शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

देसाई-पाटणकरांचा पैसा लागला खुळखुळू!

By admin | Updated: August 23, 2014 23:47 IST

उध्दव ठाकरेंची सभा : पन्नास लाखांचा हिशोब म्हणे डोळे विस्फारणारा

पाटण : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तालुक्यात आणून त्यांच्यासमोरच शंभूराज देसाई यांनी सांगितले की, ’माझा पराभव जनतेने नाही तर विक्रमसिंह पाटणकरांच्या धनशक्तीने केला.’ यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आपली मते विकू नका, गतवेळेपेक्षा आता चौपट भाव होईल.’ या आरोपवर लगेचच आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी पत्रक काढून ‘शंभूराज देसाई यांनी एक दिवसात ५० लाखांहून अधिक चुराडा केला. एवढा पैसा कुठून आणला ते जाहीर करावे,’ अशी टीका केल्यामुळे पाटण तालुक्याचे राजकारण आता देसाई-पाटणकर यांच्या संपत्तीपर्यंत येऊन ठेपले आहे. पाटण तालुक्यातील राजकारण आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे. परिणामी येथील राजकीय पटलावर कोणतीही घटना घडलीतरी त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष गेल्याशिवाय राहत नाही. पाटण तालुक्याचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेभोवतीच फिरते. २००९ च्या निवडणुकीत ५८० मतांनी पराभव झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसांपासून शंभूराज देसाई यांनी आजअखेर नेहमीच पाटणकरांच्या धनशक्तीने माझा पराभव केल्याची ओरड करत आले आहेत. पाटणकरांनी कोयना अ‍ॅग्रो, सकस यासारखे खासगी उद्योग काढून स्वत:चा फायदा करून घेतला. तालुक्यातील तरुणांसाठी एक सार्वजनिक उद्योग उभा केला का ? असा सवाल शंभूराज देसाई नेहमीच करतात तर देसाई कारखाना वगळता एकसुद्धा उद्योग निर्मिती देसार्इंना करता आली नाही, मग उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी एवढा पैसा कुठून आला असे कोणते उद्याग व्यवसाय त्यांनी उभे केले हे जाहीर करावे, असे आव्हान करून विक्रमसिंह पाटणकर यांनी प्रथमच देसार्इंच्या विरोधात एवढी आक्रमक भूमिका घेतली आहे. एवढेच नव्हे तर मरळी येथील कार्यक्रमावर जो पैसा खर्च केला तोच पैसा जर ऊस उत्पादकांना दिला असता तर शेतकऱ्यांना आनंद झाला असता. शेकडो दुचाकींची रॅली ५०० हून अधिक वाहने, भव्य मंडप हे प्रदर्शन दाखविण्याचा मोह देसार्इंना टाळता आला नाही. मात्र, दुसरीकडे कारखान्याच्या कामगारांचा पगार देणे असलेली थकबाकी असे असताना राजकारणासाठी कोट्यवधींचा खर्च कशाचे द्योतक आहे,’ अशी टीका आता पाटण तालुक्यातून होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)वाद नेहमीचाच..!राजकारणाचा विचार करता गेल्या काही दिवसांत पाटण तालुका नेहमीच संघर्षमय बनला आहे. पाटण तालुक्यात कोणताही वाद असलातरी तो राजकीयच असतो, ही बाब लपून राहिलेली नाही. परिणामी यामध्ये आपोआपच आ. विक्रमसिंह पाटणकर आणि माजी आ. शंभूराज देसाई येतात. ग्रामीण भागात वाद झाला तरी तो आमदार पाटणकर आणि माजी आमदार देसाई गटाशीच जोडला जात आहे.