शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या श्वानांच्या बंदोबस्ताची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:47 IST

खटाव : खटावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे श्वान ये-जा ...

खटाव : खटावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे श्वान ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या तसेच वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. ग्रामपंचायतीने भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

बाजारपेठेत कांद्याचे दर स्थिर

लोणंद : बाजारपेठेत गेल्या आठ दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर आहेत. सध्या २० ते २५ रुपये किलो या दराने कांद्याची विक्री केली जात आहे. दर स्थिर असल्याने ग्राहकांमधून कांद्याला मागणी वाढली आहे. येत्या काही दिवसांत दर आणखीन उतरणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

धोम, बलकवडीत पर्यटकांची गर्दी

वाई : वाई तालुक्यातील धोम व बलकवडी धरणाचा परिसर सध्या पर्यटकांना खुणावू लागला आहे. महाबळेश्वर व पाचगणीला भेट देणारे हौशी पर्यटक धोम, बलकवडीला भेट देऊन येथील सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. घोडेस्वारी तसेच नौकाविहाराला पर्यटक पसंती देत असून, शनिवार व रविवार हा परिसर पर्यटकांनी गजबजून जात आहे.

अजिंक्यताऱ्यावर सर्रास वृक्षतोड

सातारा : सातारा शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून वृक्षतोड सुरू आहे. या वृक्षतोडीमुळे किल्ल्यावरील वृक्षसंपदेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. प्रारंभी झाडाच्या ओल्या फांद्या तोडून त्या आहे त्याच जागेवर टाकल्या जातात. फांद्या सुकल्या की काही दिवसांनंतर त्याची मोळी बांधून नेली जाते. गेल्या अनेक महिन्यांपासून किल्ल्यावर हा प्रकार सुरू आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मंडई परिसरात घाणीचे साम्राज्य

सातारा : सातारा पालिकेकडून ‘कुंडी मुक्त’ सातारा ही संकल्पना राबविण्यात आली आहे. याअंतर्गत महात्मा फुले भाजी मंडई व मार्केट यार्ड परिसरातील कुंड्या हटविल्याने हा परिसर घाणीच्या विळख्यातून मुक्त होईल, असे वाटत असतानाच या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरल्याने विक्रेत्यांबरोबरच खरेदीसाठी येणाऱ्या अनेक ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पालिकेसमोरच जलवाहिनीला गळती

सातारा : पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वाराजवळ जलवाहिनीच्या एका वॉल्व्हला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र, काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली. पालिकेने ही गळती कायमस्वरूपी काढावी, अशी मागणी होत आहे.

वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी

सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, शिवराज पेट्रोल पंप या ठिकाणी वाहतुकीचे कोणतेच नियोजन नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. या परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अत्यावश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टर लावण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.