शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

रिफ्लेक्टरची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:10 IST

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर ...

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. प्रामुख्याने वाढे फाटा ते आनेवाडी टोलनाका या परिसरात दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टरला अभाव जाणवत आहे. महामार्ग प्राधिकरणने धोकादायक ठिकाणी तातडीने रिफ्लेक्टर लावावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

कठड्यांची दुरवस्था

महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादूपर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात अनेक ठिकाणी सरंक्षक कठडे नसल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. प्रामुख्याने रात्रीच्यावेळी वाहनधारकांना अनेक अडचणी येत आहे. मुसळधार पावसामुळे या घाटात अनेकदा दरडी कोसळल्या असून, संरक्षक कठड्यांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलक नसल्याने पर्यटक व वाहनधारकांची नेहमीच फसगत होताना दिसत आहे. बांधकाम विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.

रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था

सातारा : शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. कोटेश्वर मंदिर ते मोळाचा ओढा या रस्त्यावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून, खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना नेमका कोणता खड्डा चुकवायचा? असा प्रश्न पडत आहे. रस्त्याची तातडीने डागडुजी करून वाहनधारकांची परवड थांबवावी, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून होत आहे.

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात पुन्हा वाढ

सातारा : शासनाने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली. त्यानुसार सातारा पालिकेच्या वतीने शहरात प्लास्टिकविरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात आली. विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांसह तत्सम वस्तू जप्त करून दंडही वसूल करण्यात आला. ही मोहीम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने शहरातील छोट्या-मोट्या विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात पुन्हा वाढ झाली आहे. पालिकेने प्लास्टिक विरोधी कारवाई सुरू करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

जलवाहिनीला गळती

सातारा : सदर बजार, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद व गोडोली आदी भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. जीवन प्राधिकरणकडून गळती काढण्याचे काम तातडीने केले जाते; परंतु बऱ्याचदा अवजड वाहनांमुुळे जलवाहिनी फुटण्याच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. जीवन प्राधिकरणने गळतीचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.

घाणीचे साम्राज्य

सातारा : सातारा पालिकेकडून ‘कुंडी मुक्त’ सातारा ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या अंतर्गत शहरातील सर्व कचरा कुंड्या हटविण्यात आल्या आहेत. मात्र, मार्केट यार्ड परिसरात रस्त्यावर भरणाऱ्या भाजी मंडईमुळे या योजनेला खो बसत आहे. विक्रीयोग्य नसलेला भाजीपाला रस्त्यावरच टाकला जात असल्याने ठिकठिकाणी कचऱ्याने ढीग साचले असून, याचा पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.