शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

देसाई-पाटणकर गटांत खडाजंगी

By admin | Updated: March 4, 2016 00:59 IST

पाटण पंचायत समिती : नरेंद्र पाटील यांच्या बैठकीत आमदार गटाच्या सदस्यांचा सभात्याग

पाटण : विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी पाटण पंचायत समितीच्या सभागृहात बोलविलेल्या बैठकीत आमदार शंभूराज देसाई गटाच्या उपसभापती व इतर पंचायत समिती सदस्यांनी आम्हाला तालुक्याच्या पाणी टंचाई आढावा बैठकीला का बोलविले नाही? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे देसाई-पाटणकर गटात जोरदार खडाजंगी झाली.दरम्यान, विधानपरिषदेच्या आमदारांना बैठक घेता येते असा जीआर आहे का? असा सवाल ही उपस्थित झाला. त्यावर आमदार पाटील व गटविकास अधिकारी एस. के. गौतम यांनी ही पाणी टंचाई बैठक केवळ अधिकाऱ्यांची असून, पदाधिकाऱ्यांना बोलविले नव्हते, असे सांगितले. तर जीआर बघावयाचा असेल तर मंत्रालयात जा असे आमदारांनी सुनावले. त्यावर समाधान न झाल्यामुळे आ. देसाई गटाच्या सदस्यांनी सभा सुरू होताच सभात्याग केला. गुरुवारी आमदार नरेंद्र पाटील यांनी पाणी टंचाई आढावा बैठक सुरू करतानाच आमदार देसाई गटाचे उपसभापती व सदस्य हजर राहिल्याचे ओळखले. त्यांनी सुरुवातीलाच सांगितले की, मी आमदार आहे. आणि ढेबेवाडी माझे गाव आहे. मी तालुक्यातीलच असल्यामुळे मला अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्याचा अधिकार आहे. त्यानंतर उपसभापती डी. आर. पाटील यांनी हस्तक्षेप करत गटविकास अधिकाऱ्यांनी या बैठकीबाबत आम्हाला का कळविले नाही. याबाबत लगेचच आमदारांनी सांगितले की, तुम्ही नंतर बैठक घ्या आणि सभापती, ‘बीडीओ’ना विचारा या बैठकीत व्यत्यय आणू नका. अधिकाऱ्यांनी प्रथम मला सांगावे की, माजी आमदार पाटणकर यांनी आमदार असताना शेवटच्या १ वर्षात मंजूर केलेल्या कामांचे स्पष्टीकरण द्यावे. मी आता राष्ट्रवादीची बैठक लावलेली नाही. मी लोकप्रतिनिधी या नात्याने आढावा घेत आहे. त्यानंतर आ. देसाई गटाचे उपसभापती डी. आर. पाटील, सदस्य विजय पवार, नथूराम कुंभार, रघुनाथ माटेकर, सुमन जाधव आणि विजया देसाई हे बैठकीतून उठून गेले. त्यानंतर बैठकीत पाणीटंचाईचा आढावा झाला. यावेळी सभापती संगीता गुरव, सत्यजित पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर, राजाभाऊ शेलार, शोभा कदम, राजाभाऊ काळे, सुभाष पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) अधिकाऱ्यांच्या घरात राहायला येऊतालुक्यातील पाणी टंचाईबाबत अधिकारी सुस्त असल्याचे जाणवत आहे. एकूण ७ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असूनही अद्याप टँकर सुरू नाहीत. अधिकाऱ्यांनी संपूर्ण पाणी टंचाई होईपर्यंत वाट बघू नये. येत्या दोन दिवसांत टँकर सुरू करा. अन्यथा अधिकाऱ्यांच्या घरी टंचाईग्रस्त लोक राहायला येतील. असा इशारा नरेंद्र पाटील यांनी बैठकीत दिला.१०० गावे टंचाईच्या छायेतयेत्या मे अखेर तालुक्यातील १०० गावे पाणी टंचाईच्या टप्प्यात येणार असून, सध्या बौद्धवस्ती (डावरी) शिद्रु्रकवाडी, आंबेवाडी, घोट (फडतरवाडी), ज्योतिबाचीवाडी अशी ७ गावे टँकरच्या मागणीत आहेत.