शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारे कायदे रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:37 IST

खंडाळा : ‘शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारे तिन्ही कायदे रद्द करावेत,’ या मागणीसाठी खंडाळा तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर ...

खंडाळा : ‘शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारे तिन्ही कायदे रद्द करावेत,’ या मागणीसाठी खंडाळा तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या मागणीला पाठिंबा देण्याच्या उद्देशानेच पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. या अनुषंगाने खंडाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात दीडशेच्या वर शेतकरी आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकार या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून हे कायदे रद्द करत नाही आणि दुसरीकडे या आंदोलनाला बदनाम करून शहीद आंदोलकांच्या बाबत जबाबदार लोकप्रतिनिधी ज्याप्रकारे प्रतिक्रिया देतात त्या वाचाळवीरांचा बंदोबस्त करण्यातही केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, याचाही विचार केंद्र सरकार करत नाही आणि शेतकरी आंदोलकांशी चर्चाही करत नाही, ही बाब गंभीर आहे. हा लोकशाहीचा घोर अपमान असल्याचे निदर्शनास येत आहे.

शेतकरी आंदोलनाच्या मागण्यांचा तातडीने विचार करून ते तीन कायदे रद्द करून दीर्घकाळ चालू असलेले अन्नदाता शेतकरीवर्गाचे आंदोलन थांबवावे आणि सर्वसामान्य शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी तालुकाध्यक्ष कांतीलाल खुंटे यांनी केली.