शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

पॅनेल रचनेसाठी रात्रीचा दिवस

By admin | Updated: March 28, 2015 00:09 IST

ग्रामपंचायत निवडणुका : सोसायट्या, पतपेढ्या, सहकारी संस्था पाठोपाठ पुन्हा वातावरण तापणार

खंडाळा : गावोगावी विकास सेवा सोसायट्या, सहकारी पतपेढ्या, सहकारी संस्था यांच्या निवडणुकांमध्ये राजकीय फड तापलेले आहेत. त्यातच अचानकपणे ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने पॅनेल रचनेसाठी रात्रीचा दिवस केला जात आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण न होताच मुदतपूर्व निवडणुका लागत असल्याने संभ्रमावस्था आहे. तरीही गावात पत तरच तालुक्यात रुबाब. यामुळे गावपुढारी व्यूहरचनेत मग्न आहेत.खंडाळा तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींची मुदत सप्टेंबरअखेर संपत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका २२ एप्रिलला होणार आहेत. मात्र तीन-चार महिने अगोदरच निवडणुका घेण्यामागचा उद्देश लोकांना संभ्रमात टाकणारा आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाल पूर्ण होत नाही. आणि वास्तविक ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंचपदी आरक्षणे जाहीर होणे गरजेचे आहे. यापैकी कोणता निर्णय न होताच निवडणुकांचा कालावधी जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणुकांचा हा निर्णय सोशल मीडियाद्वारे त्याचरात्री गावोगावी पोहोचला आणि गावातील नेतेमंडळींची झोपच उडाली. दुसऱ्याच दिवसांपासून पॅनेलचा रचनेसाठी धावाधाव सुरू झाल्याचे चित्र सर्वत्रच पाहायला मिळत आहे.गावोगावी सोसायटी निवडणुकीचे रणांगण तापले असतानाच ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला असल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सोसायटीच्या निवडणुकीत नाराज असलेल्यांची मर्जी संपादन करण्यात पुढाऱ्यांचा बराचसा वेळ जात आहे. एरव्ही खिजगणीतही नसलेली मंडळीही उसने अवसान आणून दंड थोपटण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अशांना थोपविण्यासाठी नेत्यांची धावपळ सुरूच आहे. याशिवाय गटातील मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी मतदारांना बांधून घेण्यासाठी राजकीय नेत्यांकडून विविध शक्कल लढविल्या जात आहेत. त्यामुळे वरवर वाटणारी ग्रामपंचायत निवडणूक घराघरात डोकावली जात आहे. (प्रतिनिधी)गट-तटाचा यात्रांवर होणार परिणामतालुक्यात सध्या यात्रा, जत्राचा हंगाम जोरदार सुरू आहे. त्यातच निवडणुका लागल्याने गावतळीवरील वातावरण संवदेनशील बनण्याची दाट शक्यता आहे. गटातटाच्या राजकारणाचा परिणाम यात्रांवर निश्चितपणे जाणवणार आहे. गावची एकोप्याची परंपरा धोक्यात येण्याची चिन्हे असल्याने निवडणुकांना तेवढ्याच पातळीवर ठेवणे गरजेचे आहे. इच्छुकांनी मात्र वार्डावार्डात आपले वर्चस्व कसे आहे. हे सिद्ध करण्यावर भर दिला असल्याचे पॅनेलप्रमुखांना उमेदवारी देताना कस लावावा लागणार आहे.