शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव पुलाची पुनर्बांधणी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : दक्षिण मांड नदीला आलेल्या पुरामुळे नांदगाव येथील पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कऱ्हाड : दक्षिण मांड नदीला आलेल्या पुरामुळे नांदगाव येथील पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी केली. त्यावेळी दिवंगत यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले यांनी दूरदृष्टीने बनवलेला हा पूल असून, त्याची पुनर्बांधणी आपल्याकडून व्हावी, अशी भावनिक साद नांदगावमधील ग्रामस्थांनी डाॅ. भोसले यांना घातली.

कृष्णा कारखान्याचे राम-लक्ष्मण म्हणून यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले यांची राज्यभर ओळख होती. कृष्णा कारखाना परिसरात कृष्णा नदीच्या पाण्याने हिरवाई फुलत होती. उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून शेत शिवारात पाणी फिरले होते. पाचवड फाट्यापासून काले विभागापर्यंत नदीचे पाणी पोहोचले होते. येथील शेतकरी ऊसाचे पीक घेत होते. त्यावेळी नांदगाव व परिसरातील माळरान असलेली शेती ओलिताखाली यावी, हा उद्दात हेतू ठेवून या परिसरात पाणी योजना राबविण्यात आल्या.

त्यावेळी नांदगाव येथे जात असताना नदीच्या पात्रातून जावे लागत होते. पाणी योजना सुरू झाल्याने दळणवळणाचा प्रश्न उपस्थित झाला. १९७४मध्ये या दोन बंधूंनी ऊसाची वाहतूक विचारात घेऊन या नदीवर सुमारे १५० मीटर लांबीचा पूल बांधला. त्यामुळे येथील वाडी-वस्ती, लहान गावे यांची गैरसोय टळली. या पुलावरून अवजड वाहने ये-जा करू लागली. नदीचे पाणी अडविण्याची सोय झाली अन् शेकडो एकर शेती पाण्याखाली आली. गेली ४५ वर्षे हा पूल अनेकांचा आधार बनला आहे.

ग्रामस्थांनी या पुलामागे यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले यांच्या आठवणी जोडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या आठवणी चिरकाल राहाव्यात, अशी भावना येथील जनतेची आहे. येथे नव्याने पूल बांधला जावा, यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी साद डॉ. भोसले यांना ग्रामस्थांनी घातली. त्यामुळे डॉ. भोसले यांनी यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत, अशी जनतेची अपेक्षा आहे.

चौकट -

मागील दीड वर्षापासून या पुलासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. आता पुरामुळे पुलाचे नुकसान झाल्याने नवीन पूल बांधण्याच्या मागणीला जोर आला आहे. या मागणीकडे लोकप्रतिनिधी किती व कसे लक्ष देतात, हे पाहावे लागणार आहे.

नांदगाव (ता. कऱ्हाड) येथील पुलाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. त्याची पाहणी डॉ. अतुल भोसले व ग्रामस्थांनी केली.