शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

By admin | Updated: June 12, 2016 00:51 IST

दोघेही शेतकरी: आखाडेत शोककळा; केबल काढताना दुर्घटना

मेढा/कुडाळ : शेतात नांगरताना आडवी येणारी टीव्ही केबलची वायर बाजूला करत असताना विजेचा धक्का बसल्याने दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना जावळी तालुक्यातील आखाडे येथे शनिवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. भास्कर शिवराम गुंजाळे, शरद दिनकर शिंदे अशी मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आखाडे येथील शरद शिंदे (वय ५५) आणि भास्कर गुंजाळे (६२) हे शनिवारी सकाळी सात वाजता मणीची पट्टी शिवारात मशागतीसाठी औत घेऊन गेले होते. नांगरत असताना त्यांना शेतात केबल पडलेली आढळली. ही केबल आडवी येत असल्याने शरद शिंदे हाताने ती बाजूला करत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. शिंदे यांना केबलपासून बाजूला करत असतानाच भास्कर गुंजाळे यांनाही विजेचा धक्का बसला. या धक्क्याने भास्कर गुंजाळे आणि शरद शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. या शेतानजीक असलेल्या किसन आंबुले यांच्या विहिरीवर मोटार बसविण्यात आली असून, त्याची विद्युत जोडणी या शेतातून नेली आहे. या शेतातूनच टीव्ही केबलही गेली आहे. दोन्ही वायरी एकमेकांना जोडलेल्या आढळल्या. शेतीपंपाची वायर आणि केबलला एकमेकांना आधार म्हणून त्या गुंफल्या असाव्यात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी केबलही तोडलेली आढळली. टीव्ही केबलला विजेचा धक्का बसणार नाही, असे गृहीत धरून शिंदे यांनी ही वायर हाताने बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे धक्का बसून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी ताबडतोब विद्युत पुरवठा खंडित करून दोघांना केबलपासून बाजूला केले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार रणजित देसाई, महावितरणचे सहायक अभियंता थोरवडे, कुडाळ उपविभागाचे कनिष्ठ अभियंता यादव यांनी तातडीने भेट दिली. शरद गुंजाळे यांचे भाऊ विलास हे वीज कर्मचारी आहेत. ही दोस्ती तुटायची न्हाय... शरद शिंदे आणि भास्कर गुंजाळे हे दोघेही चांगले मित्र होते. त्यांचा जमिनीत वारंगुळा होता. एकमेकांच्या शेतातील सर्व कामे ते दोघे एकत्र करीत होते... अन् शनिवारच्या दुर्घटनेत दोघांचाही एकदमच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)