शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

वीज कनेक्शन तोडणे त्वरित थांबवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:47 IST

कऱ्हाड : सध्या राज्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे व घरगुती वीज कनेक्शन तोडण्याचा धडाका महावितरण कंपनीने लावला आहे. अगोदरच अडचणीत सापडलेल्या ...

कऱ्हाड : सध्या राज्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे व घरगुती वीज कनेक्शन तोडण्याचा धडाका महावितरण कंपनीने लावला आहे. अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची कोंडी करण्याचे पाप राज्य सरकार करीत आहे. ते त्वरित थांबवावे. वीज कनेक्शन तोडणे त्वरित थांबवावे, अन्यथा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळेल. सोमवारी (दि. २२) कऱ्हाड तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करणार असल्याचा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी कऱ्हाड येथे पत्रकार परिषदेत दिला.

पंजाबराव पाटील म्हणाले, कोरोना काळात रात्रंदिन शेतात राबून जनतेला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्याला तो संकटात असताना राज्य व केंद्र सरकार मदत करायची सोडून वीज कनेक्शन तोडून अंधाराचे बक्षीस देत आहे, तर त्यांची पिके वाळविण्याचे पाप करीत आहे.

केंद्र सरकार शेतकरी विरोधात कायदे करून शेती व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे काम करीत आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार संकटातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडत आहे. त्यामुळे आई जेवू घालिना अन् बाप भीक मागू देईना अशी शेतकरी वर्गाची अवस्था झाली आहे. तरी राज्य सरकारने वीज कनेक्शन तोडणे त्वरित थांबवावे, तोडलेले त्वरित जोडावे. कर्नाटकप्रमाणे शेतीपंपासाठी दिवसा मोफत वीज देण्याचे जाहीर करावे, अन्यथा बळिराजा शेतकरी संघटना २२ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.