शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

अनेक दशकांनंतर ते एकमेकांना भेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:42 IST

सातारा : अनेक दशकांच्या खंडानंतर ते एकमेकांना भेटले. प्रत्येकजण एकमेकाला अंदाजानेच हाक मारत होता. कुणाचे केस पांढरे झाले होते, ...

सातारा : अनेक दशकांच्या खंडानंतर ते एकमेकांना भेटले. प्रत्येकजण एकमेकाला अंदाजानेच हाक मारत होता. कुणाचे केस पांढरे झाले होते, तर कुणाच्या डोक्यावर पूर्णपणे टक्कल पडले होते. स्वत: आजी-आजोबा, तर काहीजण आई-बाबा झाल्यानंतरही आपल्या शाळेतील मित्र-मैत्रिणींना आणि शिक्षकांना पाहून आनंदून जात होते. निमित्त होते शिक्षण मंडळ कऱ्हाड या संस्थेच्या कोल्हापुरात राहणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे.

शिक्षण मंडळ कऱ्हाड या संस्थेचे २०२०-२०२१ हे शताब्दी वर्ष. यानिमित्त संस्थेच्या अनेक माजी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी विभागवार मेळावे आयोजित केले आहेत. यातील पहिला मेळावा कोल्हापूर येथे शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात रविवार, दि १० जानेवारी रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे निमंत्रक होते योगिता पाटील, पल्लवी कुलकर्णी, मेधा कुलकर्णी, विनय तोडकर आणि ज्ञानेश्वर भिसे हे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी.

रांगोळी, सनईचे सूर आणि मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी या भारलेल्या वातावरणातच स्वप्ना, योगिता आणि मेधा यांनी शाळेची प्रार्थना म्हणून कार्यक्रमाचा प्रारंभ केला. सरस्वती वंदनेबरोबरच पल्लवी कुलकर्णी यांनी कॅनव्हासवर अ‍ॅक्रेलिक कलरने देवीचे पेंटिंग रेखाटले. माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी ते संस्थेस भेट दिले. नलिनी जुगारे व ज्ञानेश्वर भिसे यांनी तत्कालीन शिक्षकांच्या आठवणी जागविल्या.

शताब्दी महोत्सवाचे समन्वयक राजेंद्र लाटकर यांनी संस्थेच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली व शताब्दी महोत्सवाच्या पुढील कार्यासाठी दिशादर्शन केले. विद्यार्थिनीप्रिय शिक्षिका अनघा परांडकर यांनीही मार्गदर्शनपर भाषण केले. यानंतर अध्यक्ष सदानंद चिंगळे यांनी संस्थेच्या पुढील विस्तारासंबंधी माहिती दिली.

तृप्ती पालेकर-कुलकर्णी व ज्ञानेश्वर भिसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर मेधा कुलकर्णी यांनी आभार मानले. सर्व माजी विद्यार्थ्यांकडून संस्थेला पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.

फोटो : १५ एज्युकेशन

शिक्षण मंडळ कऱ्हाड येथे कोल्हापुरात राहणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.