शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

मृत बैल निर्जन ठिकाणी टाकण भोवलं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:44 IST

सातारा : जावळी तालुक्यातील सरताळे येथे मृत बैल निर्जन ठिकाणी टाकणं, हे बैलमालकाला भोवलं असून, हा बैल पुण्यातून जावळी ...

सातारा : जावळी तालुक्यातील सरताळे येथे मृत बैल निर्जन ठिकाणी टाकणं, हे बैलमालकाला भोवलं असून, हा बैल पुण्यातून जावळी तालुक्यात आणून टाकण्यासाठी आणखी चार ते पाचजणांचा समावेश होता, असे तपासात पुढे आलं आहे. अपघातातील मृत बैलावर दफन करून अंत्यसंस्कार केले असते तर या भानगडी वाढल्याच नसत्या. मृत बैल उघड्यावर टाकल्यामुळेच बैलमालकाच्या पाठीमागे कायद्याच्या ससेमिरा लागला.

जावळी तालुक्यातील सरताळे येथे निर्जन ठिकाणी एका बैलाचे पाय तोडून आणि फास लावून हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. यानंतर मेढा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर वेगळाच प्रकार समोर आला. या बैलाची हत्या नव्हे तर त्याचा अपघातात मृत्यू झाला होता. मात्र, उघड्यावर टाकून प्राण्यांची हेळसांड केल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे कायद्याने हा गुन्हा आहे. इतरवेळी प्राणी मृत होतात. त्यावेळी मृत प्राण्यांचे रितसर दफन केले जाते. म्हणजेच प्राण्यांच्या मृतदेहाचीही विटंबना न होता त्यांच्यावर रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करणे गरजेचे असते. इथे बैल मालकाचे हेच चुकले. बैलाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर बैलमालकाने संबंधितांकडून भरपाई सुद्धा घेतली. मात्र, त्यानंतर त्या बैलाचा मृतदेह दफन करणे गरजेचे होते. परंतु बैलमालकाने टाळाटाळ करून मृत बैलाची आणखीनच हेळसांड केली. टेम्पोतून बैलाला सरताळेत आणल्यानंतर बैलाला टेम्पोतून उतरण्यात येत होते. त्यावेळी बैलाचे पाय बांधून टेम्पोने ओढून मृतदेह झाडाखाली ठेवला गेला. त्यामुळे या बैलाची फास लावून हत्या झाल्याचे सुुरुवातीला म्हटले गेले.

विशेष म्हणजे बैलाची हत्या केली, अशी कोणीही तक्रार दिली नाही. मात्र, मृत बैलाच्या शरीरावरील खुणा पाहून बैलाचा छळ केल्याचे दिसून येत होते. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला.

चाैकट : नमुने फाॅरेन्सिक लॅबला पाठवले

मेढा पोलिसांनी मृत बैल दफन केला होता. मात्र, मृत्यूचे कारण समजण्यासाठी दफन केलेला बैलाचा मृतदेह पुन्हा उकरण्यात आला. त्यानंतर त्याचे शवविच्छेदन जागेवरच करण्यात आले. बैलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे समजण्यासाठी नमुने पुणे येथील फाॅरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहेत. हे नमुने प्राप्त झाल्यानंतर बैलाच्या मृत्यूचे कारण समजणार आहे.

चाैकट : म्हणे बैल जीवंत होता...

अपघातात बैल जखमी झाल्यानंतर कुमार पडवळ (वय २८, रा. कुंभारवाडी, आसले, वाइ) याने पुण्यातून बैल विकत घेतला. जखमी अवस्थेत त्याने बैल गावी आणला. मात्र, त्याचा मृत्यू झाला. बैलाचा मृतदेह दफन करण्याऐवजी त्याने टाळाटाळ करून मृतदेह उघड्यावरच फेकून दिला. त्यामुळे सारा हलकल्लोळ माजला.