शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानाचा आधार नसलेली भक्ती केवळ अंधश्रद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST

सातारा : अनेक ईश्वर नाहीत, एकच ईश्वर आहे आणि तो म्हणजे विठ्ठल, एकेश्वरवादामुळे अंधश्रद्धा संपते. ज्या भक्तीला विवेकाची जोड ...

सातारा : अनेक ईश्वर नाहीत, एकच ईश्वर आहे आणि तो म्हणजे विठ्ठल, एकेश्वरवादामुळे अंधश्रद्धा संपते. ज्या भक्तीला विवेकाची जोड नाही आणि विज्ञानाचा आधार नाही, ती भक्ती अंधश्रद्धा म्हणून नावारूपाला येते. शोषण, व्यसनाधिनता, स्वैराचार, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा या सर्व सामाजिक रोगांविरोधात संतांनी विचार दिले आहेत. देव प्राप्त करण्यासाठी वैदिक कर्मकांडाच्या अंधश्रद्धा संतांनी नाकारल्या, असे मत डॉ. सुहास महाराज फडतरे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित आषाढी वारीनिमित्त ‘विवेकाची वारी’ या तीनदिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेचा शनिवारी दुसरा दिवस होता. शनिवार, १७ जुलै रोजी सुप्रसिद्ध कीर्तनकार डॉ. सुहास फडतरे महाराज, (कोरेगाव, सातारा) यांचे ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संतांचा जागर’ या विषयावर व्याख्यान पार पडले.

यावेळी डॉ. फडतरे म्हणाले, ‘वारीमध्ये फक्त देव प्रसन्न व्हावा म्हणून लोक पायी चालत नाहीत. वारीमध्ये संतांच्या विचारांचा जागर होतो. समाजाचं नेमकं प्रबोधन होण्यासाठी आणि अंध परंपरेची जळमटे दूर करण्यासाठी आम्ही विविध संत साहित्य गात पुढे जातो. पंढरपूर हे संतांच्या विवेकी विचारांचे माहेर आहे आणि तेथे सर्व संतांचे विचार आम्हाला मिळतात म्हणून आम्ही ही वारी करतो.’

संत साहित्यामध्ये गरीब-श्रीमंत ही विषमतासुद्धा समोर येते, याचे उदाहरण देताना फडतरे महाराज हे संत नामदेवांचा एक अभंग सांगतात, ‘तुम्हा घरी चोळी लुगडी, आम्हा घरी पोरे उघडी; तुम्हा घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर घुशी’.

‘संतांचे साहित्य वैदिक कर्मकांडाला फाटा देऊन समतावादी पर्याय देते आणि फक्त नामस्मरणातून ईश्वरप्राप्तीचा मार्ग समजावून सांगितला. जो ज्ञानाचा द्वेष करतो, जो आळशी असतो तो अंधश्रद्धेला बळी पडताे. या समाजाला अज्ञानी ठेवून लूट केली जाते. म्हणून समाजाला ज्ञानी करण्यासाठी संत पुढे आले पण त्यांनी चमत्कार केले नाहीत, त्यांनी प्रबोधन केले,’ असे शेवटी फडतरे महाराज म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वराज आणि महेश धनवटे यांनी संत सावता माळी यांचा अभंग सादर केला. सम्राट हटकर यांनी प्रास्तविक केले. रामभाऊ डोंगरे यांनी परिचय करून दिला. सुजाता म्हेत्रे यांनी सूत्रसंचालन केले तर निशा भोसले यांनी आभार मानले.