शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

भटक्या श्वानांच्या बंदोबस्ताची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:47 IST

खटाव : खटावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे श्वान ये-जा ...

खटाव : खटावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे श्वान ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या तसेच वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. ग्रामपंचायतीने भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

बाजारपेठेत कांद्याचे दर स्थिर

लोणंद : बाजारपेठेत गेल्या आठ दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर आहेत. सध्या २० ते २५ रुपये किलो या दराने कांद्याची विक्री केली जात आहे. दर स्थिर असल्याने ग्राहकांमधून कांद्याला मागणी वाढली आहे. येत्या काही दिवसांत दर आणखीन उतरणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

धोम, बलकवडीत पर्यटकांची गर्दी

वाई : वाई तालुक्यातील धोम व बलकवडी धरणाचा परिसर सध्या पर्यटकांना खुणावू लागला आहे. महाबळेश्वर व पाचगणीला भेट देणारे हौशी पर्यटक धोम, बलकवडीला भेट देऊन येथील सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. घोडेस्वारी तसेच नौकाविहाराला पर्यटक पसंती देत असून, शनिवार व रविवार हा परिसर पर्यटकांनी गजबजून जात आहे.

अजिंक्यताऱ्यावर सर्रास वृक्षतोड

सातारा : सातारा शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून वृक्षतोड सुरू आहे. या वृक्षतोडीमुळे किल्ल्यावरील वृक्षसंपदेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. प्रारंभी झाडाच्या ओल्या फांद्या तोडून त्या आहे त्याच जागेवर टाकल्या जातात. फांद्या सुकल्या की काही दिवसांनंतर त्याची मोळी बांधून नेली जाते. गेल्या अनेक महिन्यांपासून किल्ल्यावर हा प्रकार सुरू आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मंडई परिसरात घाणीचे साम्राज्य

सातारा : सातारा पालिकेकडून ‘कुंडी मुक्त’ सातारा ही संकल्पना राबविण्यात आली आहे. याअंतर्गत महात्मा फुले भाजी मंडई व मार्केट यार्ड परिसरातील कुंड्या हटविल्याने हा परिसर घाणीच्या विळख्यातून मुक्त होईल, असे वाटत असतानाच या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरल्याने विक्रेत्यांबरोबरच खरेदीसाठी येणाऱ्या अनेक ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पालिकेसमोरच जलवाहिनीला गळती

सातारा : पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वाराजवळ जलवाहिनीच्या एका वॉल्व्हला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र, काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली. पालिकेने ही गळती कायमस्वरूपी काढावी, अशी मागणी होत आहे.

वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी

सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, शिवराज पेट्रोल पंप या ठिकाणी वाहतुकीचे कोणतेच नियोजन नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. या परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अत्यावश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टर लावण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.