शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

कास परिसरात लावणी कामांचा खोळंबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:25 IST

पेट्री : शहराच्या पश्चिमेस कास परिसरात पावसाने दडी मारल्याने भात व नाचणीच्या रोपांची लावणी खोळंबली आहे. रोपे तयार झाली ...

पेट्री : शहराच्या पश्चिमेस कास परिसरात पावसाने दडी मारल्याने भात व नाचणीच्या रोपांची लावणी खोळंबली आहे. रोपे तयार झाली असून पावसाअभावी लावणी करता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून कास परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याने शेतीची कामे रखडली असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. भातलावणी करण्यासाठी पाऊस नसल्याने शेतकरीवर्ग दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

दरवर्षी जून महिन्याच्या उत्तरार्धात भात, नाचणीच्या लावणीला सुरुवात करण्याचा शेतकऱ्यांचा कल असतो. परंतु पाऊस योग्य वेळी न पडल्याने नाईलाजाने शेतीची कामे थांबवावी लागली आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कास परिसर तसेच डोंगरमाथ्यावरील भागात भात, नाचणी, वरीची रोपे उन्हाच्या तडाख्यामुळे करपू लागली आहेत. पावसाअभावी वावरात चिखल होत नसल्याने लावणीची कामे खोळंबली आहेत. काही ठिकाणी भात, नाचणीची रोपे उन्हामुळे पिवळी पडून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

कास परिसरात अधूनमधून अत्यल्प तुरळक पाऊस पडत असला तरी उन्हाच्या तडाख्यामुळे भातशेती किंवा नाचणीसाठी हा पाऊस फायदेशीर नसून बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस झाला; परंतु लावणीसाठी हवा असणारा पाऊस अद्याप नाही. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खतांचा खर्च, मशागतीचा खर्च करून तरव्यांची पेरणी केली. भात, नाचणीच्या रोपांची वाढ चांगली झाली आहे. मात्र, पाऊस नसल्याने रोपे वाळायला लागली आहेत. त्यामुळे कास परिसरात शेतकऱ्यांना खरीप हंगाम वाया जाण्याची भीती वाटत आहे.

(चौकट)

वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला.....

कास परिसर व डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. संपूर्ण शेती पावसावर अवलंबून असून, येथील शेतकरी प्रामुख्याने शेती करून भात, नाचणीची पिके घेतात. बऱ्याचदा हातातोंडाशी आलेल्या पिकांना वन्यप्राण्यांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागते. सध्या पावसाने उघडीप दिल्याने लावणीचे संकट समोर उभे राहिले असल्याने शेतकरीवर्ग चिंतातुर आहे.

(कोट)

भात नाचणीच्या तरव्याच्या पेरण्या होऊन महिना सव्वा महिना झाला. परंतु अद्याप पाऊस नसल्याने लावणीची कामे रखडली असून, पिकेदेखील वाळायला सुरुवात झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

-आत्माराम आखाडे, शेतकरी, कुसुंबीमुरा

०७पेट्री

कास परिसरात ओढ्यालगत असणाऱ्या रोपांना पाणी देता येते. परंतु पूर्णतः पावसावर अवलंबून असणारी रोपे वाळायला सुरुवात झाली आहे. (छाया : सागर चव्हाण)