शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

पॅनेल रचनेसाठी रात्रीचा दिवस

By admin | Updated: March 28, 2015 00:09 IST

ग्रामपंचायत निवडणुका : सोसायट्या, पतपेढ्या, सहकारी संस्था पाठोपाठ पुन्हा वातावरण तापणार

खंडाळा : गावोगावी विकास सेवा सोसायट्या, सहकारी पतपेढ्या, सहकारी संस्था यांच्या निवडणुकांमध्ये राजकीय फड तापलेले आहेत. त्यातच अचानकपणे ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने पॅनेल रचनेसाठी रात्रीचा दिवस केला जात आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण न होताच मुदतपूर्व निवडणुका लागत असल्याने संभ्रमावस्था आहे. तरीही गावात पत तरच तालुक्यात रुबाब. यामुळे गावपुढारी व्यूहरचनेत मग्न आहेत.खंडाळा तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींची मुदत सप्टेंबरअखेर संपत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका २२ एप्रिलला होणार आहेत. मात्र तीन-चार महिने अगोदरच निवडणुका घेण्यामागचा उद्देश लोकांना संभ्रमात टाकणारा आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाल पूर्ण होत नाही. आणि वास्तविक ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंचपदी आरक्षणे जाहीर होणे गरजेचे आहे. यापैकी कोणता निर्णय न होताच निवडणुकांचा कालावधी जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणुकांचा हा निर्णय सोशल मीडियाद्वारे त्याचरात्री गावोगावी पोहोचला आणि गावातील नेतेमंडळींची झोपच उडाली. दुसऱ्याच दिवसांपासून पॅनेलचा रचनेसाठी धावाधाव सुरू झाल्याचे चित्र सर्वत्रच पाहायला मिळत आहे.गावोगावी सोसायटी निवडणुकीचे रणांगण तापले असतानाच ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला असल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सोसायटीच्या निवडणुकीत नाराज असलेल्यांची मर्जी संपादन करण्यात पुढाऱ्यांचा बराचसा वेळ जात आहे. एरव्ही खिजगणीतही नसलेली मंडळीही उसने अवसान आणून दंड थोपटण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अशांना थोपविण्यासाठी नेत्यांची धावपळ सुरूच आहे. याशिवाय गटातील मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी मतदारांना बांधून घेण्यासाठी राजकीय नेत्यांकडून विविध शक्कल लढविल्या जात आहेत. त्यामुळे वरवर वाटणारी ग्रामपंचायत निवडणूक घराघरात डोकावली जात आहे. (प्रतिनिधी)गट-तटाचा यात्रांवर होणार परिणामतालुक्यात सध्या यात्रा, जत्राचा हंगाम जोरदार सुरू आहे. त्यातच निवडणुका लागल्याने गावतळीवरील वातावरण संवदेनशील बनण्याची दाट शक्यता आहे. गटातटाच्या राजकारणाचा परिणाम यात्रांवर निश्चितपणे जाणवणार आहे. गावची एकोप्याची परंपरा धोक्यात येण्याची चिन्हे असल्याने निवडणुकांना तेवढ्याच पातळीवर ठेवणे गरजेचे आहे. इच्छुकांनी मात्र वार्डावार्डात आपले वर्चस्व कसे आहे. हे सिद्ध करण्यावर भर दिला असल्याचे पॅनेलप्रमुखांना उमेदवारी देताना कस लावावा लागणार आहे.