शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वीज कनेक्शन तोडणे त्वरित थांबवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:47 IST

कऱ्हाड : सध्या राज्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे व घरगुती वीज कनेक्शन तोडण्याचा धडाका महावितरण कंपनीने लावला आहे. अगोदरच अडचणीत सापडलेल्या ...

कऱ्हाड : सध्या राज्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे व घरगुती वीज कनेक्शन तोडण्याचा धडाका महावितरण कंपनीने लावला आहे. अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची कोंडी करण्याचे पाप राज्य सरकार करीत आहे. ते त्वरित थांबवावे. वीज कनेक्शन तोडणे त्वरित थांबवावे, अन्यथा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळेल. सोमवारी (दि. २२) कऱ्हाड तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करणार असल्याचा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी कऱ्हाड येथे पत्रकार परिषदेत दिला.

पंजाबराव पाटील म्हणाले, कोरोना काळात रात्रंदिन शेतात राबून जनतेला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्याला तो संकटात असताना राज्य व केंद्र सरकार मदत करायची सोडून वीज कनेक्शन तोडून अंधाराचे बक्षीस देत आहे, तर त्यांची पिके वाळविण्याचे पाप करीत आहे.

केंद्र सरकार शेतकरी विरोधात कायदे करून शेती व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे काम करीत आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार संकटातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडत आहे. त्यामुळे आई जेवू घालिना अन् बाप भीक मागू देईना अशी शेतकरी वर्गाची अवस्था झाली आहे. तरी राज्य सरकारने वीज कनेक्शन तोडणे त्वरित थांबवावे, तोडलेले त्वरित जोडावे. कर्नाटकप्रमाणे शेतीपंपासाठी दिवसा मोफत वीज देण्याचे जाहीर करावे, अन्यथा बळिराजा शेतकरी संघटना २२ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.