शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

ब्लॅंकेटच्या धाग्यांचा बनविला मृत्यूचा दोरखंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST

सातारा : साताऱ्यातील बालसुधारगृहात त्याला गुरुवारी सायंकाळी दाखल करण्यात आले. इथं आल्यानंतर तो तणावातच होता. त्या रात्री फारसं जेवणही ...

सातारा : साताऱ्यातील बालसुधारगृहात त्याला गुरुवारी सायंकाळी दाखल करण्यात आले. इथं आल्यानंतर तो तणावातच होता. त्या रात्री फारसं जेवणही त्याने केलं नाही. सकाळी उठल्यानंतर इतर मुलांसोबत तो बोलतही नव्हता. त्याच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते. मुलांची नजर चुकवून तो ब्लॅंकेटचे धागे काढू लागला. शुक्रवारी रात्रभर त्याने ब्लॅंकेटचे इतके धागे काढले की, त्याचा दोरखंड तयार झाला. सरतेशेवटी याच दोरखंडने त्याने इतर मुले झोपेत असताना मृत्यूला कवटाळले.

नात्यातीलच एका मुलीला त्याने काही दिवसांपूर्वी पुण्याला पळवून नेले. मुलगी सज्ञान, तर मुलगा अल्पवयीन. मुलीच्या नातेवाइकांनी वडूज पोलीस ठाण्यात मुलीला पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. मुलीचीही वैद्यकीय चाचणी झाली. त्यामध्ये मुलीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तो अल्पवयीन असल्यामुळे त्याची साताऱ्यातील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. इथे आल्यानंतर तो कावराबावरा झाला होता. एकही शब्द तो कोणाशी बोलायचा नाही. कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्री त्याला झोपण्यासाठी एक चादर आणि ब्लॅंकेट दिले. इतर मुलांच्या शेजारी तो लवकर झाेपला. मात्र, रात्री झोपेतून अचानक उठून ब्लॅंकेटचे धागे काढू लागला. हा प्रकार एका मुलाच्या लक्षात आल्यानंतर त्याने काय करतोयस, असं विचारलं. तेव्हा त्यानं काही नाही. तू झोप. असं म्हणून तोही झोपी गेला. शुक्रवारी सकाळी नाश्टा केल्यानंतर तो शांतच होता. दिवसभर तो कोणाशी बोलला नाही. एकटक पाहत बसायचा. सायंकाळी आठला जेवण झाल्यानंतर सर्व मुले आपापल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेली. त्यावेळी हा संबंधित मुलगा सगळ्यात अगोदर झोपला होता; पण खरं तर त्याने झोपेचं सांग घेतलं होतं. इतर मुले झोपल्याचे पाहून तो उठला. जमेल तेवढे ब्लॅंकेटचे दोर तो काढू लागला. मध्येच कोणाला जाग आली तर तो पुन्हा झोपल्यासारखं करायचा. त्याच्या शेजारच्या मुलाच्या हा प्रकार लक्षात आला होता. मात्र, तो धागे कशासाठी काढतोय, हे त्याला समजलं नाही. रात्रभर तो धागेच काढत होता. त्याने इतके धागे काढले की त्याचा दोरखंड तयार झाला. पहाटे सहाच्या सुमारास लवकर उठून तो बाथरूममध्ये गेला. लोखंडी अँगलला तो दोरखंड बांधला आणि त्याने आत्महत्या केली. सकाळी सात वाजता मुले जेव्हा झोपेतून उठली, तेव्हा त्याने गळफास घेतल्याचे दिसले. या सुधारगृहात एकच हलकल्लोळ माजला. इथून अनेक मुलांनी पलायन केलं होतं; पण अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडल्याने कर्मचारीही हबकून गेले.

चाैकट :

आई-वडिलांसाठी हातावर त्याने ‘हे’ लिहिलं...

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मनगटापासून तळहातावर दोन ओळी लिहिल्या. या ओळींनी पोलिसांचे लक्ष वेधून घेतले. त्याने सुरुवातीला लिहिलं होतं. आई-वडिलांंना त्रास देऊ नका. त्यानंतर पुढे त्याने पाचजणांची नावे लिहिली आहेत. यामध्ये एका मुलीचे, तिच्या वडिलांचे आणि तीन नातेवाइकांची नावे आहेत; पण ही नावे लिहिण्यापाठीमागे त्याचा उद्देश मात्र स्पष्ट होत नाही.

चाैकट :

वडीलही कारागृहात..

मुलीला पळवून नेण्यास मुलाला मदत केल्याचा ठपका ठेवून वडूज पोलिसांनी त्याच्या वडिलांनाही अटक केली आहे. सध्या त्याचे वडील न्यायालयीन कोठडीत आहेत. आपल्यामुळे वडिलांनाही त्रास झाला, हे सहन न झाल्याने कदाचित त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे.