शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

विज्ञानाचा आधार नसलेली भक्ती केवळ अंधश्रद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST

सातारा : अनेक ईश्वर नाहीत, एकच ईश्वर आहे आणि तो म्हणजे विठ्ठल, एकेश्वरवादामुळे अंधश्रद्धा संपते. ज्या भक्तीला विवेकाची जोड ...

सातारा : अनेक ईश्वर नाहीत, एकच ईश्वर आहे आणि तो म्हणजे विठ्ठल, एकेश्वरवादामुळे अंधश्रद्धा संपते. ज्या भक्तीला विवेकाची जोड नाही आणि विज्ञानाचा आधार नाही, ती भक्ती अंधश्रद्धा म्हणून नावारूपाला येते. शोषण, व्यसनाधिनता, स्वैराचार, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा या सर्व सामाजिक रोगांविरोधात संतांनी विचार दिले आहेत. देव प्राप्त करण्यासाठी वैदिक कर्मकांडाच्या अंधश्रद्धा संतांनी नाकारल्या, असे मत डॉ. सुहास महाराज फडतरे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित आषाढी वारीनिमित्त ‘विवेकाची वारी’ या तीनदिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेचा शनिवारी दुसरा दिवस होता. शनिवार, १७ जुलै रोजी सुप्रसिद्ध कीर्तनकार डॉ. सुहास फडतरे महाराज, (कोरेगाव, सातारा) यांचे ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संतांचा जागर’ या विषयावर व्याख्यान पार पडले.

यावेळी डॉ. फडतरे म्हणाले, ‘वारीमध्ये फक्त देव प्रसन्न व्हावा म्हणून लोक पायी चालत नाहीत. वारीमध्ये संतांच्या विचारांचा जागर होतो. समाजाचं नेमकं प्रबोधन होण्यासाठी आणि अंध परंपरेची जळमटे दूर करण्यासाठी आम्ही विविध संत साहित्य गात पुढे जातो. पंढरपूर हे संतांच्या विवेकी विचारांचे माहेर आहे आणि तेथे सर्व संतांचे विचार आम्हाला मिळतात म्हणून आम्ही ही वारी करतो.’

संत साहित्यामध्ये गरीब-श्रीमंत ही विषमतासुद्धा समोर येते, याचे उदाहरण देताना फडतरे महाराज हे संत नामदेवांचा एक अभंग सांगतात, ‘तुम्हा घरी चोळी लुगडी, आम्हा घरी पोरे उघडी; तुम्हा घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर घुशी’.

‘संतांचे साहित्य वैदिक कर्मकांडाला फाटा देऊन समतावादी पर्याय देते आणि फक्त नामस्मरणातून ईश्वरप्राप्तीचा मार्ग समजावून सांगितला. जो ज्ञानाचा द्वेष करतो, जो आळशी असतो तो अंधश्रद्धेला बळी पडताे. या समाजाला अज्ञानी ठेवून लूट केली जाते. म्हणून समाजाला ज्ञानी करण्यासाठी संत पुढे आले पण त्यांनी चमत्कार केले नाहीत, त्यांनी प्रबोधन केले,’ असे शेवटी फडतरे महाराज म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वराज आणि महेश धनवटे यांनी संत सावता माळी यांचा अभंग सादर केला. सम्राट हटकर यांनी प्रास्तविक केले. रामभाऊ डोंगरे यांनी परिचय करून दिला. सुजाता म्हेत्रे यांनी सूत्रसंचालन केले तर निशा भोसले यांनी आभार मानले.