शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

भटक्या श्वानांच्या बंदोबस्ताची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:47 IST

खटाव : खटावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे श्वान ये-जा ...

खटाव : खटावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे श्वान ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या तसेच वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. ग्रामपंचायतीने भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

बाजारपेठेत कांद्याचे दर स्थिर

लोणंद : बाजारपेठेत गेल्या आठ दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर आहेत. सध्या २० ते २५ रुपये किलो या दराने कांद्याची विक्री केली जात आहे. दर स्थिर असल्याने ग्राहकांमधून कांद्याला मागणी वाढली आहे. येत्या काही दिवसांत दर आणखीन उतरणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

धोम, बलकवडीत पर्यटकांची गर्दी

वाई : वाई तालुक्यातील धोम व बलकवडी धरणाचा परिसर सध्या पर्यटकांना खुणावू लागला आहे. महाबळेश्वर व पाचगणीला भेट देणारे हौशी पर्यटक धोम, बलकवडीला भेट देऊन येथील सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. घोडेस्वारी तसेच नौकाविहाराला पर्यटक पसंती देत असून, शनिवार व रविवार हा परिसर पर्यटकांनी गजबजून जात आहे.

अजिंक्यताऱ्यावर सर्रास वृक्षतोड

सातारा : सातारा शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून वृक्षतोड सुरू आहे. या वृक्षतोडीमुळे किल्ल्यावरील वृक्षसंपदेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. प्रारंभी झाडाच्या ओल्या फांद्या तोडून त्या आहे त्याच जागेवर टाकल्या जातात. फांद्या सुकल्या की काही दिवसांनंतर त्याची मोळी बांधून नेली जाते. गेल्या अनेक महिन्यांपासून किल्ल्यावर हा प्रकार सुरू आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मंडई परिसरात घाणीचे साम्राज्य

सातारा : सातारा पालिकेकडून ‘कुंडी मुक्त’ सातारा ही संकल्पना राबविण्यात आली आहे. याअंतर्गत महात्मा फुले भाजी मंडई व मार्केट यार्ड परिसरातील कुंड्या हटविल्याने हा परिसर घाणीच्या विळख्यातून मुक्त होईल, असे वाटत असतानाच या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरल्याने विक्रेत्यांबरोबरच खरेदीसाठी येणाऱ्या अनेक ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पालिकेसमोरच जलवाहिनीला गळती

सातारा : पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वाराजवळ जलवाहिनीच्या एका वॉल्व्हला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र, काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली. पालिकेने ही गळती कायमस्वरूपी काढावी, अशी मागणी होत आहे.

वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी

सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, शिवराज पेट्रोल पंप या ठिकाणी वाहतुकीचे कोणतेच नियोजन नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. या परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अत्यावश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टर लावण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.