शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

रिफ्लेक्टरची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:10 IST

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर ...

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. प्रामुख्याने वाढे फाटा ते आनेवाडी टोलनाका या परिसरात दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टरला अभाव जाणवत आहे. महामार्ग प्राधिकरणने धोकादायक ठिकाणी तातडीने रिफ्लेक्टर लावावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

कठड्यांची दुरवस्था

महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादूपर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात अनेक ठिकाणी सरंक्षक कठडे नसल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. प्रामुख्याने रात्रीच्यावेळी वाहनधारकांना अनेक अडचणी येत आहे. मुसळधार पावसामुळे या घाटात अनेकदा दरडी कोसळल्या असून, संरक्षक कठड्यांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलक नसल्याने पर्यटक व वाहनधारकांची नेहमीच फसगत होताना दिसत आहे. बांधकाम विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.

रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था

सातारा : शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. कोटेश्वर मंदिर ते मोळाचा ओढा या रस्त्यावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून, खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना नेमका कोणता खड्डा चुकवायचा? असा प्रश्न पडत आहे. रस्त्याची तातडीने डागडुजी करून वाहनधारकांची परवड थांबवावी, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून होत आहे.

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात पुन्हा वाढ

सातारा : शासनाने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली. त्यानुसार सातारा पालिकेच्या वतीने शहरात प्लास्टिकविरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात आली. विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांसह तत्सम वस्तू जप्त करून दंडही वसूल करण्यात आला. ही मोहीम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने शहरातील छोट्या-मोट्या विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात पुन्हा वाढ झाली आहे. पालिकेने प्लास्टिक विरोधी कारवाई सुरू करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

जलवाहिनीला गळती

सातारा : सदर बजार, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद व गोडोली आदी भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. जीवन प्राधिकरणकडून गळती काढण्याचे काम तातडीने केले जाते; परंतु बऱ्याचदा अवजड वाहनांमुुळे जलवाहिनी फुटण्याच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. जीवन प्राधिकरणने गळतीचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.

घाणीचे साम्राज्य

सातारा : सातारा पालिकेकडून ‘कुंडी मुक्त’ सातारा ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या अंतर्गत शहरातील सर्व कचरा कुंड्या हटविण्यात आल्या आहेत. मात्र, मार्केट यार्ड परिसरात रस्त्यावर भरणाऱ्या भाजी मंडईमुळे या योजनेला खो बसत आहे. विक्रीयोग्य नसलेला भाजीपाला रस्त्यावरच टाकला जात असल्याने ठिकठिकाणी कचऱ्याने ढीग साचले असून, याचा पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.