी, जायगाव, भोसरे, लोणी, वरूड, गोपूज, गोसाव्याचीवाडी, येळीव, करांडेवाडी, उंचीठाणे, खरशिंगे, पळशी, कोकराळे, नागाचे कुमठे, गोरेगाव वांगी, पारगाव आदी २५ गावांमध्ये मतदान पार पडले. सर्वच ठिकाणी अतिशय चुरशीने मतदान झाले असून सुमारे ८३ टक्के मतदान झाले.

उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख औंधसह परिसरात मतदान केंद्रांना भेटी देण्याच्या निमित्ताने जात असताना गोपूज गावातील चौकात जमाव दिसला. गाडी आत घेताच कार्यकर्त्यांनी धूम ठोकली.