शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

हवामानाच्या बदलामुळे कांदा उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:42 IST

खटाव : कांद्याला योग्य दर नसल्यामुळे तसेच हवामान बदलामुळे कांद्यावर पडलेल्या रोगामुळे कांद्याचे उत्पादनात घट झाली आहे. मोठ्या आशेने ...

खटाव : कांद्याला योग्य दर नसल्यामुळे तसेच हवामान बदलामुळे कांद्यावर पडलेल्या रोगामुळे कांद्याचे उत्पादनात घट झाली आहे. मोठ्या आशेने केलेल्या कांदा पिकातून फायदा होण्याऐवजी शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

सध्या खटाव व भुरकवडीच्या सीमेवर अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कांदा कांद्याची पसर केलेली दिसून येत आहे. दरवर्षी या कांद्याला जास्तीचा दर मिळत असल्यामुळे बरेच शेतकरी या कांद्याची लागवड करतात. गेल्यावर्षी या कांद्याला २० ते ३० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी होता. परंतु चालूवर्षी या कांद्याला जागेवर कांदा पाहून नऊ ते दहा रुपये प्रति किलो, असा भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मूळ भांडवल तर सोडाच हाती काहीच रकम मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामानातील बदलामुळे आधीच शेतकरी त्रस्त झाला असताना कांद्यावर पडलेला रोगामुळे औषधे फवारणी आदींचा झालेला खर्च पाहता शेतकऱ्याला दरवर्षीपेक्षा माल कमी निघत असल्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. भुरकवडीच्या माळावर कांद्याची पसर शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु सध्या वातावरणात बदल होत असून, पावसाळी वातावरणामुळे कांदा सुकण्याऐवजी हा कांदा खराब होत आहे. त्या मुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तर कांद्याला दर नसल्यामुळे व्यापारी फिरकत नाहीत. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भुरकवडी येथे माळरानावर टाकलेला कांदा काही शेतकऱ्यांनी जागेवर सोडून दिला आहे तर काही शेतकऱ्यांनी उकिरड्यामध्ये भरला आहे.

चाैकट..

भांडवल निघणेही कठीण...

एका एकरात दीडशे पिशव्या निघणाऱ्या शेतात पन्नास ते पंच्याहत्तर पिशव्या निघत असल्यामुळे कमी निघणाऱ्या मालामुळे तसेच हवामानातील बदलामुळे कांदे व्यवस्थित पोसले गेले नाहीत. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे जेवढे भांडवल घातले आहे, ते सुद्धा निघणे कठीण झाले आहे. एकरी पन्नास हजार रुपये खर्च या कांद्यासाठी येत असून, यावर्षीच्या दरामुळे अत्यंत बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांवर आली आहे.

२४ खटाव

कांद्याला दर नसल्यामुळे भुरकवडी येथे माळरानावर टाकलेला कांदा काही शेतकऱ्यांनी जागेवर सोडून दिला आहे तर काही शेतकऱ्यांनी उकिरड्यामध्ये भरला आहे.