शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

पॅनेल रचनेसाठी रात्रीचा दिवस

By admin | Updated: March 28, 2015 00:09 IST

ग्रामपंचायत निवडणुका : सोसायट्या, पतपेढ्या, सहकारी संस्था पाठोपाठ पुन्हा वातावरण तापणार

खंडाळा : गावोगावी विकास सेवा सोसायट्या, सहकारी पतपेढ्या, सहकारी संस्था यांच्या निवडणुकांमध्ये राजकीय फड तापलेले आहेत. त्यातच अचानकपणे ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने पॅनेल रचनेसाठी रात्रीचा दिवस केला जात आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण न होताच मुदतपूर्व निवडणुका लागत असल्याने संभ्रमावस्था आहे. तरीही गावात पत तरच तालुक्यात रुबाब. यामुळे गावपुढारी व्यूहरचनेत मग्न आहेत.खंडाळा तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींची मुदत सप्टेंबरअखेर संपत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका २२ एप्रिलला होणार आहेत. मात्र तीन-चार महिने अगोदरच निवडणुका घेण्यामागचा उद्देश लोकांना संभ्रमात टाकणारा आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाल पूर्ण होत नाही. आणि वास्तविक ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंचपदी आरक्षणे जाहीर होणे गरजेचे आहे. यापैकी कोणता निर्णय न होताच निवडणुकांचा कालावधी जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणुकांचा हा निर्णय सोशल मीडियाद्वारे त्याचरात्री गावोगावी पोहोचला आणि गावातील नेतेमंडळींची झोपच उडाली. दुसऱ्याच दिवसांपासून पॅनेलचा रचनेसाठी धावाधाव सुरू झाल्याचे चित्र सर्वत्रच पाहायला मिळत आहे.गावोगावी सोसायटी निवडणुकीचे रणांगण तापले असतानाच ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला असल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सोसायटीच्या निवडणुकीत नाराज असलेल्यांची मर्जी संपादन करण्यात पुढाऱ्यांचा बराचसा वेळ जात आहे. एरव्ही खिजगणीतही नसलेली मंडळीही उसने अवसान आणून दंड थोपटण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अशांना थोपविण्यासाठी नेत्यांची धावपळ सुरूच आहे. याशिवाय गटातील मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी मतदारांना बांधून घेण्यासाठी राजकीय नेत्यांकडून विविध शक्कल लढविल्या जात आहेत. त्यामुळे वरवर वाटणारी ग्रामपंचायत निवडणूक घराघरात डोकावली जात आहे. (प्रतिनिधी)गट-तटाचा यात्रांवर होणार परिणामतालुक्यात सध्या यात्रा, जत्राचा हंगाम जोरदार सुरू आहे. त्यातच निवडणुका लागल्याने गावतळीवरील वातावरण संवदेनशील बनण्याची दाट शक्यता आहे. गटातटाच्या राजकारणाचा परिणाम यात्रांवर निश्चितपणे जाणवणार आहे. गावची एकोप्याची परंपरा धोक्यात येण्याची चिन्हे असल्याने निवडणुकांना तेवढ्याच पातळीवर ठेवणे गरजेचे आहे. इच्छुकांनी मात्र वार्डावार्डात आपले वर्चस्व कसे आहे. हे सिद्ध करण्यावर भर दिला असल्याचे पॅनेलप्रमुखांना उमेदवारी देताना कस लावावा लागणार आहे.