शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देसाई-पाटणकर गटांत खडाजंगी

By admin | Updated: March 4, 2016 00:59 IST

पाटण पंचायत समिती : नरेंद्र पाटील यांच्या बैठकीत आमदार गटाच्या सदस्यांचा सभात्याग

पाटण : विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी पाटण पंचायत समितीच्या सभागृहात बोलविलेल्या बैठकीत आमदार शंभूराज देसाई गटाच्या उपसभापती व इतर पंचायत समिती सदस्यांनी आम्हाला तालुक्याच्या पाणी टंचाई आढावा बैठकीला का बोलविले नाही? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे देसाई-पाटणकर गटात जोरदार खडाजंगी झाली.दरम्यान, विधानपरिषदेच्या आमदारांना बैठक घेता येते असा जीआर आहे का? असा सवाल ही उपस्थित झाला. त्यावर आमदार पाटील व गटविकास अधिकारी एस. के. गौतम यांनी ही पाणी टंचाई बैठक केवळ अधिकाऱ्यांची असून, पदाधिकाऱ्यांना बोलविले नव्हते, असे सांगितले. तर जीआर बघावयाचा असेल तर मंत्रालयात जा असे आमदारांनी सुनावले. त्यावर समाधान न झाल्यामुळे आ. देसाई गटाच्या सदस्यांनी सभा सुरू होताच सभात्याग केला. गुरुवारी आमदार नरेंद्र पाटील यांनी पाणी टंचाई आढावा बैठक सुरू करतानाच आमदार देसाई गटाचे उपसभापती व सदस्य हजर राहिल्याचे ओळखले. त्यांनी सुरुवातीलाच सांगितले की, मी आमदार आहे. आणि ढेबेवाडी माझे गाव आहे. मी तालुक्यातीलच असल्यामुळे मला अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्याचा अधिकार आहे. त्यानंतर उपसभापती डी. आर. पाटील यांनी हस्तक्षेप करत गटविकास अधिकाऱ्यांनी या बैठकीबाबत आम्हाला का कळविले नाही. याबाबत लगेचच आमदारांनी सांगितले की, तुम्ही नंतर बैठक घ्या आणि सभापती, ‘बीडीओ’ना विचारा या बैठकीत व्यत्यय आणू नका. अधिकाऱ्यांनी प्रथम मला सांगावे की, माजी आमदार पाटणकर यांनी आमदार असताना शेवटच्या १ वर्षात मंजूर केलेल्या कामांचे स्पष्टीकरण द्यावे. मी आता राष्ट्रवादीची बैठक लावलेली नाही. मी लोकप्रतिनिधी या नात्याने आढावा घेत आहे. त्यानंतर आ. देसाई गटाचे उपसभापती डी. आर. पाटील, सदस्य विजय पवार, नथूराम कुंभार, रघुनाथ माटेकर, सुमन जाधव आणि विजया देसाई हे बैठकीतून उठून गेले. त्यानंतर बैठकीत पाणीटंचाईचा आढावा झाला. यावेळी सभापती संगीता गुरव, सत्यजित पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर, राजाभाऊ शेलार, शोभा कदम, राजाभाऊ काळे, सुभाष पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) अधिकाऱ्यांच्या घरात राहायला येऊतालुक्यातील पाणी टंचाईबाबत अधिकारी सुस्त असल्याचे जाणवत आहे. एकूण ७ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असूनही अद्याप टँकर सुरू नाहीत. अधिकाऱ्यांनी संपूर्ण पाणी टंचाई होईपर्यंत वाट बघू नये. येत्या दोन दिवसांत टँकर सुरू करा. अन्यथा अधिकाऱ्यांच्या घरी टंचाईग्रस्त लोक राहायला येतील. असा इशारा नरेंद्र पाटील यांनी बैठकीत दिला.१०० गावे टंचाईच्या छायेतयेत्या मे अखेर तालुक्यातील १०० गावे पाणी टंचाईच्या टप्प्यात येणार असून, सध्या बौद्धवस्ती (डावरी) शिद्रु्रकवाडी, आंबेवाडी, घोट (फडतरवाडी), ज्योतिबाचीवाडी अशी ७ गावे टँकरच्या मागणीत आहेत.