शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

हवामानाच्या बदलामुळे कांदा उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:42 IST

खटाव : कांद्याला योग्य दर नसल्यामुळे तसेच हवामान बदलामुळे कांद्यावर पडलेल्या रोगामुळे कांद्याचे उत्पादनात घट झाली आहे. मोठ्या आशेने ...

खटाव : कांद्याला योग्य दर नसल्यामुळे तसेच हवामान बदलामुळे कांद्यावर पडलेल्या रोगामुळे कांद्याचे उत्पादनात घट झाली आहे. मोठ्या आशेने केलेल्या कांदा पिकातून फायदा होण्याऐवजी शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

सध्या खटाव व भुरकवडीच्या सीमेवर अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कांदा कांद्याची पसर केलेली दिसून येत आहे. दरवर्षी या कांद्याला जास्तीचा दर मिळत असल्यामुळे बरेच शेतकरी या कांद्याची लागवड करतात. गेल्यावर्षी या कांद्याला २० ते ३० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी होता. परंतु चालूवर्षी या कांद्याला जागेवर कांदा पाहून नऊ ते दहा रुपये प्रति किलो, असा भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मूळ भांडवल तर सोडाच हाती काहीच रकम मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामानातील बदलामुळे आधीच शेतकरी त्रस्त झाला असताना कांद्यावर पडलेला रोगामुळे औषधे फवारणी आदींचा झालेला खर्च पाहता शेतकऱ्याला दरवर्षीपेक्षा माल कमी निघत असल्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. भुरकवडीच्या माळावर कांद्याची पसर शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु सध्या वातावरणात बदल होत असून, पावसाळी वातावरणामुळे कांदा सुकण्याऐवजी हा कांदा खराब होत आहे. त्या मुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तर कांद्याला दर नसल्यामुळे व्यापारी फिरकत नाहीत. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भुरकवडी येथे माळरानावर टाकलेला कांदा काही शेतकऱ्यांनी जागेवर सोडून दिला आहे तर काही शेतकऱ्यांनी उकिरड्यामध्ये भरला आहे.

चाैकट..

भांडवल निघणेही कठीण...

एका एकरात दीडशे पिशव्या निघणाऱ्या शेतात पन्नास ते पंच्याहत्तर पिशव्या निघत असल्यामुळे कमी निघणाऱ्या मालामुळे तसेच हवामानातील बदलामुळे कांदे व्यवस्थित पोसले गेले नाहीत. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे जेवढे भांडवल घातले आहे, ते सुद्धा निघणे कठीण झाले आहे. एकरी पन्नास हजार रुपये खर्च या कांद्यासाठी येत असून, यावर्षीच्या दरामुळे अत्यंत बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांवर आली आहे.

२४ खटाव

कांद्याला दर नसल्यामुळे भुरकवडी येथे माळरानावर टाकलेला कांदा काही शेतकऱ्यांनी जागेवर सोडून दिला आहे तर काही शेतकऱ्यांनी उकिरड्यामध्ये भरला आहे.