शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

कोयनेतून ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:39 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवक होतच असल्याने दरवाजे पावणेदहा फुटांवर स्थिर आहेत. दरवाजातून ४८,५१४ तर पायथा वीजगृहामधून २,१०० असा मिळून ५०,६१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता.

जिल्ह्यात सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मागील आठवड्यात पश्चिम भागात धो-धो पाऊस झाला होता. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली भागात पावसाने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे कोयना धरणासह अन्य प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. अवघ्या काही दिवसात कोयना धरणातील साठा ९० टीएमसीच्यावर पोहोचला. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या पायथा वीजगृह आणि सहा दरवाजांतून विसर्ग सुरू करण्यात आला.

शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास कोयना धरणात ८९.०७ टीएमसी पाणीसाठा झाला होता तर २०,९८३ क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणाचे सहा दरवाजे गुरुवारी सायंकाळपासून पावणेदहा फुटांवर होते. शुक्रवारी सकाळीही दरवाजे पावणेदहा फुटांवरच स्थिर होते. दरवाजातून ४८,५१४ असा एकूण ५०,६१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयनेतून सुरू होता. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

शुक्रवारी सकाळपर्यंच्या २४ तासांत कोयनानगर येथे ४० मिलिमीटर पाऊस झाला. तर यावर्षी आतापर्यंत ३,०४७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. नवजाला ३८ आणि जूनपासून आतापर्यंत ३,८५८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तसेच महाबळेश्वरला सकाळपर्यंत ७७ आणि आतापर्यंत ३,९५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

चौकट :

शुक्रवारी सकाळचा धरणांतील विसर्ग :

धोम धरणातून ६,२२७ क्युसेक विसर्ग सुरू होता. कण्हेर ५,५६०, बलकवडी ३९८, उरमोडी १,९८६ आणि तारळी धरणातून १,७१२ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता. दरम्यान, धोम धरणात ७२.६४ टक्के पाणीसाठा झाला होता. कोयनेत ८३.८५, बलकवडी ८२.१३, उरमोडी धरण ७२.८४ आणि तारळी धरणात ८५.८५ टक्के साठा झाला होता.