शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
2
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
3
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
4
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
5
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
6
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
7
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
8
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
9
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
10
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
11
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
12
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
13
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
14
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
15
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
16
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
17
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
18
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
19
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
20
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं

धनगर समाजाची भटकंती थांबेल

By admin | Updated: September 29, 2014 00:47 IST

जयकुमार गोरे : म्हसवड येथे समाज बांधवांच्या बैठकीत विश्वास

म्हसवड : ‘धनगर समाजाने माझ्या राजकीय वाटचालीत मोलाचे योगदान दिले आहे. मला घडविण्यात समाजाचा मोठा वाटा आहे. आरक्षण लढ्यात मी आपल्या पाठीशी ठामपणे राहिलो. उरमोडीचे पाणी शेतापर्यंत पोहोचवून जिहे-कठापूर, तारळीचे पाणी आणून आगामी पाच वर्षांत धनगर समाज बांधवांना उपजीविकेसाठी भटकंती करावी लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करणार आहे,’ असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.म्हसवड येथे धनगर समाज बांधवांच्या खटाव-माण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आ. गोरे म्हणाले, ‘अनेकांनी धनगर समाजाचा स्वार्थासाठी वापर करून घेतला आहे, याची खंत वाटते. मी राजकारणात आलो तेव्हा आपण मला ताकद दिली. तुमच्याशिवाय जयकुमार घडलाच नसता. या जोरावरच माणमध्ये जलक्रांती घडवू शकलो. त्याला मुख्यमंत्र्यांचीही साथ मिळाली. ’यावेळी अर्जून काळे, दादासाहेब काळे, नगरसेवक शंकरशेठ वीरकर, नबाजी वीरकर, डॉ. वसंतराव मासाळ, सदाशिव गोरड, शामराव कोळेकर, शिवराम घुटुगडे, चंद्रकांत दडस, बाबासाहेब हुलगे, पोपट मासाळ यांनी मनोगत व्यक्त केला. (प्रतिनिधी)