शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर नाक्यावर क्षणाक्षणाला घोंगावतोय मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST

अपघाताची मालिका सुरूच आंब्याचा ट्रक पलटी उड्डाणपूलाच्या प्रतिक्षेत किती जाणार बळी लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर ...

अपघाताची मालिका सुरूच आंब्याचा ट्रक पलटी

उड्डाणपूलाच्या प्रतिक्षेत किती जाणार बळी

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर येथील कोल्हापूर नाक्यावर महामार्गावरील अवजड वाहतुकीसह शहरातील वाहतूक एकाच मार्गाने होत असल्यामुळे याठिकाणी क्षणाक्षणाला मृत्यू डोक्यावर घोंगावत आहे. याठिकाणी दिवसातून किमान एक-दोन लहान-मोठे अपघात होत असतात. उड्डाणपूल रखडल्याने आत्तापर्यंत झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी पहाटे आंब्याचा ट्रक पलटी झाल्याने पुन्हा एकदा हे अधोरेखित होत आहे.

कऱ्हाड शहराचे प्रवेशव्दार म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर नाक्यावर वाहतूक कोंडी होत असून, कऱ्हाडसह मलकापूरमध्ये तालुक्यातून व महामार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, कोल्हापूर नाक्यावर महामार्गावरील अवजड वाहनांसह प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. याठिकाणी गर्दीतून मार्ग काढत महामार्गावरून कऱ्हाडमध्ये प्रवेश करताना वाहनधारकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवेश करावा लागतो. कोल्हापूरकडून पुणे बाजूकडे जाण्यासाठी असलेल्या लेनवर उड्डाणपूल नसल्यामुळे कऱ्हाड शहरात येणारी वाहने व पुढे सातारा तसेच पुणे, मुंबईकडे जाणारी वाहने एकाच लेनवरून धावत असतात. महामार्गावर सातारा, पुणे बाजूकडे जाणारी वाहने भरधाव वेगात असतात तर शहरात येणाऱ्या वाहनांचा वेग मंदावलेला असतो. अशा परिस्थितीत अनेकवेळा अपघात झाले आहेत. या अपघातात महामार्ग चौपदरीकरणानंतर आत्तापर्यंत अनेकांना आपला जीव गामवावा लागला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात आठ वर्षाच्या बालिकेला जीव गमवावा लागला होता तर काले येथील वृद्ध दाम्पत्य जागीच ठार झाले. या जीवघेण्या अपघातांसह सोमवारी आंब्याचा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातासारखे छोटे-मोठे अपघात नेहमीच होतात. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यापुढेही उड्डाणपुलाच्या प्रतीक्षेत आनखी कितीजणांना जीव गमवावा लागेल, असा संतप्त प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

चौकट

उड्डाणपुलाला निधी मंजूर पण होणार कधी ?

उड्डाणपुलासाठी दहा वर्षांपूर्वी भूगर्भातील थर परीक्षण केले. परीक्षण हे परीक्षणच राहिले त्याचे पुढे काय झाले, हे आजही प्रलंबितच आहे. तर महामार्ग प्राधिकरणासह विविध विभागांकडून अनेकवेळा पाहणी करून नकाशे तयार केले. सर्वांच्या प्रयत्नाने निधीही मंजूर झाला. पण प्रत्यक्षात उड्डाणपूल केव्हा होणार, याची प्रतीक्षा आजपर्यंत काही संपलेली नाही.

चौकट

लॉकडाऊनमुळे अनर्थ टळला

कोल्हापूर नाक्यावर परमिट व बिगर परमिट वडापने उपमार्गावर ठाण मांडलेले असते. तर कऱ्हाडहून पुण्या-मुंबईकडे जाणारी व्हीआयपी वडापची वाहने महामार्गावरच ठाण मांडतात. दिवसभर याठिकाणी वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांसमोरच राजरोसपणे प्रवाशांची चढ-उतार सुरू असते. हे वडाप सध्या लॉकडाऊनमुळे बंद असल्यामुळे अनर्थ टळला.

चौकट

रात्रीच्यावेळी खासगी बसचे थैमान

कोल्हापूर नाक्यावर सायंकाळी ६ ते रात्री ९ यावेळेत अनेक खासगी प्रवासी बस पुण्या-मुंबईकडे जातात. त्यातील बहुतांशी बस प्रवासी घेण्यासाठी याठिकाणी थांबतात. अनेक चालक उपमार्गासह महामार्गावरच बस उभ्या करून थैमान सुरू असते.

फोटो कॅप्शन

कोल्हापूर नाक्यावर सोमवारी पहाटे आंब्याचा ट्रक पलटी झाला. लॉकडाऊनमुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ( छाया - माणिक डोंगरे)

===Photopath===

140621\img-20210614-wa0028.jpg

===Caption===

फोटो कॕप्शन

कोल्हापूर नाक्यावर सोमवारी पहाटे आंब्याचा ट्रक पलटी झाला. लॉकडाऊनमुळे या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. ( छाया - माणिक डोंगरे)