शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

पिंपरी ते रिसवड रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:40 IST

मसूर : पिंपरी ते रिसवड रस्त्याची दुरवस्था झाली असून, हा रस्ता गेले अनेक वर्षे दुरुस्ती केला नसल्याने दुरवस्थेत आहे. ...

मसूर : पिंपरी ते रिसवड रस्त्याची दुरवस्था झाली असून, हा रस्ता गेले अनेक वर्षे दुरुस्ती केला नसल्याने दुरवस्थेत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधित रस्ता हा शामगाव घाटातून खाली येऊन कऱ्हाडला राष्ट्रीय महामार्गाला जाण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणून बनविण्यात आला होता. मात्र, हा रस्ता उखडल्याने या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हद्दीचे संरक्षण; पण स्वच्छतेची ऐशीतैसी

मलकापूर : शहरात दोन हजारांवर खुल्या प्लॉटपैकी बहुतांशी प्लॉटला हजारो रुपये खर्च करून वॉलकंपाउंड व गेट बसवून हद्दीबाबत पुरेपूर काळजी घेतली गेली आहे. मात्र, अशा पद्धतीने हजारो रुपये खर्च केलेल्या जागेत कुंपणापेक्षा झुडपे व गवत जादा वाढल्यामुळे स्वच्छतेबाबत उदासीनता असल्याचे दिसत आहे. हे खुले प्लॉट परिसरातील रहिवाशांची डोकेदुखी ठरत आहेत. तसेच पालिकेच्या स्वच्छता मोहिमेलाही गालबोट लागत आहे. त्यामुळे अशा खुल्या प्लॉटच्या स्वच्छतेबाबत पालिकेकडून कार्यवाही होणे गरजेचे आहे.

भुरभुशीच्या घाटातील संरक्षक कठडे ढासळले

उंडाळे : येळगाव फाटा ते गुढे (ता. पाटण) या रस्त्यावर येळगावकडून भुरभुशीकडे जाण्यासाठी अवघड घाट रस्ता लागतो. या घाट रस्त्याचे संरक्षक कठडे नुकतेच बांधण्यात आले आहेत. मात्र, कठड्याच्या आत भराव न केल्याने वाहनांच्या धडकेत ते कोसळण्याची शक्यता आहे. परिणामी अशा घाटातील दर्जाहिन कठडे धोकादायक बनले असून, या कठड्यात तातडीने भराव करावा, अशी मागणी घाट रस्त्यातून दररोज प्रवास करणाऱ्या वाहनधारक व ग्रामस्थांतून होत आहे.

बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

मलकापूर : आगाशिवनगरात रस्त्यावरील पार्किंगमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांनी याबाबत पोलिसांसह पालिकेकडे अनेक लेखी तक्रारी केल्या. या सर्व तक्रारीचा विचार करून पालिकेने अतिक्रमण हटविण्याचा विषय गांभीर्याने घेतला होता. कोल्हापूर नाका ते नांदलापूर हद्दीपर्यंत दोन्ही उपमार्गावर व कऱ्हाड ते ढेबेवाडी रस्त्यालगत अनेक विनापरवाना हातगाडे, वाहनातून रस्त्यांवरच व्यवसाय करीत आहेत. काही ठिकाणी फूटपाथवर दुकाने, तर रस्त्यावर पार्किंग होत असल्यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी व अपघात घडले आहेत.