शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाची भटकंती थांबेल

By admin | Updated: September 29, 2014 00:47 IST

जयकुमार गोरे : म्हसवड येथे समाज बांधवांच्या बैठकीत विश्वास

म्हसवड : ‘धनगर समाजाने माझ्या राजकीय वाटचालीत मोलाचे योगदान दिले आहे. मला घडविण्यात समाजाचा मोठा वाटा आहे. आरक्षण लढ्यात मी आपल्या पाठीशी ठामपणे राहिलो. उरमोडीचे पाणी शेतापर्यंत पोहोचवून जिहे-कठापूर, तारळीचे पाणी आणून आगामी पाच वर्षांत धनगर समाज बांधवांना उपजीविकेसाठी भटकंती करावी लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करणार आहे,’ असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.म्हसवड येथे धनगर समाज बांधवांच्या खटाव-माण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आ. गोरे म्हणाले, ‘अनेकांनी धनगर समाजाचा स्वार्थासाठी वापर करून घेतला आहे, याची खंत वाटते. मी राजकारणात आलो तेव्हा आपण मला ताकद दिली. तुमच्याशिवाय जयकुमार घडलाच नसता. या जोरावरच माणमध्ये जलक्रांती घडवू शकलो. त्याला मुख्यमंत्र्यांचीही साथ मिळाली. ’यावेळी अर्जून काळे, दादासाहेब काळे, नगरसेवक शंकरशेठ वीरकर, नबाजी वीरकर, डॉ. वसंतराव मासाळ, सदाशिव गोरड, शामराव कोळेकर, शिवराम घुटुगडे, चंद्रकांत दडस, बाबासाहेब हुलगे, पोपट मासाळ यांनी मनोगत व्यक्त केला. (प्रतिनिधी)